शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

Matsya Jayanti 2023: भगवान विष्णूंनी आजच्याच दिवशी घेतला होता पहिला मत्स्य अवतार; वाचा अवताराचे निमित्त आणि कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 08:05 IST

Matsya Jayanti 2023: चैत्र शुक्ल पंचमी ही तिथी मत्स्यअवताराचा दिवस म्हणून ओळखली जाते; हा अवतार भगवंतांना का घ्यावा लागला ते जाणून घ्या!

चैत्र शुक्ल पंचमी या तिथीला मत्यजयंतीमुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. देवाचा पहिला अवतार मत्स्याचा होता. तो वर्षप्रतिपदेच्या दिवशी झाला असे अनेक धर्मग्रंथात म्हटले आहे. तरीही पां.वा. काणे यांनी चैत्र शुक्ल पंचमीला मत्स्यजयंती करतात असे म्हटले आहे. या दिवशी भगवान विष्णूंच्या मत्स्यावताराची पूजा केली जाते. त्यामुळे संकट निवारण होते अशी समजूत आहे. मत्स्य अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी पहिला अवतार मानला जातो. या अवतारामध्ये भगवान विष्णूंनी माशाचे रूप घेतले होते. हैग्रीव नावाच्या असुराला मारण्यासाठी आणि वेदांचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंनी हा अवतार घेतला होता. 

याच तिथी  पंचमहाभूतांची पूजा तसेच शंख, चक्र, गदा, पद्म आणि पृथ्वी यांच्या आकृत्या काढून त्यांची पंमूर्तीव्रत म्हणून पूजा केली जाते. शिवाय विष्णुप्रतिमेला हिंदोळ्यावर ठेवून झोके देण्याचा विष्णु-दोलोत्सवही काही ठिकाणी साजरा केला जातो. एकूणच ही तिथी लक्ष्मी आणि अधिककरून विष्णूंशी संबंधित आहे. 

या सर्व व्रतांमागे कामनापूर्ती, वैभवप्राप्ती अशा फललाभांचे सूचन केलेले असले, तरीही ही फळे विष्णुभक्तीपुढे गौण आहेत. मनाला आनंद मिळावा, शांतता मिळावी यासाठी ज्याने त्याने आपापल्या इच्छाशक्तीनुरूप ही व्रते केली तर काहीच हरकत नाही. या व्रतांमुळे आनंदाचे चार क्षण गाठीशी बांधले जातील हे नक्की. 

या दिवशी माशांना पीठ घालावे किंवा खाद्य टाकावे. भगवान विष्णूंची पूजा करावी. तसेच आजच्या काळात मत्स्यपुजा करायची तर सागरी जलजीवन सुकर व्हावे, म्हणून नदी, समुद्र, जलाशय, झरा, धबधबा असे पाण्याचे आणि जलजीवांचे स्रोत स्वच्छ ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा. ही सेवा भगवान विष्णूंच्या चरणी नक्कीच रुजू होईल.