शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
3
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
4
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
5
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
6
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
7
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
8
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
9
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
10
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
11
सेंट जॉर्जेसला लिव्हर ट्रान्सप्लांटचा परवाना; रुग्णालयातील डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

वेदकाळानुसार देवी-देवतांची रूपे कशी बदलत गेली, ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 12:49 IST

निसर्गात आणि चराचरात ईश्वर शक्ती सामावलेली आहे आणि हेच अंतिम सत्य आहे. ज्या रूपात तुम्ही देवाला बघाल, त्या रूपात देव दिसेल!

आपले ऋषि मुनी प्रयोगशील प्रतिभावंत होते. त्यांनी आपल्या समाजासाठी, माणसाच्या समाधानासाठी, नैतिक-आध्यात्मिक उन्नतीसाठी परिस्थिती व आवश्यकतेनुसार देवांची रूपे बदलली. त्या देवांवर अनेक रूपककथा लिहिल्या, त्यांचे महात्म्य वर्णन करणारे ग्रंथ लिहिले आणि त्यांच्या आराधनेत बदल केले. त्यांचा परिचय आपण आता कालानुसार करून घेऊ.

वेदकालीन देवता: ऋग्वेदात व अथर्ववेदात ३३ देवता मुख्य मानल्या आहेत. त्यातील ११ आकाशात, ११ पृथ्वीवर व ११ जलात वास्तव्य करून आहेत, असे मानले आहे. अथर्ववेदात त्या स्वर्गात, अंतरिक्षात व पृथ्वीवर राहतात असेही सांगितले आहे. 

दिव्य देवता: उषा, आदित्यगण, विष्णु, विवस्वान, अग्नी, सूर्य, वरुण या तेजस्वी देवता आहेत.

अंतरिक्ष देवता : इंद्र, रुद्र, मरुद्गण, पर्जन्य, वायू इत्यादी देवता अंतरिक्षात राहत असे मानत होते. या काळात प्रथम वरुण हा सर्वश्रेष्ठ देव मानला जाई. इंद्र ही भारतीयांची राष्ट्रीय देवता होती. अवर्षण व अंधकाररूपी दैत्यांवर विजय मिळवून पृथ्वीला पाणी व प्रकाश मिळवून देणे, हे इंद्राचे महत्कार्य होते. तो युद्धदेवही आहे. रुद्र हा मरुतांचा पिता. रुद्र म्हणजे रडवणारा. मरुद्गणांचे कार्य म्हणजे झंझावात निर्माण करून पर्जन्यवृष्टी करणे, हे होय. वायू हा विराट पुरुषाच्या श्वासातून उत्पन्न होतो, अशी त्याची समजूत होती. 

पार्थिव देवता : या पृथ्वीवर राहतात. नद्या, अग्नी, बृहस्पती व सोम आणि सिंधू, गंगा, सरस्वती, यमुना या नद्यारूपी देवता अग्नीला तीन शिरे, तीन जिव्हा, तीन शरीरे व तीन स्थाने (घर, रान आणि पाणी) मानली होती. अग्नी हा गृहपती व अतिथी मानत. बृहस्पती हा पुरोहित आहे.

अमूर्त देव : काम, मन्यू, श्राध्द, अदिती, दिती इ. यांचे ऋग्वेदाच्या उत्तरकाळात मूर्तीकरण झाले.

स्त्रीदेवता : उषा, सरस्वती, वाक रात्री, पूष्णी, इला, राका, सूर्या, इंद्राणी, वरुणाती, रुद्राणी इ. यातील उषेवरील सूक्ते व रमणीय व काव्यमय आहेत.

युग्मदेवता (जोडदेवता) : इंद्राग्नी, मित्रावरुण, द्यावा पृथ्वी इ. इंद्रावरउन हे विश्वाचे राजे होत. त्यांनी जलप्रवाह निर्माण केले. सूर्याला आकाशात भ्रमण करण्यास सांगितले. विष्णू ही देवता ऋग्वेदकाळात चतुर्थश्रेणीची देवता होती. 

एकूणच काय, तर निसर्गात देव पहा हे आपल्या संस्कृतीने आपल्याला शिकवले आहे. कारण आपले जनजीवन निसर्गावर अवलंबून आहे.  तीच जागृती आजही आपण ठेवली, तर निसर्गाचा बिघडलेला समतोल आपल्याला पुन्हा साधता येईल. आपण निसर्गाची काळजी घेतली, तर निसर्गही आपली काळजी घेईल. कारण निसर्गात आणि चराचरात ईश्वर शक्ती सामावलेली आहे आणि हेच अंतिम सत्य आहे. ज्या रूपात तुम्ही देवाला बघाल, त्या रूपात देव दिसेल!