शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 14:50 IST

Gurupushyamrut Yoga On Deep Amavasya 2025: गुरुपुष्यामृत योगात आषाढी अमावास्या असून, दीप पूजनाला भारतीय संस्कृती परंपरांमध्ये मोठे महत्त्व असल्याचे म्हटले जाते.

Deep Amavasya Importance:चातुर्मासातील पहिली अमावास्या गुरुवार, २४ जुलै २०२५ रोजी आहे. आषाढ अमावास्या ही दीप अमावास्या म्हणून ओळखली जाते. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये दीप पूजनाला अनन्य साधारण महत्त्व आहे. दिवा लावणे हा महत्त्वाचा संस्कार मानला गेला आहे. यंदाच्या वर्षीचे विशेष म्हणजे या आषाढ दीप अमावास्येला अत्यंत शुभ मानला गेलेला गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे. 

अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे, असे मानले जाते. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले, तर त्या दिवशी 'गुरुपुष्यामृत' योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते, अशी मान्यता आहे. त्यामुळे या योगानिमित्त सोने खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. चातुर्मासातील पहिली दीप अमावास्या गुरुवार, २४ जुलै २०२५ रोजी आहे. गुरुपुष्यामृत योगात श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे. गुरुवारी सायंकाळी ४ वाजून ४३ मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी ६ वाजून १५ मिनिटांपर्यंत गुरुपुष्यामृतयोग आहे. दीप अमावास्या, श्रावण महिन्याची सुरुवात आणि गुरुपुष्यामृताचा अत्यंत शुभ मानला गेलेला योग यामुळे या दिवसांचे महत्त्व दुपटीने वाढल्याचे म्हटले जात आहे. 

दीप प्रज्वलन हा खूप मोठा आणि महत्त्वाचा संस्कार

हिंदू संस्कृती आणि परंपरेत दीप प्रज्वलन हा खूप मोठा आणि महत्त्वाचा संस्कार आहे. दिवाळीत दिव्यांचा उत्सव साजरा केला जातो. देवाचे पूजन करताना दररोज सकाळी आणि सायंकाळी देवासमोर दिवा लावला जातो. दिवा हे तेजाचे प्रतिक मानले जाते. दिवा लावल्याने पावित्र्य, चैतन्य आणि सकारात्मकता घरात येते. पणती, निरांजन, समई या ज्योतिर्मयस्वरुप दिव्यांचे महत्त्व अबाधित आहे. कारण, एका ज्योतिने दुसरी ज्योत पेटवता येते. अंधार कितीही गडद असला, तरी एक पणती अंधाराशी दोन हात करण्याची शक्ती देते. त्यामुळे दिवा लावणे हे आशेचे लक्षण मानले जाते. दिवा हा अप्रत्यक्षरित्या आश्वस्त करत असतो. आपल्यातील आशावाद कायम ठेवण्यास मदत करत असतो. त्यामुळे दीप प्रज्वलित करणे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले गेले आहे. 

श्रावण महिना सुरू होताना का करतात दीपपूजन?

भारतीय व्रत-वैकल्ये, सण-उत्सव हे केवळ धार्मिक, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे, असे नाही. तर निसर्ग आणि शास्त्राधारही ही व्रते आणि सण साजरे करण्याला आहे. आषाढ अमावास्येला दीपपूजनाचे महत्त्व असल्याने याला दीप अमावस्या असेही म्हटले जाते. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. भरपूर पाऊस व अंधारून येणे हे श्रावणाचे वैशिष्ट्य आहे. घरातील इकडे तिकडे ठेवलेले, धुळीने माखलेले दिवे, समया, निरांजने, लामणदिवे या सर्वांना एकत्र करून, घासून पुसून लख्ख करून ठेवण्याचा हा दिवस असतो. दीपपूजा महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. यामुळे पूर्ण वर्षभर दीप पूजेची फलश्रुती प्राप्त होते, असे मानले जाते. 

भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्व

आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्व आहे. प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते. घरातील इडा-पिडा टाळून, अज्ञान, रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी, अशी मान्यता आहे. तिमिरातून तेजाकडे वाटचाल करण्याचे दीप हे एक महत्त्वाचे माध्यम आहे. दिवा हे तेजाचे, ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतिक मानले जाते. दिव्याला सकारात्मकतेचे प्रतिक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानण्यात आले आहे.

घरात दररोज दीप प्रज्वलन करणे शुभ

घरात दररोज दीप प्रज्वलन करणे शुभ मानले जाते. घरातील दिवे सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात.  दिव्याचा प्रकाश परब्रह्म व नारायण स्वरुप मानला गेला आहे. तिन्हीसांजेला प्रज्वलित केलेला दिवा केवळ अंधःकार आणि नकारात्मक ऊर्जा संपुष्टात आणत नाही, तर घरात आणि मनात चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जेचा भरणा करतो. दीप प्रज्ज्वलन हे धर्म आणि विजयाचे सूचक मानले आहे. कोणत्याही शुभ कार्याची, कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने केली जाते. सत्कर्माचा साक्षीदार दिवा होत असतो.

तिन्हीसांजेला दिवेलागणीवेळी दीप प्रज्ज्वलन का करतात?

सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सूर्याची किरणे पृथ्वीवर संचार करत असतात. सूर्याच्या उष्णतेमुळे बारीक जीवजंतू, विषाणू, रोगजंतू मारले जातात. मात्र, सूर्यास्तानंतर सूर्य किरणे पृथ्वीवर नसतात. वातावरणातील उष्णता काही प्रमाणात कायम राहावी, यासाठी तिन्हीसांजेला दिवे लावण्याची परंपरा आपल्याकडे सुरू आहे. प्राचीन काळात ऋषि-मुनी आणि सामान्य नागरिकही सायंकाळी एका ठराविक वेळी दीप प्रज्ज्वलन करीत असत. आजच्या काळातही कोट्यवधी घरात दिवेलागणीवेळी देवासमोर, तुळशीसमोर आणि घरातील प्रवेशद्वाराजवळ दिवा लावला जातो. काही घरांमध्ये कापूर, जटामांसी, लोबान यांचे मिश्रण करून धूपही घातला जातो. 

 

टॅग्स :chaturmasचातुर्मासPuja Vidhiपूजा विधीspiritualअध्यात्मिकTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणShravan Specialश्रावण स्पेशल