शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

कोरोना संकट काळात गरिबांची मदत कशी कराल?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 3:56 PM

कोरोना विषाणू महामारीमुळे भारताच्या सर्वात गरीब वर्गाचा भाग असलेल्या स्थलांतरित मजूर आणि दैनिक वेतन असलेल्या कामगार वर्गाला मोठ्या संकटात टाकणारी परिस्थिति निर्माण होत आहे. आपण समाजाचा एक भाग म्हणून त्यांची मदत करण्यासाठी समोर यायला हवे; त्याचवेळी आपण विषाणूचे वाहक होणार नाही याची काळजी सुद्धा घ्यायला हवी.

सद्‌गुरु: भारतात या विषाणू मुळे निर्माण झालेली एक मोठी चिंता गरीब आणि दैनिक वेतन कामावणार्‍या कामगार वर्गाची आहे. सुदैवाने भारत सरकारने शेतकरी, कामगार आणि मजूर लोकांसाठी तीन महीने आधार देऊ शकेल असं एक विस्तृत पॅकेज बनवलं आहे. याचा अर्थ असा नाही की त्यांच्या सगळ्याच अडचणी मिटतील, पण या लोकांना किमान भुखमरीला तरी सामोरे जावे लागणार नाही. पण तरीही बरेचशे लोक कुठल्याच पॅकेज मध्ये कदाचित बसणार नाहीत आणि त्यांच्यापर्यंत या सेवा पोचणार नाहीत. अश्यावेळी समाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे.

भारताचे नागरिक म्हणून कोणी भुखमरीला तर सामोरे जात नाहीत ना, याकडे आपण डोळे उघडे ठेऊन लक्ष देऊ या. जर कोणी तशा परिस्थितीचा सामना करताना दिसला तर आपण त्यांना आधार कसा देऊ शकू हे बघायलाच हवं – आपल्या स्वत:च्या हिमतीवर किंवा किमान इतरांच लक्ष त्यांच्याकडे वेधून. आपण स्वत:ला असं वचन देऊ या की भूक हे दू:खाचं आणि मृत्युचं कारण आपण ठरू देणार नाही. ही आपली जिम्मेदारी आहे. बाहेर आधीच खूप सार्‍या समस्या आहेत, आपण आपलं जीवन सुद्धा यातनदायक बनवायला नको.

स्थलांतरित मजुरांची दैना

आतापर्यंत दक्षिण भारतामध्ये विषाणूचा प्रभाव जास्त दिसून आलेला नाही. पण ग्रामीण भागातून मोठ्या शहरात स्थलांतरित झालेले मजूर आपल्या गावी परत जाण्यासाठि उतावीळ झाले आहेत. अश्या प्रकारे स्थलांतरीत झालेल्यांमद्धे पुरुषांचीच संख्या जास्त दिसून येते. बहुतेक वेळी त्यांच्याकडे जमिनीचा एखादा तुकडा असतो; ते शहारामध्ये वर्षातले ६-८ महीने काम करत असतांना त्याच्याकडे त्यांच्या घरच्या बायका लक्ष देतात. पण आता त्यांना माहिती आहे की शहरात काही काम मिळणार नाही, तिथे जीवाचा धोका आहे आणि त्यांच कुटुंब कसं आहे हे देखील त्यांना माहीत नाही. सरकार त्यांच्यासाठी वसतिगृह, जेवण अश्या सुविधा बनवण्याचा प्रयत्न करते आहे पण त्यांना मात्र घरीच जायचंय. शहराकडून त्यांचे लोंढेच्या लोंढे गावाकडे परतंत आहेत. त्यांच्या भावना आपण समजू शकतो पण ते दुर्दैवाने ते विषाणू सुद्धा आपल्या सोबत शहारा कडून ग्रामीण भागाकडे घेऊन जाऊ शकतात. मी आशा करतो की त्यांनी खूप सारी लागण आतापर्यंत गावाकडे नेली नाहीये आणि जास्त नुकसान नं करता ही परिस्थिति टळेल.ईशा फाऊंडेशनचं योगदान

या जास्त लांबलेल्या लॉक-डाऊनमुळे अश्या असाहाय आणि असमर्थ लोकांची संख्या खूप वाढेल. आपले खूप सारे तरुण स्वयंसेवक खेड्यांमद्धे जाऊन तिथे काय करता येणं शक्य आहे ते बघत आहेत. ते योगा सेंटर मधून बाहेर पडत आहेत म्हणजे आता त्यांना हे सगळं संपल्याशिवाय इथं परत येता येणार नाही. आणि परत आल्यानंतर त्यांना १४ ते २८ दिवसांसाठी विलग ठेवण्यात येईल. हा एक प्रकारचा वनवासच आहे.

आपले स्वयंसेवक या भागात जेवण देऊ करत आहेत. आपण इतर सगळ्या गोष्टी पुढे ढकलू शकतो – दोन वेळचं जेवण सोडून. जे काही त्यांचं नेहमीच्या सवयीचं जेवण आहे ते तर आपण त्यांना देऊ शकत नाही पण किमान दोन वेळ पोट भरेल इतपत आपण देत आहोत. यासाठी जागेची जुळवाजुळव, मनुष्यबळ, किराणा सामान आणि भाजीपाला खरेदी इत्यादि गोष्टी युद्धं पातळीवर सुरू आहेत.आणि आपल्या चीन मधल्या स्वयंसेवकांनी मास्क, ग्लव्हज, वैद्यकीय कर्मचार्‍यांसाठी सुरक्षा सूटस अशी वैद्यकीय मदत आपल्याला पाठवली आहे. पण सगळ्यात मोठी समस्या औषध पुरवठा करण्याची होणार आहे जो आपल्याला कदाचित फार मोठ्या प्रमाणावर लागू शकतो.

आपल्यावरचा आर्थिक भार वाढतच जाणार आहे. खूप सार्‍या लोकांनी भरपूर यगदान करून मदतीचा हात दिलाय. यापुढेही आम्हाला सतत मदतीची अपेक्षा आहे कारण ही स्थिति लवकर आटोक्यात येणारी नाहीये.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या