शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

कसं घडवाल स्वतःमध्ये परिवर्तन? जाणून घ्या शक्तीशाली मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 07:24 IST

आपण जाणीवपूर्वक, आपल्याला जसं असावंसं वाटतं तशी एक नवीन स्व-प्रतिमा का निर्माण करत नाही? तुम्ही जर पुरेसे बुद्धिमान असाल, तर तुम्ही तुमची प्रतिमा, एक संपूर्ण नवीन प्रतिमा, अगदी तुम्हाला हवी त्याप्रमाणे नव्याने निर्माण करू शकता.

प्रत्येक मनुष्य, जाणतेपणे किंवा अजाणता, आयुष्याच्या प्रक्रियेतून वाटचाल करताना, स्वतःची एक विशिष्ट अशी प्रतिमा किंवा व्यक्तिमत्व तयार करतो. तुम्ही स्वतःमध्ये निर्माण केलेली या प्रतिमेचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाहीये. त्याचा तुमच्या अस्तित्वाशी, तुमच्या आंतरिक स्वरूपाशी काहीही संबंध नाही. ही तुम्ही, बहुतेकदा अजाणतेपणे तयार केलेली एक विशिष्ट अशी प्रतिमा आहे. प्रत्येकाची ते जे कोणी आहेत त्याबद्दलची स्वतःची एक प्रतिमा आहे. अतिशय थोड्या माणसांनी स्वतःची प्रतिमा जाणीवपूर्वक निर्माण केली आहे. इतर सर्वांनी ते ज्या ज्या प्रकारच्या बाह्य वृत्ती, परिस्थितीत ते पडले त्यानुसार त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केलेली आहे.

तर मग, आपण जाणीवपूर्वक, आपल्याला जसं असावंसं वाटतं तशी एक नवीन स्व-प्रतिमा का निर्माण करत नाही? तुम्ही जर पुरेसे बुद्धिमान असाल, तर तुम्ही तुमची प्रतिमा, एक संपूर्ण नवीन प्रतिमा, अगदी तुम्हाला हवी त्याप्रमाणे नव्याने निर्माण करू शकता. हे शक्य आहे. पण तुमच्या जुन्या प्रतिमेमधून बाहेर पडण्यासाठी तुम्ही तयार असायला हवं. हे नाटक नाही. अजाणतेपणे कृती करण्यापेक्षा, तुम्ही जाणीवपूर्वक कृती करा. तुम्हाला सर्वोत्तम प्रकारे साथ देणारी प्रतिमा तुम्ही निर्माण करू शकता, एक अशी प्रतिमा जी तुमच्या भोवताली सर्वाधिक सुसंवाद, सुसंगत असेल, अशी प्रतिमा ज्यात कमीतकमी घर्षण, संघर्ष असेल. तुम्ही एक अशी प्रतिमा निर्माण करा जी तुमच्या आंतरिक स्वरुपाच्या अतिशय जवळची आहे. तुमच्या आंतरिक स्वरूपाशी सर्वाधिक सुसंगत प्रतिमा कोणती आहे असे तुम्हाला वाटते? हे लक्षात घ्या, की तुमचे आंतरिक स्वरूप अतिशय निश्चल, शांत आहे, आक्रमक नाही, परंतु अतिशय बलशाली असते. अतिशय सूक्ष्म पण तरीही अतिशय शक्तिशाली. म्हणून आता तुम्हाला तेच करणे आवश्यक आहे: तुमच्यामधील स्थूल, बोजड घटक; जसे की – तुमचा राग, तुमच्या संकुचित मर्यादा मोडून टाकायला हव्यात. आपली एक नवीन प्रतिमा निर्माण करा, जी सूक्ष्म पण अतिशय शक्तिशाली असेल.

पुढील एक दोन दिवस यावर विचार करा आणि स्वतःची एक योग्य अशी प्रतिमा तयार करा; जी तुमचे विचार आणि भावनांच्या मूलभूत स्वरूपानुसार असावी. आपण हे निर्माण करण्याआधी, अगोदर खरोखर हे तपासून पाहूया, की आपण आता जे निर्माण करणार आहोत ते आपण आज जे आहोत त्यापेक्षा अधिक चांगले आहे का. तुम्हाला व्यत्यय येणार नाहीत अशी एक वेळ निवडा. पाठ टेकवून आरामात बसा. आता डोळे मिटून घ्या आणि इतर लोकांनी तुम्हाला कसे अनुभवावे याची कल्पना करा. एक पूर्णतः नवीन मनुष्य निर्माण करा. शक्य तितक्या तपशीलांसह त्याच्याकडे पहा. ही नवीन प्रतिमा अधिक मानवी, अधिक कार्यक्षम, अधिक प्रेमळ आहे का हे पाहा.

तुम्हाला शक्य असेल तितक्या शक्तीने या प्रतिमेची कल्पना करा. तुमच्या स्वतःमध्ये ती जीवंत करा. तुमचे विचार जर पुरेसे शक्तीशाली असतील, तुमची कल्पनाशक्ती जर पुरेशी शक्तीशाली असेल, तर ती अगदी तुमची कर्म बंधने सुद्धा मोडू शकेल. तुम्हाला जसे बनायचे आहे त्याची शक्तीशाली कल्पना निर्माण करून कर्माच्या मर्यादा मोडता येऊ शकतात. तुमचे विचार, भावना आणि कृतींच्या मर्यादा पार करून पुढे जाण्याची ही एक सुवर्णसंधी आहे.