शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
4
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
5
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
6
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
7
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
8
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
9
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
10
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
11
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
12
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
13
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
14
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
15
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
16
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
17
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
20
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

Navratri 2022 : ज्यांना स्वत:ची वैश्विक, पार्थिव उन्नती हवी त्यांनी देवी कुष्मांडा हिची अशी करावी आराधना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 07:00 IST

Navratri 2022: जेव्हा या चराचर विश्वाचे काहीच अस्तित्त्व नव्हते, तेव्हा परमेश्वरी तत्वाला इच्छा झाली, सृजनाची `एकोऽहम बहुर्यामी' ब्रह्मांड निर्माण करण्याची! तेव्हा या शक्तीची उत्पत्ती झाली

>> आचार्या विदुला शेंडे 

या देवी सर्वभूतेषु कुष्मांडा रूपेण संस्थिता,नम:स्तस्यै नम:स्तस्यै नम:स्तस्यै नमो नम:।

आश्विन शुद्ध चतुर्थी म्हणजेच घटाची चौथी माळ. या दिवशी कुष्मांडा या देवी शक्तीची साधना करतात. कुष्मांड म्हणजेच कोहळा किंवा तत्सम फळ म्हणजे भोपळा. ज्यांच्यामधे निसर्गदत्त प्राणशक्ती ही सर्वात अधिक आहे. कुष्माण्डाचा आणखी एक अर्थ म्हणजे कुसुम + अण्डज म्हणजेच कुसुमासारख्या, फुलासारख्या सुंदर देवीने केलेली ब्रह्मांडाची निर्मिती.

जेव्हा या चराचर विश्वाचे काहीच अस्तित्त्व नव्हते, तेव्हा परमेश्वरी तत्वाला इच्छा झाली, सृजनाची `एकोऽहम बहुर्यामी' ब्रह्मांड निर्माण करण्याची! तेव्हा या शक्तीची उत्पत्ती झाली व या कुष्माण्डाच्या स्मितहास्यातून विश्वाचे अस्तित्व उदयास आले, म्हणूनच ही आरंभिक अशी आदिशक्ती रूप आहे.

या देवीच्या शक्तीने आणि तेजाने दाही दिशा प्रकाशमान झाल्या. दहा दिशा म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, अग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, ऊर्ध्व, अधर. या दशदिशांमधून ही शक्ती आपल्याला ज्ञान देते की पूर्व म्हणजे पुढे बघा. दूरदर्शी व्हा आणि ध्येयाकडे वाटचाल करा. कितीही संकटे आली तरी डगमगू नका. पश्चिम दिशा सांगते मागील चूकातून शहाणा हो. मागील सुंदर आठवणीतून जीवनाचा सुंदर रस अनुभव. उत्तर दिशेकडून कार्यासाठी लागणारी संसाधने हे व धु्रव ताऱ्यासारखे ध्येय व कार्यावर लक्ष अढळ राहू दे. दक्षिण दिशेकडून वेळेचे, काळाचे महत्व जाण. उपदिशांकडून दोन गोष्टींमधले समत्व शीक. संसाधने जोडताना वेळेचे भान ठेव. ऊर्ध्व म्हणजे वरची दिशा सांगते कितीही यश मिळाले तरी पाय जमिनीवर राहू देत व अधर अर्थात खालची दिशा सांगते तुला आसमंत गाठायचा आहे मग घे भरारी आणि तुझ्या कार्याचा उपयोग खालील तळागाळातील समाजासाठी होऊ देत.

अशी ही विश्वशक्ती 'कूष्माण्डा' हीच प्राण ऊर्जा आहे. सर्व वस्तुंची निर्मिती हिच्यातून आहे. त्यामुळे त्यांच्यामधले तेज आणि छाया म्हणजे सावली ही दैवी शक्ती आहे.

ही देवी अष्टभूजा आहे. तिच्या हातात कमंडलू, धनुष्य बाण, कमळ, अमृतकलश, चंद्र, गदा आणि कमंडलू, माला आहे. अमृत कलश हातात आहे म्हणून हिला मोहिनी किंवा मिनाक्षीदेवी असेही म्हणतात. हिच्या हातातील जपमाला साधकाला सर्व सिद्धी व निधी देतात. हिचे वाहन सिंह आहे. 

ज्यांना स्वत:ची वैश्विक, पार्थिव उन्नती हवी आहे, त्यांनी या शक्तीची उपासना करावी. आपल्या शरीरातील अनाहत चक्र या स्थानी ही देवी शक्ती आहे. जिथे लक्ष देऊन साधना केली असता साधकामध्ये निरपेक्ष प्रेम, अनुकंपा, आत्मस्विकृती, किर्ती, सामर्थ्य , आरोग्य प्राप्त होते. हिच्या साधनेने सर्व रोग, शोक, दु:खं दूर होऊन संसाररूपी भवसागर तरुन जाण्याची शक्ती देते. तसेच आध्यात्माची अनुभूती येऊन साधक आत्मोन्नतीकडे जातो. 

या देवीची आराधना पुढील श्लोक म्हणून करतात. 

सुरासंपूर्णकलशं रुधिराप्लुतमेव च।दधाना हस्तेपद्माभ्यो कुष्माण्डा शुभदास्तुमे।

या दैवी शक्तीने जागृत झालेल्या प्रेमाने अनुवंâपेने साधकामधील राग, द्वेष इ. फळून जातो. जरी आधीच्या पिढीकडून रागीट स्वभाव आला, तरी तो स्वभाव वितळून जातो, असे ऋषी वेदांतामध्ये सांगतात. तमस आणि राक्षसी वृत्ती नष्ट होते. वाईट, अमंगल, अविचार निघून जातात. ही फक्त प्रेम आणि करुणा देते. हीची प्रार्थना करूयात-

दुर्गविनाशिनी त्वंहि दारिद्र्यादि विनाशिनीजगन्माता जगत् कर्ती जगदाधार रुपिणीम।चराचरेश्वरी कुष्माण्डे प्रणमाम्यहमत्रैलोक्यसुंदरी त्वं हि दु:ख, शोक, निवारिणीम,परम आनंदमयी कुष्माण्ड प्रणमाम्यहम।

टॅग्स :Navratriनवरात्री