'पैसा आणि पुण्य' ३६ की ६३ | Shri Pralhad Wamanrao Pai and Urmila Nimbalkar | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 12:27 PM2021-03-22T12:27:18+5:302021-03-22T12:27:35+5:30

 'पैसा आणि पुण्य ६३ की ३६' प्रत्येक माणसाला समृध्द जीवन जगावं असच वाटते. त्यासाठी तो धडपड करत असतो. म्हणजेच ...

'Money and Virtue' 36 or 63 | Shri Pralhad Wamanrao Pai and Urmila Nimbalkar | Lokmat Bhakti | 'पैसा आणि पुण्य' ३६ की ६३ | Shri Pralhad Wamanrao Pai and Urmila Nimbalkar | Lokmat Bhakti

'पैसा आणि पुण्य' ३६ की ६३ | Shri Pralhad Wamanrao Pai and Urmila Nimbalkar | Lokmat Bhakti

googlenewsNext

 'पैसा आणि पुण्य ६३ की ३६'
प्रत्येक माणसाला समृध्द जीवन जगावं असच वाटते. त्यासाठी तो धडपड करत असतो. म्हणजेच काय तर जीवनात काहीही कमी पडू नये यासाठी जमेल त्या मार्गाने पैसा कमविण्याचा प्रयत्न करतो. परंतु हाच पैसा कमवत असताना कधी कधी नैतिक मूल्ये हरवून बसतो. परिणामी त्याला जीवनात अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागते. यू ट्यूब वरील लोकमत भक्ती ह्या चॅनेल वर ' पैसा आणि पुण्य ६३ की ३६' या भागामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला निंबाळकर यांनी विचारलेल्या प्रश्नांना  जीवनविद्या मिशन चे आजीव विश्वस्त, तत्वचिंतक श्री प्रल्हाददादा सांगतात की जीवन जगण्यासाठी पैसा कमविणे आवश्यक आहेच. परंतु पैशाबरोबर पुण्याईचे महत्व समजून घेतले पाहिजे.कारण जीवनविद्या मिशन चे प्रणेते, थोर समाजसुधारक सद्गुरू श्री वामनराव पै सांगतात की  प्रपंच सुखाचा करणे म्हणजेच परमार्थ .
 आपण जीवन जगताना प्रपंच आणि परमार्थ यात सुवर्णमध्य साधता आला पाहिजे .म्हणजेच काय तर पैसा कमवताना पुण्याईचे महत्व पण समजून घ्यायला हवे. पैशाने आपल्याला सुखसोयी विकत घेता येतात, जसे गाडी,आलिशान घर, विविध चैनीच्या वस्तू. घेण्यासाठी पैसा हवा पण मनस्वास्थ्य फक्त पुण्याईनेच मिळते . पैशाने शरीराची सोय होईल. पण मानसिक सुख,आत्मिक सुख पैशाने विकत घेता येणार नाही. त्यामुळे पैसा आणि पुण्य दोन्ही जीवनात हवेच किंबहुना जीवनविद्या असे सांगते की पुण्याईची कमाई पैशा पेक्षा काकणभर जास्तच हवी. याचा अर्थ पैसा आणि पुण्य याचा ६३ चा आकडा म्हणजे एकमेकांशी सुसंगत असायला हवे.
पैसा कमवताना वाईट मार्गाने कमवला तर पाप निर्माण होते असे काही लोकांना वाटते, तर काही लोक म्हणतात की पाप पुण्य सर्व झूट आहे. मुळात पाप आणि पुण्य म्हणजे नेमकं काय हे समजून घ्यायचा हवे. जीवनविद्या असे सांगते की आपण जीवन जगताना जी कर्म करतो त्यातून पाप किंवा पुण्य निर्माण होते. आजकाल लोक कशालाही पाप किंवा पुण्य समजतात. त्यासाठी खालील गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे.
१) आपण केलेल्या सत्कर्मातून पुण्य व आपण केलेल्या दुष्कर्मातून पाप निर्माण होते. 
२) जे पुण्य निर्माण होते ते आपल्या जीवनात सुख समृद्धी,यश,,पैसा सर्व काही मिळवून होते.
३)याउलट दुष्कर्मातून निर्माण झालेले पाप मात्र जीवनात दुःख, ताप निर्माण करते.जर तो पैसा प्रामाणिक पणे, कर्तव्य बुध्दीने काम करून, विधायक कामातून मिळविला असेल आणि चांगल्या कामासाठी खर्च केला असेल तरच त्यातून पुण्य निर्माण होते.
४) त्याविरुद्ध जर पैसा बेकायदेशीर मार्गाने मिळविला असेल तर तो सुख देऊच शकत नाही.
काही लोक खूप कष्ट करतात पण हवे तसे यश त्यांना मिळत नाही कारण त्यांच्या गाठीशी पुण्य नसते. बरे तर पुण्याईचे कोणते पासबुक नाही की ज्यातून कळेल की इतके पुण्य जमा आहे. लोक म्हणतात की नशिबात असेल तर यश मिळेल. जीवनविद्या इथे मार्गदर्शन करते की नशीब सुद्धा आपल्या कर्मातूनच येते. आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळ म्हणजे  जीवनात मिळालेले यश. दोन माणसे सारखेच प्रयत्न करतात पण यश मात्र ज्याच्या गाठीशी पुण्य आहे त्यालाच मिळते. हे पुण्य आधीचे जमा असल्याने सुख मिळते. 
जेव्हा आपण सर्व चांगल्या गोष्टी जीवनात उपभोगतो तेंव्हा हे पुण्य खर्ची पडते. आणि दुःखाचे अनुभव येतात. अशा वेळेस पाप पुण्याचा संबंध आपल्या कर्माशी आहे  .म्हणजेच काय तर सत्कर्माचे महत्व समजून सतत आपल्या हातून ते घडले पाहिजे.तरच मानवी जीवनात क्रांती होईल. चांगले आईवडिल, पती पत्नी, गुणी मुले  यश, समृद्धी आणि मनशांती  योग्य मार्गदर्शन करणारे सदगुरू हे सर्व पुण्याईने मिळते. त्यामुळे आज आपण सुखी आहोत याचा अर्थ आपली पुण्याई खर्च झाली आहे.ती भरून काढायला हवी त्यासाठी विचार, उच्चार आणि आचार या तीनही स्थरावरून सत्कर्म केले पाहिजे. आपण काय बोलतो , काय चिंतन करतो इथे सावध राहून पुण्याई भरून काढायला हवी. 


