शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
5
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
6
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
7
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
8
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
9
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
10
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
11
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
12
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
13
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
14
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
15
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
16
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
17
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
18
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
19
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
20
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप

Independence Day 2024: स्वतंत्र भारतातला तरुण 'टेन्शन फ्री' व्हावा म्हणून कपिल देव यांनी दिला अनमोल सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 10:58 IST

Independence Day 2024: १५ ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो, मात्र आज आपण नैराश्य, ताण, वाद यांच्या बंधनात अडकलो आहोत; त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग!

भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. याचाच अर्थ आपल्या देशात तरुणांची संख्या जास्त आहे. म्हणजेच देशाला प्रगती पथावर नेण्यासाठी होतकरू, सक्षम तरुणांची पुढची फळी तयार आहे. मात्र हेच तरुण जेव्हा नैराश्य, ताणतणावाचे अवडंबर करत जबाबदारी झटकतात, आत्मसमर्पण करून मोकळे होतात किंवा नशाबाज होऊन, रिकामटेकडेपणा करून समाजासाठी उपद्रवी मूल्य होतात, तेव्हा देशाला तरुणांचा देश संबोधताना जीभ चाचरते. याबद्दलच राग व्यक्त केला आहे सुप्रसिद्ध क्रिकेट खेळाडू कपिल देव यांनी. 

एका कार्यक्रमात कपिल देव यांच्या संभाषणाचा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिला. अवघ्या एक मिनिटाच्या व्हिडीओमध्ये त्यांनी तरुण पिढीची कानउघडणी तर केली आहेच शिवाय त्यांच्या यशाचं गुपीतही सांगितले आहे. 

ते म्हणतात, 'हल्ली आयपीएल मॅच खेळणारे खेळाडू सतत तणावाखाली असतात. आमच्यावर खूप प्रेशर आहे असे म्हणतात. यावर उपाय काय असे मला विचारतात तेव्हा मी त्यांना सांगतो, 'नका खेळू!' कारण, तणाव घेऊन केली जाणारी गोष्ट कधीच यशस्वी होत नसते. आम्ही सुद्धा कित्येक मॅच खेळल्या, पण कधी तणाव घेऊन खेळल्याचे आठवत नाही. कारण आम्ही खेळायचो ते आनंदासाठी. त्यातही प्रतिपक्षाशी स्पर्धा होती, चढाओढ होती, पण तणावाचे वातावरण अजिबात नव्हते. प्रयत्नांची शर्थ करून खेळणे एवढेच आमचे कर्तव्य होते व ते आम्ही चोखपणे बजावत असू. 

याउलट आताची शाळकरी, महाविद्यालयीन मुलंसुद्धा म्हणतात, आम्हाला टेन्शन येतं, डिप्रेशन येतं, प्रेशर येतं...! वातानुकूलित वर्गात बसून, शिक्षकांचा मार न खाताही मुलं या गोष्टींना सामोरे जातात, हे ऐकून मला प्रश्न पडतो, यांचे आई वडील कमावतात, ते यांची फी भरतात, यांना हवं नको ते सगळं पुरवतात, मग फक्त अभ्यासाची जबाबदारी मुलांवर असताना त्यांना प्रेशर घेण्याचे कारण काय हेच कळत नाही. हे पाश्चिमात्य शब्द आपले नाहीच, कधी नव्हतेच! 

मी स्वतः शेतकरी आहे आणि मी क्रिकेट खेळलो ते माझ्या आनंदासाठी. जोवर तुम्ही तुमचा आनंद शोधत नाही, तोवर हे भयावह शब्द तुमचा पाठलाग सोडणार नाहीत. जे काम कराल ते आनंदाने करा. हे शब्द आपले नाहीत, ते विसरून जा. कामाप्रती असलेले समर्पण तुम्हाला निराश होण्याची संधी देणार नाही. अपयश आले तरी आपण पूर्ण प्रयत्न केले असल्याचे समाधान तुम्हाला नवीन यश संपादन करण्याची प्रेरणा देत राहील. 

आनंद शोधण्याचे अनेक क्षण आपल्या संस्कृतीने आपल्याला दिले आहेत. इथला प्रत्येक दिवस उत्सवाचे रूप घेऊन येतो. तसे असताना दुःखी, कष्टी राहून कुढत आयुष्य जगण्यापेक्षा प्रयत्नांचे पंख लावा आणि आत्मानंद घ्या, असे सांगण्यावर कपिल देव यांचा भर दिसून येतो. हेच सूत्र त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनुसरले आणि ते यशस्वी झाले. त्यांचा आदर्श बाळगून आपल्यालाही मार्गक्रमणा करायला हवी. बरोबर ना?

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीMental Health Tipsमानसिक आरोग्यKapil Devकपिल देव