शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

मनात आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 20:24 IST

सुख-दु:ख समान मानून मनाची स्थिती स्थिर ठेवायची असते. आपणच आपल्या मनाला समजावू शकतो. आपणच आपल्या मनाला घडवू शकतो.

कोणतीही वृत्ती प्रथमत: मनात निर्माण होते. मनाने ठरवले तर हात, पाय, वाचा, दृष्टी इत्यादी इंद्रियाकडे ते धाव घेते. ज्याप्रमाणे बाहुलीला दोरी जिकडे नेईल तिकडे बाहुली जाते, त्याचप्रमाणे मनाप्रमाणेच सर्व इंद्रिये कार्य करतात. मन हे सर्व इंद्रियांच्याद्वारे धाव घेते. आज सध्याच्या घडीला कोरोने विषाणूच्या महामारीमुळे सर्वांची मने धास्तावली आहेत. मनाला आधार देणे गरजेचे आहे. मनात आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. मन स्थिर बनवा. मनाला या दु:खापासून हटवा. स्वत:ची काळजी घ्या. मनाला आराम द्या, मनाला भरकटू देऊ नका. मनानेच मनपण राखायचे आहे. आपल्या मनाने धास्ती घेतली की, आपण हारतो. मनाने खंबीर बनून येणाऱ्या संकटांना तोंड द्या. या विश्वात जी गोष्ट निर्माण होते तिचा नाश अटळ असतो. तसा या कोरोना विषाणू महामारीचा नाश अटळ आहेच. थोडा काळ जावा लागेल. कोणत्याही बाबतीत शुभ संकल्प करावेत. आपले मन कशाशीही चिकटता कामा नये. मनाला स्थिर करण्यासाठी सकाळी ध्यान व योगाचा आधार घ्या. नाना प्रकारच्या दु:खानी ग्रासलेल्या मानसिकतेतून बाहेर पडा. आहे त्या परिस्थितीशी एकरूप व्हा. मनातून भीती काढून टाका. मनाच्या वरून तुमच्या सुखाची पावती मिळते. मग दु:खी असले तर शरीरावर त्याचा परिणाम होतो. ज्याप्रमाणे अंकुराचा लुसलुशीतपणा हा जमिनीचा मृदूपणा सांगतो, त्याप्रमाणे मनुष्याच्या हावभावावरून त्याच्या मनाचा स्वभाव सांगता येतो. मनाला भ्रांतीत अडकवू नका. मनातून मुळासकट कोरोनाची भीती घालवा. कोणत्याही वेळी, कशानेही न मळता आपण मनाने स्वच्छ राहावे. शरीराद्वारे घडणाऱ्या हालचाली मनाच्या मार्गाने घडतात म्हणून मनाला सावरा. मनाची स्थितीच सुख-दु:खांना कारणीभूत आहे. म्हणून मनाची स्थिरता महत्त्वाची आहे. या चंचलरूपी मनाला सावरायचे झाले तर १० मिनिटे का होईना मौनात राहा. ज्याच्या योगाने मन शांत होईल. मौनाच्या संगतीने मनाला शांत करा. जीवनात अनेक गोष्टी मनाविरुद्ध घडतात. या प्रपंचरूपी डोहात सगळे आपल्या मनासारखे होत नसते. जरी एखादी घटना घडली तरी आपले मन परत-परत इच्छा करते. या संसाररूपी सागरात मन नेहमी भटकत असते. त्याला सुखाची अपेक्षा असते. परंतु सुख-दु:ख समान मानून मनाची स्थिती स्थिर ठेवायची असते. आपणच आपल्या मनाला समजावू शकतो. आपणच आपल्या मनाला घडवू शकतो.- डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)