पुण्य कमविण्याचे सोपे उपाय
१)सतत इतरांचे भले व्हावे, चांगले व्हावे अशी इच्छा, असे चिंतन केले पाहिजे. 
२) जीवनविद्या विश्वप्रार्थना शिकवते. अत्यंत कृतज्ञतेने मनापासून ही प्रार्थना म्हटली तर अगणित पुण्य सहज निर्माण होते.
 ३)आपण आपल्या कुवतीप्रमणे दान करु शकतो. अन्न दान, श्रम दान, अवयव दान, सर्वात महत्वाचे ज्ञान दान हे होय. 
थोडक्यात जीवनविद्येचा मंत्र स्मरणात कायम असू दे. शुभ चिंतावे, शुभ ईच्छावे, वचनी शुभ बोलावे, शुभ कर्माच्या सामर्थ्याने सोने करावे जीवनाचे.सदर विषयावर विस्तृतपणे जाणून घेण्यासाठी लोकमत भक्ती  ह्या यू ट्यूब चॅनेल वरील ' पैसा आणि पुण्य ३६ की ६३' या विषयावर श्री प्रल्हाददादा वामनराव पै यांचा व्हिडिओ अवश्य पहा ही, वाचकांना नम्र विनंती. 
www.youtube.com/watch?v=1VoeJ4tylGY
 

Web Title: 'Money and Virtue' 36 or 63 | Shri Pralhad Wamanrao Pai and Urmila Nimbalkar | Lokmat Bhakti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.