शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 14:29 IST

Tirumala Tirupati Balaji Venkateshwar Laddu Prasadam Story: तिरुमला तिरुपती लाडू प्रसाद संदर्भात अनेक लोककथा प्रचलित आहेत. कुबेराचे देवावर असलेले कर्ज भाविक आजही फेडत असल्याचे म्हटले जाते. जाणून घ्या...

Tirumala Tirupati Balaji Venkateshwar Laddu Prasadam Story: भारतात हजारो मंदिरे आहेत. पैकी दक्षिणेतील सर्वांत प्रसिद्ध आणि जगातील सर्वाधिक श्रीमंत मंदिरांपैकी एक म्हणजे तिरुमला तिरुपती बालाजी व्यंकटेश्वर मंदिर. तिरुमला तिरुपती देवस्थान येथे प्रसाद म्हणून मिळणारा लाडू जगप्रसिद्ध आहे. सध्या हे लाडू वादात अडकले आहेत. देवस्थानाकडून लाखो लाडू दररोज बनविण्यात येतात. लाडू प्रसादाच्या विक्रीतून मोठा महसूल देवस्थानला मिळतो. या लाडूला जीआय टॅग मिळाले आहे. या लाडूची ऑनलाइनही विक्री होते.

तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता

काजूगर, साखर आणि वेलचीचे ठरलेले प्रमाणच हवे आणि वजन तंतोतंत हवे. लाडू बनविण्यासाठी बेसन, साखरेचा पाक, मनुके आदींचाही वापर होतो. ६०, १७५ आणि ७५० ग्रॅम अशा तीन प्रकारच्या वजनांमध्ये लाडू मिळतो. प्रोक्तम् प्रकारातील लाडू साधारणतः ६० ग्रॅमचे असतात. बहुतांश भाविकांना हेच लाडू दिले जातात. तसेच आस्थानम् प्रकारचे लाडू सणासुदीला तयार होतात, तर कल्याणमहोत्सवम् मध्ये मिळणारा लाडू हा कल्याणमहोत्सवम् मध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांसाठीच तयार केला जातो. ३ ते ५ लाखांपेक्षा जास्त लाडू दररोज बनविण्यात येतात. ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल लाडूविक्रीतून देवस्थानला मिळतो. १५ दिवस हे लाडू टिकतात. ५० रुपयांत मध्यम आकाराचा एक लाडू मिळतो. २०० रुपयांत मोठ्या आकाराचा एक लाडू मिळतो. सन १७१५ पासून तिरुपती येथे प्रसाद म्हणून लाडू देण्यात येत आहे. २०१४मध्ये लाडूला जीआय टॅग मिळाला होता. लाडू प्रसादम् याबाबत अनेक लोककथा प्रचलित आहेत.

बालाजी व्यंकटेश्वर देवावर कुबेराचे कर्ज

तिरुमला तिरुपती मंदिराच्या अनेक अद्भूत गोष्टी सांगितल्या जातात. तसेच अनेक लोककथा प्रसिद्ध आहेत. भगवान व्यंकटेश्वर आणि देवी पद्मावती यांच्या विवाहाशी संबंधित एक कथा आहे. पौराणिक कथेनुसार, भगवान व्यंकटेश्वराने कुबेर यांच्याकडून कर्ज घेतले होते. हे ऋण आजही भाविक फेडत असल्याचे मानले जाते. विशेषत: लाडू प्रसाद या ऋणाशी संबंधित आहे. भक्त देवाला दान देतात आणि त्या बदल्यात प्रसाद रूपात लाडू घेतात. लाडू प्रसाद हा या ऋणाशी निगडीत आहे, कारण तो परमेश्वराच्या भक्तांना आशीर्वाद म्हणून दिला जातो. त्या बदल्यात भक्त त्यांच्या श्रद्धेनुसार दान करतात.

लाडू प्रसाद अद्भूत कथा

तिरुपती मंदिरातील प्रसिद्ध लाडू प्रसादाची आणखी एक कथा सांगितली जाते. तिरुपती बालाजी मंदिरात व्यंकटेश्वराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात होती, तेव्हा देवाला काय अर्पण करावे हे पुजाऱ्यांना समजत नव्हते. त्याचवेळी एक वृद्ध आई लाडू असलेले ताट घेऊन आली आणि नैवेद्य म्हणून हे लाडू अर्पण करण्यास सांगितले. पुजाऱ्यांनी लाडू देवाला अर्पण केले आणि नंतर प्रसाद म्हणून ग्रहण केले. लाडू इतके अप्रतिम चविष्ट होते की, पूजा करणाऱ्याला आश्चर्य वाटले. मग वृद्ध आईला लाडू कसे बनवायचे ते विचारले. वृद्ध आईने लाडू कसे बनवायचे ते सांगितले. काही क्षणातच अंतर्धान पावली. या घटनेनंतर असे मानले जाते की, देवी लक्ष्मीने स्वतः लाडू नैवेद्य अर्पण करण्यास मदत केली होती. तेव्हापासून हे लाडू तिरुपती बालाजीमध्ये बनवले जाऊ लागले.

सर्व मनोकामना पूर्ण होतात

तिरुपती लाडू खूप शुभ आणि पवित्र मानले जातात. असे मानले जाते की, या प्रसादाचे सेवन केल्याने भगवान व्यंकटेश्वराचा आशीर्वाद प्राप्त होतो. तिरुमला तिरुपती लाडू हा व्यंकटेश्वर बालाजी देवाच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे. तिरुपती लाडू हा केवळ स्वादिष्ट प्रसादच नाही तर त्यामागे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वही आहे. बालाजी व्यंकटेश्वरांकडून प्रसाद म्हणून लाडू ग्रहण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी ती स्वीकारण्यामागील भाविकांची श्रद्धा आहे.

 

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटspiritualअध्यात्मिकAndhra Pradeshआंध्र प्रदेश