शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 14:04 IST

Nag Panchami 2025: नागपंचमीला पुढील तीन नागांचे स्मरण करा आणि सर्पदोषातून मुक्ती मिळवा, असे पुराणात म्हटले आहे, काय आहे वैशिष्ट्य? ते पाहू. 

नागपंचमी ही श्रावण महिन्यातील शुद्ध पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी शिव पार्वती आणि सर्प देवतांची पूजा केली जाते. या प्रसंगी वासुकी, शेषनाग आणि तक्षक यांसारख्या सापांचे स्मरण केले जाते. पण याच सापांना एवढे महत्त्व का? ते नागपंचमीच्या निमित्ताने जाणून घेऊ. 

Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!

वासुकी नाग

देवाधिदेव महादेवाच्या गळ्यात हार म्हणून विराजमान होण्याचा मान मिळाला तो वासुकीला! त्याला सापांचा राजा असेही म्हटले जाते. या प्रजातीच्या सापांना महर्षी कश्यप आणि कद्रू यांची वंशज मानले जाते. त्यांच्या पत्नीचे नाव शतशिपा होते. समुद्रमंथनाच्या वेळी नागराज वासुकीचा दोरी म्हणून वापर करण्यात आला होता असेही म्हटले जाते. देव दानवांच्या युद्धात त्याने समुद्र मंथनाच्या वेळी सहन केलेले आघात पाहता महादेवांनी त्याला आपलेसे केले आणि आपल्या हृदयाजवळ धारण केले. 

Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?

शेषनाग

शेषनागच्या आईचे नाव कद्रू होते. त्याच्या आईने आणि भावांनी मिळून कश्यप ऋषींची दुसरी पत्नी विनिता हिला फसवले होते. हे पाहून तो आपल्या आईला आणि भावांना सोडून गंधमादन पर्वतावर तपश्चर्या करायला गेला. यामुळे प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने त्याला वरदान दिले की त्याची बुद्धी कधीही धर्मापासून विचलित होणार नाही. म्हणून त्याला विष्णूंच्या पायाशी स्थान मिळाले. 

ब्रह्मदेवाने शेषनागाला पृथ्वीला आपल्या मस्तकावर धरून ठेवण्यास सांगितले. म्हणूनही त्यांचे स्मरण आजच्या दिवशी केले जाते. शेषनाग भगवान श्रीरामांचे धाकटे भाऊ लक्ष्मण आणि श्रीकृष्णाचे मोठे भाऊ बलराम यांच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता.

Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?

तक्षक नाग

पाताळ लोकात राहणारा तक्षक हा महाभारत काळातील साप असल्याचे मानले जाते. असे म्हटले जाते की शृंगी ऋषींच्या शापामुळे तक्षकाने राजा परीक्षितला दंश केला होता. याचा बदला घेण्यासाठी परीक्षिताचा मुलगा जनमेजय याने नाग राजवंशाचा नाश करण्यासाठी सर्पबळी दिला. परंतु, आस्तिक ऋषींच्या सल्ल्यानुसार, जनमेजयने सर्पबळी थांबवला आणि तक्षकाचा जीव वाचवला. तो दिवस श्रावणाचा पाचवा दिवस होता. असे म्हटले जाते की तेव्हा सापांनी आस्तिक मुनींना वचन दिले होते की जो कोणी नागपंचमीला सापांची पूजा करेल त्याला सर्पदंशाची भीती वाटणार नाही.

(सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.)

टॅग्स :Nag PanchamiनागपंचमीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणMahabharatमहाभारतTraditional Ritualsपारंपारिक विधीAstrologyफलज्योतिष