शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

Hanuman Jayanti 2022 : शेपूट असूनही हनुमंत 'वानर' नव्हते, हे सांगणारे वाल्मिकी रामायणातील काही प्रसंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 11:47 IST

Hanuman Jayanti 2022 : वाल्मीकींनी हनुमानाचा उल्लेख `वानर', `कपी', `शाखामृग' इत्यादी नावांनी केला आहे. इतकेच नव्हे तर त्याला पुच्छधारी म्हणून चित्रित केले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात `हनुमान वानर की नर?' असा प्रश्न उत्पन्न होतो.

सर्वसामान्य लोक हनुमान, वाली, सुग्रीव इत्यादींना वानर म्हणजे खरोखरच शेपटी असलेले पशू वानर समजतात. कारण त्यांच्या दृष्टीने ते मनुष्य नव्हेत. आजही वानरांकडे पशूंपेक्षा वेगळ्या दृष्टीने पाहिले जाते, ते रामायणातील हनुमा, अंगद इ. वानर पात्रांकडे पहावयाच्या दृष्टीकोनाच्या प्रभावामुळेच असावे, परंतु वानर समाज आणि संस्कृतीनचे वाल्मीकी रामायणात जे चित्रण पहावयास मिळते, त्याचा बारकाईने विचार केल्यास असे ठामपणे म्हणता येते, की वानर समाज वस्तुत: काल्पनिक समाज नाही, वानर हे मनुष्यच होते व त्या समाजाची स्वत:ची अशी सामाजिक व्यवस्था होती, स्वत:ची संस्कृती होती. ते पराक्रमी, शूर आणि सशक्त होते.

वाल्मीकींनी हनुमानाचा उल्लेख `वानर', `कपी', `शाखामृग' इत्यादी नावांनी केला आहे. इतकेच नव्हे तर त्याला पुच्छधारी म्हणून चित्रित केले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात `हनुमान वानर की नर?' असा प्रश्न उत्पन्न होतो. परंतु हनुमानाचे पुच्छ हे हात, पाय याप्रमाणे त्याच्या शरीराचे अवयव नव्हते. ते त्याच्या समाजाचे विशिष्ट चिन्ह असावे, व ते बाहेरून शरीराला जोडण्यात येत असावे. रावणाने हे पुच्छ वानरांचे सर्वाधिक प्रिय भूषण आहे, असे म्हटले आहे. 

वानरांची उड्या मारण्याची, धावण्याची प्रवृत्ती सूचित करण्याच्या दृष्टीने `प्लवंग', `प्ववंगम' हे शब्द सार्थ आहेत. हनुमान धावण्याच्या कलेत निपुण होता. `कपि' या शब्दाचा सामान्य अर्थ `वानर' असा आहे. रामायणात हे कपी किंवा वानर पुच्छधारी म्हटलेले आहेत. त्यामुळे हनुमानाला मनुष्य म्हणण्यात मोठी अडचण येते. 

पुच्छ बाहेरून शरीराला जोडण्यात येत असल्यामुळे ते पेटवूनही हनुमानाला कोणतीही शारीरिक पीडा झाली नव्हती. पुच्छाचे वर्णन रामायणात विशेषत: हनुमानाच्या संदर्भात आणि तेही लंकादहन प्रसंगात आलेले आहे. वाली, सुग्रीव, अंगद आणि वानरस्त्रिया यांना पुच्छ असल्याचा खास उल्लेख रामायणात नाही.

वानर नसूनही त्यांच्यासारखी वाटणारी शरीराची ठेवण, रंग रूप, काही मानसिक व शारीरिक प्रवृत्ती यात, हनुमान इत्यादींच्या तथाकथित वानर समाजात आणि प्रत्यक्ष वानरांत साम्य दिसून येत असावे. चापल्य, निरंकुश स्वभाव, केसाळ शरीर, उड्या मारण्याची प्रवृत्ती, विलास प्रियता, स्त्री-पुरुष संबंधात नीतिनियमांचे शैथिल्य, पर्वत दऱ्यात वास्तव्य, वृक्षशाखा-नखे-दात यांचा शस्त्रासारखा उपयोग करणे इ. प्रवृत्ती पाहून आयांनी त्यांनी `वानर' या नावाने संबोधले असावे. वास्तविक वानर पुच्छधारी पशू नव्हते. ते भारतातील आर्येतर आदिवासी होते. आर्यांच्या मानाने ते बरेच मागासलेले होते, पण हळूहळू आर्य संस्कृतीचा प्रभाव त्यांच्यावर पडत गेला.

इतिहास संशोधकांनी पुच्छ लावून घेणाऱ्या व्यक्तींचा व मानवजातीनचा शोध लावलेला आहे. मातृगुप्त नावाचा एक बंगाली कवी हनुमानाचा अवतार मानला जात असे व तो प्रसंगी पुच्छ धारण करत असे् शबर नावाचे आदिवासी आजही उत्सवाचेवेळी पुच्छ धारण करतात.

अंदमान निकोबारमध्ये पुच्छ धारण करणारी एक आदिवासी जमात आहे, असा उल्लेख स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एके ठिकाणी केला आहे. अशाच एखाद्या आदिवासी जमातींपैकी हनुमान हा वानरवंशोत्पन्न परमप्रतापी पुरुष असावा.

टॅग्स :Hanuman Jayantiहनुमान जयंती