शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

Lokmanya Tilak Jayanti 2023: मी राजकारणात आलो नसतो तर भजन कीर्तनात रमलो असतो, असे लोकमान्य टिळक का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 7:00 AM

Lokmanya Tilak Jayanti 2023: पूर्वीचे स्वातंत्र्यसेनानी देव, देश, धर्माबद्दल सदैव जागृत असत, हेच अधोरेखित करणारा टिळकांचा वारीतील एक प्रसंग वाचा. 

२३ जुलै रोजी लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची जयंती आहे. त्यांच्याबद्दल आपण आजवर बरेच काही ऐकले वाचले आहे. आज त्यांच्या आवडीबद्दल जाणून घेऊया ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या शब्दात.

'मला कीर्तन फार आवडते. स्वार्थ आणि परमार्थ साधण्यास अगदी जवळचा मार्ग म्हणजे कीर्तन. हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे.' हे बोल आहेत लोकमान्य टिळकांचे. आपण राजकारणात गुंतलो नसतो तर नक्की कीर्तनकार झालो असतो, असे ते नेहमी सांगत असत. भिंगारकरबुवा, जोग महाराज अगदी अनेक वारकरी कीर्तनकार मंडळींशी टिळकांचा स्नेहसंबंध होता. त्यांना कुठलीही मदत करण्यासाठी टिळक नेहमीच तत्पर असत. एरव्ही गाण्याचा कंटाळा असलेले टिळक कीर्तनाला मात्र आवर्जून उपस्थित राहत.

एका वर्षी देहू-आळंदीच्या पालख्या पुण्यात पोहोचल्या तेव्हा त्या पालख्यांबरोबर टिळक स्वत: पुण्यातून हिंडले. वारकऱ्यांचा तसा हट्ट होता. त्या वेळी जागोजागी टिळकांचा हारतुऱ्यांनी सत्कार करण्यात आला.

१९०६ मध्ये पंढरपुरात स्वदेशीचे प्रदर्शन वारीच्या वेळीच आयोजित करण्यात आले होते. गोपाळराव गोखले हे त्या प्रदर्शनाचे उद्घाटक होते. सभेच्या ठिकाणी श्रीमंत मिरजकर आणि नामदार गोखले या दोघांसाठी खुर्ची ठेवली होती. त्याप्रमाणे ते दोघे खुर्चीवर बसले. तर त्यांच्यासोर खाली जमिनीवर श्रोत्यांमध्ये टिळक बसले होते. ते पाहून लगबगीने तिसरी खुर्ची आणण्यात आली. परंतु टिळक खुर्चीवर बसले नाहीत. ते म्हणाले, `पांडुरंगाच्या दर्शनास आम्ही आलो असल्यामुळे यात्रेत आलेल्या वारकऱ्यांमध्ये माझे स्थान असणे आवश्यक आहे.'

याच पंढरपूर भेटीत जोग महाराजांबरोबर त्यांनी इतरांचे पाहून न चुकता अगदी सराव असल्यासारखे चंद्रभागेत डुबक्या मारून स्नान केले. कपाळी गोपिचंदन लावले. देवदर्शन घेतले. गरुडखांबाला मिठी मारली. एवढेच नाही तर जोग महाराजांनी तिथल्या कुर्मपृष्ठावर नाचून स्वत:चे कान उपटले. ते पाहून निमूटपणे टिळकांनीही कुर्मपृष्ठावर नाचून स्वत:चे कान उपटले. तक्रारीच्या सूरात जोग महाराजांना म्हणाले, `स्वत:चेच कान काय उपटायचे, त्यापेक्षा दुसऱ्याचे कान उपटायची विद्या असेल तर शिकवा!' त्यावर जोग महाराज म्हणाले, `देवासमोर स्वत:चे कान उपटले, मग दुसऱ्याचे कान उपटण्याचे सामर्थ्य आपोआपच येते.'

एका वृद्धाने टिळकांना वाकून नस्कार केला. तेव्हा टिळक संकोचले. ते वारकऱ्याला म्हणाले, `हे काय, मला कसला नमस्कार करता? नमस्कार वडिलधाऱ्यांना आणि पांडुरंगाला करावा.' तेव्हा वृद्ध गहिवरून म्हणाला, `शिवाजीराजाने आमची शेंडी शाबूत राखली. तोच स्वाभिमान टिकून राहू शकला तो तुमच्यामुळे. तुम्हीच आमचे पांडुरंग' हे ऐकून टिळक निरुत्तर झाले....!

टॅग्स :Lokmanya Tilakलोकमान्य टिळकAshadhi Ekadashiआषाढी एकादशी