शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पत्रिकेतील मंगळ 'दोष' नसून मंगळ 'योग' असतो; सविस्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 17:17 IST

मुळात पत्रिकेतील मंगळ 'दोष' नसून तो 'योग' आहे. दोष या शब्दामुळे एकूणच नकारात्मक भावना निर्माण झाली आहे.

मुलीला कडक मंगळ आहे, लग्न जुळणार नाही. मुलाच्या पत्रिकेत मंगळ दोष दाखवत आहेत पत्रिका जुळणार नाही. मंगळ असलेल्या लोकांचे लग्न लवकर होत नाही. मंगळ म्हणजे सगळ्याच गोष्टी उशिरा... या आणि अशा कितीतरी गैरसमजुतींमुळे बिचारी विवाहेच्छुक मंडळी लग्नाची बाकी आहेत. एकीकडे मनुष्य मंगळावर वस्ती करण्याच्या दिशेने विचार करत असताना दुसरीकडे मंगळ दोषामुळे लग्न अडली आहेत, हे विचार खूपच परस्परविरोधी आहेत ना? या विचारात नेमकी मेख कुठे आहे ते पाहू. 

मुळात पत्रिकेतील मंगळ 'दोष' नसून तो 'योग' आहे. दोष या शब्दामुळे एकूणच नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. ज्याप्रमाणे आपल्या कुंडलीत अन्य ग्रहांची स्थिती असते त्याप्रमाणे मंगळ या ग्रहाची स्थिती असते. तो देखील प्रत्येकाच्या कुंडलीत असतो. तो अमुक एक स्थानावर आल्यास त्याला मंगळ योग असे म्हणतात. परंतु त्यामुळे तो दोष अजिबात ठरत नाही. 

पूर्वीच्या काळी लग्न जुळवताना मुलामुलींचे फोटो पाहण्याची किंवा प्रत्यक्ष पाहण्याची प्रथा नव्हती. तर केवळ पत्रिका पाहून गुण मिलन केले जात असे.  त्यांच्याबद्दल, त्यांच्या घराण्याबद्दल माहिती मिळाली की मुला मुलीचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, वागणं, बोलणं, उंची, रूप, रंग, कर्तृत्व यांचे अनुमान कुंडलीतील ग्रहांवरून ठरवले जात असत. ज्यांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास अचूक असे, असे ज्योतिषी कुंडलीवरून अचूक भाष्य करत असत. अशात कुंडलीतील मंगळ योग व्यक्तीचा स्वभाव दर्शवतो.

उच्चीचा मंगळ असणारी व्यक्ती अथक मेहनत घेणारी, जिद्दी, स्वाभिमानी आणि शीघ्र कोपी म्हणजेच पटकन रागावणारी, संतप्त डोक्याची मानली जाते. अशा व्यक्तीचा विवाह जर सौम्य मंगळ योग असणाऱ्या व्यक्तीशी जुळवून दिला तर संसार तग धरून राहील. अन्यथा दोघेही मंगळ योगाचे असतील तर कोणीच माघार घेणार नाही आणि घराची युद्धभूमी होईल व संसारात काडीमोड घ्यावा लागेल. ही दूरदृष्टी मंगळ योगावरून ठरवली जात असे. मात्र अशी कुंडली जुळवताना समोरच्या पक्षाची ग्रहस्थिती लवकर जुळून न आल्याने मंगळ योगाला मंगळ दोष संबोधले जाऊ लागले. 

परंतु आजच्या काळात प्रेम विवाहाला मुलांची सर्वाधिक पसंती असल्यामुळे ज्योतिषी सांगतात, 'प्रेमविवाह करणार असाल तर पत्रिका बघू नका, कारण तुम्ही परस्परांना गुण दोषांसकट स्वीकारले आहे. हे मनोमिलन गुणमीलनाइतकेच महत्त्वाचे आहे.' अशा विवाहात प्रेम, सामंजस्य, आत्मीयता असेल तर कोणतीही ग्रहस्थिती आपोआप संसाराला अनुकूल होत जाते. तसेच पत्रिका पाहून लग्न करावयाचे झाल्यास मंगळ योगाला अनुकूल पत्रिका पाहून लग्न केले आणि त्याही पलीकडे एकमेकांना गुण दोषांसकट स्वीकारण्याची तयारी दाखवली, तर मंगळ ग्रह देखील मंगल ठरायला वेळ लागणार नाही....!

टॅग्स :Astrologyफलज्योतिष