शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

कुटुंबात वरचेवर होणाऱ्या वादाला घरात लावलेली 'ही' चित्र तर बाधक ठरत नाहीयेत ना? तपासून पहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 15:29 IST

तुमच्या घरात सुख-शांती राहावी असे वाटत असेल तर घरात काही वस्तू कधीही आणू नका. अशा गोष्टी आणल्याने कौटुंबिक त्रास तर वाढतोच पण तुम्ही दारिद्रयातही लोटले जाऊ शकता.

अनेकदा तुम्ही घरात काही नवीन वस्तू खरेदी करता आणि काही दिवसांनी अचानक कुटुंबात कलह सुरू होतो, असा अनुभव घेतला आहे का? हसतं, खेळतं, आनंदी कुटुंब एकएक वादाच्या भोवऱ्यात अडकते आणि कुटुंबाची उतरती कळा सुरू होते. यालाच वास्तू दोष म्हणतात. हे दोष घरातील अनावश्यक वस्तूंमुळे देखील निर्माण होऊ शकतात. 

शस्त्रांचे फोटो लावू नका 

तलवार, चाकू, भाला, बंदूक, तोफ अशा युद्धभूमीवर वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांचे फोटो घरात लावू नका. त्यामुळे मनात हिंसक विचार येतात. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची शांतता भंग पावते आणि घरगुती कलह वाढतो. ही चित्रे वारंवार पाहून तुमचा स्वभाव संतप्त होतो, या उद्विग्न मनस्थितीमुळे वाद विकोपाला जाऊ शकतात. त्यामुळे अशी चित्रे घरात कधीही आणू नयेत.

ताजमहालाचे चित्र किंवा मूर्ती ठेवू नका. 

बरेच लोक आपल्या घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी ताजमहालचे फोटो लावतात. असे करणे पूर्णपणे चुकीचे आहे. खरं तर, ताजमहाल ही मृतदेहावर बांधलेली समाधी आहे, ज्याला वास्तुशास्त्रात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. या चित्रातून पती-पत्नीमधील प्रेम वाढण्याऐवजी अंतर वाढवण्याचा विचार मनात येतो. त्यामुळे या चित्राला घरात कधीही स्थान देऊ नये.

गूढ फोटो लावणे टाळा 

काही लोक सर्जनशीलतेच्या नावाखाली आपल्या घरात भूत किंवा रहस्यमय ठिकाणांची छायाचित्रे लावतात. या कल्पनेला नाविन्य असे नाव दिले जाऊ शकते, परंतु सत्य हे आहे की घरात नकारात्मक ऊर्जा संचारू लागते. त्यामुळे कुटुंबातील सदस्य विचित्र त्रासात अडकू लागतात. जे घरात राहणाऱ्या लोकांसाठी वेदनादायी आहे. त्यामुळे तुमच्या घरातही असे चित्र असेल तर ते लगेच काढून टाका.

महाभारताचे चित्र लावणार असाल तर... 

घरामध्ये महाभारताशी संबंधित चित्र कधीही लावू नका. वास्तविक महाभारत हे कौटुंबिक युद्ध होते, जे कौरव आणि पांडव यांच्यात झाले होते. महाभारतातील चित्र कुटुंबातील संघर्षाची भावना वाढवते. वास्तुशास्त्रानुसार महाभारताचे चित्र घरातील सुख-शांतीमध्ये बाधक आहे. त्यामुळे त्याला घरात स्थान देणे टाळले पाहिजे. त्यामुळे चित्र लावायचेच असेल तर कृष्ण आणि अर्जुनाचे लावा. परंतु रणभूमीचे नको. 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र