शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

Guru Purnima 2021: गुरुपौर्णिमा: खरा गुरु कसा ओळखावा? जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकारामांनी ‘असे’ केले मार्गदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 10:53 IST

Guru Purnima 2021: खऱ्या गुरुची नेमकी ओळख कशी पटवावी, याबाबत अनेकांमध्ये आजही संभ्रम असल्याचे पाहायला मिळते.

भारतीय संस्कृती, परंपरा, संस्कार यांमध्ये गुरु आणि शिष्य यांचे नाते सर्वोपरि मानले गेले आहे. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरु हा कोणत्याही रुपात आपल्याला भेटू शकतो. ज्ञान व माहिती यांचे भंडार गुरु शिष्यासमोर खुले करतो. यातून शिष्याची प्रगती, बौद्धिक व व्यक्तिमत्त्व विकास होत असतो. जीवन सक्षमपणे जगण्याचा आत्मविश्वास गुरु शिष्याला देत असतो. प्राचीन काळापासून अवघ्या काही शतकांपर्यंत गुरुकूल पद्धतीने शिक्षण घेण्याची परंपरा आपल्याकडे होती. कालौघात ही परंपरा अगदी मोजक्या ठिकाणी आजही सुरू असल्याचे दिसते. मात्र, याचा कालावधी, पद्धती यांत अमूलाग्र बदल झालेला पाहायला मिळतो. मात्र, खऱ्या गुरुची नेमकी ओळख कशी पटवावी, याबाबत अनेकांमध्ये आजही संभ्रम असल्याचे पाहायला मिळते. एकदा संत तुकाराम महाराजांना एका युवकाने खरा गुरू कोण याबाबत एका तरुणाने प्रश्न विचारला. या प्रश्नावर तुकाराम महाराज नेमके काय म्हणाले? पाहूया...

गुरुपौर्णिमा: स्वामी समर्थ म्हणतात, सद्गुरुशी नेहमीच एकनिष्ठ असावे; वाचा, बोधकथा

एकदा तुकोबांना भेटण्यासाठी एक युवक आला. तुकोबांशी चर्चा करत असताना त्याने विचारले की, महाराज, मी एका खऱ्या गुरुच्या शोधात आहे. आपण मला याबाबत काही मार्गदर्शन करावे. यावर, तुकोबा म्हणाले की, वत्सा, खरा गुरु तेव्हाच भेटू शकेल, जेव्हा आपण सर्वोत्तम शिष्य व्हाल. युवकाने तुकाराम महाराजांना विचारले की, महाराज खऱ्या शिष्याची ओळख काय? यावर, खरा आणि सच्चा शिष्य तो असतो, जो आपले सर्वस्व गुरुचरणी अर्पण करतो. जो पूर्णपणे गुरुला शरण जातो. जो सदैव गुरुला आपल्यासोबत असल्याचे मानतो, तो खरा शिष्य.

गर्दीमागे धावू नका, स्वत:ला योग्य वाटेल तो मार्ग निवडा;वाचा ही अकबर बिरबलाची गोष्ट!

तुकोबा पुढे म्हणाले की, सच्चा शिष्य तोच असतो, जो कायम आपल्या गुरुमध्ये विठ्ठलाला पाहतो. विठ्ठलाने गुरुच्या रुपात आपले कल्याण करण्यासाठी अवतार घेतला आहे, अशी श्रद्धा कायम ज्याच्या मनी असते, तोच खरा शिष्य. तुकोबांचे बोल ऐकून तरुण स्तब्ध झाला आणि म्हणाला की, आपल्या गुरुमधील विठ्ठलरुप आपण कसे पाहू शकतो? या प्रश्नाला उत्तर देताना तुकोबा म्हणाले की, याचा एकमेव मार्ग म्हणजे भक्ती. भक्तीत ते सामर्थ्य दडलेले आहे. भक्तीमुळेच गुरुला शिष्य आणि भक्ताला भगवंत भेटू शकतो. यावर, तरुण विचारता झाला की, खऱ्या गुरुची ओळख नेमकी कशी पटवावी?

तुकोब महाराज म्हणाले की, कोणीही आपल्या मनात आले आणि गुरु बनले, असे होत नाही. लहरीपणामुळे गुरु बनलेली व्यक्ती स्वतःच्या शिष्याचे, अनुयायांचे कधीच कल्याण करू शकत नाही. गुरुपदावर विराजमान झालेल्या व्यक्तीचे मन, आत्मा पवित्र झालेले असते. ज्यांच्या व्यक्तिमत्त्वात केवळ विठ्ठल सामावलेला आहे, अन्य काही. ज्याने अहंभाव सोडून केवळ विठ्ठलाला मनात, विचारात, आत्म्यात स्थान दिले आहे. अशा व्यक्तीला गुरुपदी पोहोचण्याचा अधिकार केवळ विठ्ठलच देऊ शकतो, असे उत्तम तुकोबांनी दिले. तो तरुण तुकोबांचरणी नतमस्तक झाला आणि मला तुमचा शिष्य करून घ्या, अशी विनंती केली.

 

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमाsant tukaramसंत तुकाराम