शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

आपल्या व्यक्तिमत्त्वाला अहंकाराचा दर्प येऊ नये असे वाटत असेल तर 'या' तीन गोष्टी समजून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 07:00 IST

'गर्वाचे घर खाली' हे आपण बालपणीच शिकलो, पण मोठेपणी आकाशाला हात लागले तरी पाय जमिनीवर ठेवण्यासाठी दिलेले नियम पाळा. 

संत नामदेव म्हणतात, 'अहंकाराचा वारा न लागो राजसा!' का? कारण अहंकार हे सर्व दु:खाचे मूळ आहे. गंमत म्हणजे अहंकार झालेल्या व्यक्तीला आपण अहंकारी आहोत, हेच कळत नाही आणि लोक सांगतात ते पटत नाही. म्हणून आपण अहंकारापासून मुक्त आहोत की नाही, याची स्वत: चाचपणी केली पाहिजे.

देवी भागवतात सांगितले आहे, संसार नाशाचे मूळ कारण अहंकार आहे. धर्म विनाशाचे कारणही अहंकार आहे. अहंकार आपल्या मनात असुरक्षित भावनेला जन्म देतो. अहंकार यशप्राप्तीतून येतो, पण त्याचवेळेस अपयशाची भीती मनाला पोखरत जाते. जेवढा मोठा अहंकार तेवढी जास्त असुरक्षितता!

सर्वांना माहित आहे, प्रत्येकाला एक ना एक दिवस या विश्वाचा निरोप घ्यायचा आहे. तरी स्वत:च्या नावाभोवती मोठे वलय निर्माण करण्याची धडपड कशासाठी? कोणासाठी? कालचक्र फिरत राहते. त्रिकालबाधित काही राहणार असेल, तर ते म्हणजे भगवंताचे नाम! हे माहित असूनही लोक स्वत:ला सर्वश्रेष्ठ म्हणवून घेण्यासाठी धडपडत राहतात. जर तुम्ही स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजत असाल, तर तुमच्या मनाला कोणत्याही गोष्टीची भीती वाटता कामा नये. जर तुम्ही मनोमन घाबरत असाल, एखादी चिंता तुमच्या मनाला सलत असेल, तर लक्षात घ्या, आपण वृथा अभिमान बाळगत आहोत. आपल्यातील अहंकार ओळखण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. ज्यादिवशी मन भयमुक्त होईल, त्यादिवशी आपल्यातून अहंकाराचा लवलेश निघून गेला, असे म्हणता येईल.

स्वत: सिद्ध करण्यासाठी आज प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत आहे. अशात अपयश आले, तर ते तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही आणि यश आले, तरी ते तुम्हाला गर्वाने भरून टाकेल. यश-अपयशाकडे जेव्हा आपण समतेने बघायला शिकू, तेव्हा आपण अहंकाराला हरवू शकू. जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात, मन, बुद्धी, चित्त, अहंकार या तत्त्वांमध्ये मी नाही, मी आहे तो केवळ परमात्म्याच्या ठायी!

ब्रह्म आणि अहंकार हे दोघे परस्परविरोधी आहेत. अहंकारी व्यक्ती ब्रह्नाची प्रचिती घेऊ शकत नाही. ब्रह्म म्हणजे सहजता. आपण जसे आहोत, तसा स्वत:चा स्वीकार करणे. आपल्या हातून झालेल्या चुकांची सहजतेने क्षमा मागणे आणि दुसऱ्यांकडून झालेल्या चुकांना सहजतेने क्षमा देणे, हेच ब्रह्मज्ञान आहे. या तीन गोष्टी ज्यांनी समजून घेतल्या त्यांना अहंकार कधीच स्पर्श करू शकणार नाही.