शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

वेदकाळानुसार देवी-देवतांची रूपे कशी बदलत गेली, ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 12:49 IST

निसर्गात आणि चराचरात ईश्वर शक्ती सामावलेली आहे आणि हेच अंतिम सत्य आहे. ज्या रूपात तुम्ही देवाला बघाल, त्या रूपात देव दिसेल!

आपले ऋषि मुनी प्रयोगशील प्रतिभावंत होते. त्यांनी आपल्या समाजासाठी, माणसाच्या समाधानासाठी, नैतिक-आध्यात्मिक उन्नतीसाठी परिस्थिती व आवश्यकतेनुसार देवांची रूपे बदलली. त्या देवांवर अनेक रूपककथा लिहिल्या, त्यांचे महात्म्य वर्णन करणारे ग्रंथ लिहिले आणि त्यांच्या आराधनेत बदल केले. त्यांचा परिचय आपण आता कालानुसार करून घेऊ.

वेदकालीन देवता: ऋग्वेदात व अथर्ववेदात ३३ देवता मुख्य मानल्या आहेत. त्यातील ११ आकाशात, ११ पृथ्वीवर व ११ जलात वास्तव्य करून आहेत, असे मानले आहे. अथर्ववेदात त्या स्वर्गात, अंतरिक्षात व पृथ्वीवर राहतात असेही सांगितले आहे. 

दिव्य देवता: उषा, आदित्यगण, विष्णु, विवस्वान, अग्नी, सूर्य, वरुण या तेजस्वी देवता आहेत.

अंतरिक्ष देवता : इंद्र, रुद्र, मरुद्गण, पर्जन्य, वायू इत्यादी देवता अंतरिक्षात राहत असे मानत होते. या काळात प्रथम वरुण हा सर्वश्रेष्ठ देव मानला जाई. इंद्र ही भारतीयांची राष्ट्रीय देवता होती. अवर्षण व अंधकाररूपी दैत्यांवर विजय मिळवून पृथ्वीला पाणी व प्रकाश मिळवून देणे, हे इंद्राचे महत्कार्य होते. तो युद्धदेवही आहे. रुद्र हा मरुतांचा पिता. रुद्र म्हणजे रडवणारा. मरुद्गणांचे कार्य म्हणजे झंझावात निर्माण करून पर्जन्यवृष्टी करणे, हे होय. वायू हा विराट पुरुषाच्या श्वासातून उत्पन्न होतो, अशी त्याची समजूत होती. 

पार्थिव देवता : या पृथ्वीवर राहतात. नद्या, अग्नी, बृहस्पती व सोम आणि सिंधू, गंगा, सरस्वती, यमुना या नद्यारूपी देवता अग्नीला तीन शिरे, तीन जिव्हा, तीन शरीरे व तीन स्थाने (घर, रान आणि पाणी) मानली होती. अग्नी हा गृहपती व अतिथी मानत. बृहस्पती हा पुरोहित आहे.

अमूर्त देव : काम, मन्यू, श्राध्द, अदिती, दिती इ. यांचे ऋग्वेदाच्या उत्तरकाळात मूर्तीकरण झाले.

स्त्रीदेवता : उषा, सरस्वती, वाक रात्री, पूष्णी, इला, राका, सूर्या, इंद्राणी, वरुणाती, रुद्राणी इ. यातील उषेवरील सूक्ते व रमणीय व काव्यमय आहेत.

युग्मदेवता (जोडदेवता) : इंद्राग्नी, मित्रावरुण, द्यावा पृथ्वी इ. इंद्रावरउन हे विश्वाचे राजे होत. त्यांनी जलप्रवाह निर्माण केले. सूर्याला आकाशात भ्रमण करण्यास सांगितले. विष्णू ही देवता ऋग्वेदकाळात चतुर्थश्रेणीची देवता होती. 

एकूणच काय, तर निसर्गात देव पहा हे आपल्या संस्कृतीने आपल्याला शिकवले आहे. कारण आपले जनजीवन निसर्गावर अवलंबून आहे.  तीच जागृती आजही आपण ठेवली, तर निसर्गाचा बिघडलेला समतोल आपल्याला पुन्हा साधता येईल. आपण निसर्गाची काळजी घेतली, तर निसर्गही आपली काळजी घेईल. कारण निसर्गात आणि चराचरात ईश्वर शक्ती सामावलेली आहे आणि हेच अंतिम सत्य आहे. ज्या रूपात तुम्ही देवाला बघाल, त्या रूपात देव दिसेल!