शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
2
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
3
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
4
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
5
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
6
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
7
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
8
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
9
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
10
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
11
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
12
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
13
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
14
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
15
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
16
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
17
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
18
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
19
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
20
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
Daily Top 2Weekly Top 5

Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 13:11 IST

Health And Ritual: तुमची झोप कशी आहे यावर तुमचे आरोग्य ठरते, रात्रीची झोप जेवढी महत्त्वाची तेवढीच दुपारचीही; पण किती वेळ घ्यावी? कोणते लाभ होतात? पाहू. 

दुपारी जेवण झाल्यावर जांभई येते, डोळे पेंगतात, एक झोप काढावीशी वाटते? खुशाल काढा. तो आपला हक्कच आहे. कारण दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी हा प्रत्येकाचा हक्क आहे. फक्त ती झोप १-४ नसावी. याबाबत आपले पूर्वज किती सतर्क होते ते जाणून घेऊ. 

बालपणी जेवणाआधी, जेवताना, जेवणानंर आईच्या सूचना सुरूच असत. त्यावेळी जाचक वाटणाीऱ्या गोष्टी आयुष्यभरासाठी सुदृढ आरोग्याचा कानमंत्र होता, हे मोठेपणी लक्षात येते. बालपणीच चांगल्या सवयी अंगवळणी पडल्या, की आयुष्यभर आरोग्याची हेळसांड होत नाही. त्या सवयीतला मुख्य भाग जेवणाचा. जेवायच्या आधी हात धुवून ये, एक घास बत्तीस वेळा चावून खा, श्लोक म्हण, जेवताना बोलू नको, जेवताना पाणी पिऊ नको, जेवणाच्या ताटात अन्न टाकू नको, ताटाभोवतीची शिते जमीनिवर ठेवू नको, जेवणानंतर स्वच्छ चूळ भर, शतपावली कर, थोडी विश्रांती घे आणि मग पुढच्या कामाला लाग, या सूचनांचे आजही आपण शक्य तसे पालन करतो. वरील सूचनेतील प्रत्येक वाक्य, हे स्वतंत्र लेखाचा विषय आहे. तुर्तास आपण शतपावली आणि वामकुक्षीचे महत्त्व समजून घेऊ. 

आपण आपल्या आजोबांना जेवणानंतर शतपावली मारताना पाहिले असेल. आजच्या काळात आपण त्याला नाईट वॉक म्हणतो, एवढाच काय तो फरक. परंतु, जेवणानंतर सावकाश पावले टाकत अन्न जिरवण्यासाठी चालण्याची क्रिया गरजेची आहे. म्हणून पूर्वीचे लोक त्याला रामरक्षेची, अथर्वशीर्षाची किंवा नातवंडांकडून परवचा म्हणवून घेण्याची जोड लावत. आता ती जागा मोबाईलवरील संवाद किंवा गाण्यांनी घेतली आहे.  एका श्लोकात म्हटले आहे,

भुक्तावोपविशत: स्थल्यं शयानस्य रुजस्तथा,आयुश्चक्रमाणस्य मृत्युर्धावति धावत: 

भोजन होताच जो मनुष्य एका ठिकाणी बसून राहतो, तो प्रकृतीने स्थूल होतो. जो लगेच झोपतो, त्याच्या देहात अनेक व्याधी उद्भवता, जो धावतो, त्याचा मृत्यू जवळ येतो. म्हणजेच जेवणानंतर निष्क्रिय किंवा अतिसक्रीय होऊन चालणार नाही. त्यावर मंद पावले टाकीत शतपावली करणे, हाच एकमेव उपाय आहे. 

शतपावलीमुळे पोटातील अन्न पचनशील होण्यास मदत होते. अन्नाचे नीट पचन झाले, तर नानाविध व्याधी जन्माला येण्याआधीच समूळ नष्ट होते. जेवून झाल्यावर एका जागी बसणे, लगेच झोपणे किंवा वेगाने काम करणे अपेक्षित नाही. तर शरीराची हालचाल होणे, महत्त्वाचे असते. चालणे, हा सर्वांगुसंदर व्यायाम मानला जाता़े  मात्र, जेवणानंतर प्रभातफेरीसारखी फेरी मारणे उपयोगाचे नाही. तिथे उपयोग फक्त शतपावलीचा. शतपावली म्हणजे काय, तर मोजून शंभरएक पावले चालणे. 

आजकाल दिवसभरात आपण किती चाललो, हे मोजणारे अ‍ॅप, घडयाळ आहेत. दिवसभराचा तोंडी हिशोब ठेवणे शक्य नसले, तरी जेवणानंतरची शतपावली करणे सहज शक्य असते आणि ती तेवढ्याच प्रमाणात करणे अपेक्षित असते. 

वामकुक्षीचे महत्त्व काय?

जेवणानंतर आबाल-वृद्धांना आळस येतो. शाळा, महाविद्यालय, नोकरी किंवा उद्योग यातले कोणीही त्यात अपवाद नाहीत. म्हणून शास्त्राने वामकुक्षीचा पर्याय सुचवला आहे. परंतु, हा पर्याय घरी अनुसरता येतो. बाहेर असताना वामकुक्षी घेतली, तर हातात नारळ मिळायची शक्यता अधिक, अशा वेळी भोजन कमी घेणे ईष्ट!

परंतु, वामकुक्षीच का? वाम म्हणून शरीराची डावी बाजू. डावीच बाजू का? कारण जेवणानंतर, शतपावली झाल्यावर, वामकुक्षी घेतल्याने म्हणजे, डाव्या कुशीवर झोपल्याने जठरातील अन्न काही काळ जठरात राहते. ते तसे राहणे पथ्यकर असते. जठराच्या आकुंचन प्रसरण पावण्याने अन्न घुसळून निघते व व्यवस्थित पचते. दुसरे कारण म्हणजे, आपल्या उजव्या नासिकेतून सूर्यनाडी व डाव्या नाकपुडीतून चंद्रनाडी वाहत असते. अन्नपचनासाठी सूर्यनाडीची क्रिया व्यवस्थित असावी लागते. डाव्या कुशीवर झोपल्यामुळे सूर्यनाडी मोकळी राहते आणि व्यवस्थित काम करते. म्हणून जेवण झाल्यावर वीस ते पंचवीस मीनिटे वामकुक्षी घेणे, महत्त्वाचे आहे, असे म्हटले जाते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Afternoon Nap: Ancient Tradition Boosts Brainpower Post-Lunch, Experts Say

Web Summary : Embrace the afternoon nap! Following lunch with a short rest aids digestion and keeps you healthy. Walking after meals helps too, promoting better nutrient absorption and overall well-being. Prioritize these age-old practices.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सTraditional Ritualsपारंपारिक विधी