शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कीर्तनाचे नि नटनाचे..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 15:59 IST

कीर्तन ही मानवाला महामानव बनविणारी अद्भुत भक्ती आहे. या भक्तीची शक्ती संतांनी ओळखली आणि पंढरीच्या वाळवंटातील ममतेच्या तीरावर समतेचे नंदनवन फुलवले.

- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र ) 

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात कीर्तन भक्तीचे स्थान हे अनन्यसाधारण आहे. समाज जीवनात दया, दाक्षिण्य, परोपकार, बंधुता, एकता, समता, विश्वात्मक भाव या मानवी मूल्यांचा विचार आचार संपन्न व्हावा आणि समाज धारणा साध्य व्हावी, ह्यासाठी महाराष्ट्रातील संतांनी कीर्तनासारखे प्रभावी माध्यम निवडले.

खरं तर कीर्तन ही मानवाला महामानव बनविणारी अद्भुत भक्ती आहे. या भक्तीची शक्ती संतांनी ओळखली आणि पंढरीच्या वाळवंटातील ममतेच्या तीरावर समतेचे नंदनवन फुलवले.

यारे यारे लहान थोर । याती भलते नारी नर ॥

अशी आर्ततेने सर्वांना साद घातली. वर्णद्वेषाच्या, जातीयतेच्या, गरीब-श्रीमंतीच्या, अहंकाराच्या आणि विकाराच्या तटभिंती जमीनदोस्त केल्या.

आपण सारी एकाच ईश्वराची लेकरं आहोत, मग आपापसांत हा वैरभाव कशाला..? हा भावानुभव कीर्तनभक्तीतूनच समाजाच्या अंतरंगात रुजविला.

नामसंकीर्तन साधन पै सोपे । जळतील पापे जन्मांतरीची ।न लगे सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण ॥

हा आत्मविश्वास जनमनांत जागवून विहीत कर्मातूनसुद्धा ईशतत्वाकडे जाता येते, असा दिव्य संदेश संत, महंतांनी कीर्तनभक्तीतूनच दिला.

ज्या काळात आजच्यासारख्या, किराणा दुकाने थाटावीत अशा शिक्षणसंस्था नव्हत्या, ज्ञानाची कवाडे सर्वांसाठी मुक्त नव्हती, अशा दुर्घट काळात आबालवृद्धांच्या मुखात रामायण-महाभारतातील सुबोधकथा रंगत गेल्या त्याही कीर्तनभक्तीतूनच. आचार, विचार आणि उच्चार याला विवेकाचे भान देण्याचे काम वर्षानुवर्षे याच कीर्तनभक्तीने केले. पाखंडाचे खंडण, धर्माचे मंडण करण्याचे काम याच कीर्तनभक्तीतून संतांनी केले. समाजात ईश्वरनिष्ठांची मांदियाळी निर्माण केली. कीर्तन ही माणसा माणसातला ईश्वर जागा करणारी आणि माणसाला ईश्वराप्रत नेणारी सर्वश्रेष्ठ भक्ती आहे.

आज ही समाज जीवनात कीर्तन भक्तीचे स्थान अनन्यसाधारण आहे. याचं कीर्तन भक्तीला ज्ञानोबा, नामदेव आदि संतांनी परमोच्च स्थान प्राप्त करून दिले.

नाचू कीर्तनाचे रंगी ।  ज्ञानदीप लावू जगी ।सर्व सांडूनी माझा ही । वाचे विठ्ठल रखुमाई ॥

असे वर्णन नामदेवांनी केले. कीर्तन हे ऐहिक आणि पारलौकिक कल्याणाचे श्रेष्ठतम साधन आहे..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक