शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबात वरचेवर होणाऱ्या वादाला घरात लावलेली 'ही' चित्र तर बाधक ठरत नाहीयेत ना? तपासून पहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 15:29 IST

तुमच्या घरात सुख-शांती राहावी असे वाटत असेल तर घरात काही वस्तू कधीही आणू नका. अशा गोष्टी आणल्याने कौटुंबिक त्रास तर वाढतोच पण तुम्ही दारिद्रयातही लोटले जाऊ शकता.

अनेकदा तुम्ही घरात काही नवीन वस्तू खरेदी करता आणि काही दिवसांनी अचानक कुटुंबात कलह सुरू होतो, असा अनुभव घेतला आहे का? हसतं, खेळतं, आनंदी कुटुंब एकएक वादाच्या भोवऱ्यात अडकते आणि कुटुंबाची उतरती कळा सुरू होते. यालाच वास्तू दोष म्हणतात. हे दोष घरातील अनावश्यक वस्तूंमुळे देखील निर्माण होऊ शकतात. 

शस्त्रांचे फोटो लावू नका 

तलवार, चाकू, भाला, बंदूक, तोफ अशा युद्धभूमीवर वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांचे फोटो घरात लावू नका. त्यामुळे मनात हिंसक विचार येतात. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची शांतता भंग पावते आणि घरगुती कलह वाढतो. ही चित्रे वारंवार पाहून तुमचा स्वभाव संतप्त होतो, या उद्विग्न मनस्थितीमुळे वाद विकोपाला जाऊ शकतात. त्यामुळे अशी चित्रे घरात कधीही आणू नयेत.

ताजमहालाचे चित्र किंवा मूर्ती ठेवू नका. 

बरेच लोक आपल्या घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी ताजमहालचे फोटो लावतात. असे करणे पूर्णपणे चुकीचे आहे. खरं तर, ताजमहाल ही मृतदेहावर बांधलेली समाधी आहे, ज्याला वास्तुशास्त्रात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. या चित्रातून पती-पत्नीमधील प्रेम वाढण्याऐवजी अंतर वाढवण्याचा विचार मनात येतो. त्यामुळे या चित्राला घरात कधीही स्थान देऊ नये.

गूढ फोटो लावणे टाळा 

काही लोक सर्जनशीलतेच्या नावाखाली आपल्या घरात भूत किंवा रहस्यमय ठिकाणांची छायाचित्रे लावतात. या कल्पनेला नाविन्य असे नाव दिले जाऊ शकते, परंतु सत्य हे आहे की घरात नकारात्मक ऊर्जा संचारू लागते. त्यामुळे कुटुंबातील सदस्य विचित्र त्रासात अडकू लागतात. जे घरात राहणाऱ्या लोकांसाठी वेदनादायी आहे. त्यामुळे तुमच्या घरातही असे चित्र असेल तर ते लगेच काढून टाका.

महाभारताचे चित्र लावणार असाल तर... 

घरामध्ये महाभारताशी संबंधित चित्र कधीही लावू नका. वास्तविक महाभारत हे कौटुंबिक युद्ध होते, जे कौरव आणि पांडव यांच्यात झाले होते. महाभारतातील चित्र कुटुंबातील संघर्षाची भावना वाढवते. वास्तुशास्त्रानुसार महाभारताचे चित्र घरातील सुख-शांतीमध्ये बाधक आहे. त्यामुळे त्याला घरात स्थान देणे टाळले पाहिजे. त्यामुळे चित्र लावायचेच असेल तर कृष्ण आणि अर्जुनाचे लावा. परंतु रणभूमीचे नको. 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र