शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

कुटुंबात वरचेवर होणाऱ्या वादाला घरात लावलेली 'ही' चित्र तर बाधक ठरत नाहीयेत ना? तपासून पहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 15:29 IST

तुमच्या घरात सुख-शांती राहावी असे वाटत असेल तर घरात काही वस्तू कधीही आणू नका. अशा गोष्टी आणल्याने कौटुंबिक त्रास तर वाढतोच पण तुम्ही दारिद्रयातही लोटले जाऊ शकता.

अनेकदा तुम्ही घरात काही नवीन वस्तू खरेदी करता आणि काही दिवसांनी अचानक कुटुंबात कलह सुरू होतो, असा अनुभव घेतला आहे का? हसतं, खेळतं, आनंदी कुटुंब एकएक वादाच्या भोवऱ्यात अडकते आणि कुटुंबाची उतरती कळा सुरू होते. यालाच वास्तू दोष म्हणतात. हे दोष घरातील अनावश्यक वस्तूंमुळे देखील निर्माण होऊ शकतात. 

शस्त्रांचे फोटो लावू नका 

तलवार, चाकू, भाला, बंदूक, तोफ अशा युद्धभूमीवर वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांचे फोटो घरात लावू नका. त्यामुळे मनात हिंसक विचार येतात. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची शांतता भंग पावते आणि घरगुती कलह वाढतो. ही चित्रे वारंवार पाहून तुमचा स्वभाव संतप्त होतो, या उद्विग्न मनस्थितीमुळे वाद विकोपाला जाऊ शकतात. त्यामुळे अशी चित्रे घरात कधीही आणू नयेत.

ताजमहालाचे चित्र किंवा मूर्ती ठेवू नका. 

बरेच लोक आपल्या घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी ताजमहालचे फोटो लावतात. असे करणे पूर्णपणे चुकीचे आहे. खरं तर, ताजमहाल ही मृतदेहावर बांधलेली समाधी आहे, ज्याला वास्तुशास्त्रात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. या चित्रातून पती-पत्नीमधील प्रेम वाढण्याऐवजी अंतर वाढवण्याचा विचार मनात येतो. त्यामुळे या चित्राला घरात कधीही स्थान देऊ नये.

गूढ फोटो लावणे टाळा 

काही लोक सर्जनशीलतेच्या नावाखाली आपल्या घरात भूत किंवा रहस्यमय ठिकाणांची छायाचित्रे लावतात. या कल्पनेला नाविन्य असे नाव दिले जाऊ शकते, परंतु सत्य हे आहे की घरात नकारात्मक ऊर्जा संचारू लागते. त्यामुळे कुटुंबातील सदस्य विचित्र त्रासात अडकू लागतात. जे घरात राहणाऱ्या लोकांसाठी वेदनादायी आहे. त्यामुळे तुमच्या घरातही असे चित्र असेल तर ते लगेच काढून टाका.

महाभारताचे चित्र लावणार असाल तर... 

घरामध्ये महाभारताशी संबंधित चित्र कधीही लावू नका. वास्तविक महाभारत हे कौटुंबिक युद्ध होते, जे कौरव आणि पांडव यांच्यात झाले होते. महाभारतातील चित्र कुटुंबातील संघर्षाची भावना वाढवते. वास्तुशास्त्रानुसार महाभारताचे चित्र घरातील सुख-शांतीमध्ये बाधक आहे. त्यामुळे त्याला घरात स्थान देणे टाळले पाहिजे. त्यामुळे चित्र लावायचेच असेल तर कृष्ण आणि अर्जुनाचे लावा. परंतु रणभूमीचे नको. 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र