शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

Guru purnima 2021 : ईश्वरी शक्तीची प्रचिती देणारा गाणगापुरातील मंदिराचा 'हा' प्रसंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 8:00 AM

Guru Purnima 2021: आज गुरु पौर्णिमा, त्यानिमित्त गुरु चरणांची ही मानस पूजा!

श्रीगुरु नृसिंहसरस्वती महाराष्ट्रातील नृसिंहवाडीला १२ वर्षे राहून व कार्य करून नंतर येथे पुढील कार्यासाठी आले. फार काळ येथे कार्य करीत राहिल्याने या भूमीला त्यांची कर्मभूमी म्हणतात. कार्य जाल्यावर ते श्रीशैल्यपर्वतावर निघून गेले. ते श्रीशैल्यपर्वतावर जाताना त्यांच्या भक्तांना खूप दु:खं झाले. तेव्हा भक्तांना पूजा करण्यासाठी त्यांनी निर्गुण-निर्लेप अशा जिवंत पादुका त्यांच्या मठात ठेवल्या व त्यांची सेवा केल्यास तुम्हाला जीवनात आनंद मिळेल व तुमचा उद्धारही होईल असे सांगितले.

येथे ज्या पादुका आहेत ते भगवंताचे चिन्हच आहे. येतील निर्गुण पादुकांच्या दर्शनाने भक्ताला विनम्र भाव व नम्रता येते. त्याला दर्शन व आशीर्वाद एकाच वेळी प्राप्त होतात. विनम्र भावाच्या ओलाव्याशिवाय त्याला आशीर्वाद मिळत नाहीत. या पादुकांना पाण्याचा अभिषेक चालत नाही. अत्तर, केशराचा लेप पादुकांना लावला जातो. त्या पादुका जिवंत असल्यानेच त्या केशरातील ओलसरपणा पादुकांद्वारे शोषला जातो. तसेच पादुका `निर्लेप' असल्याने पादुकांवरील लेप निघून येतो. संपूर्ण भारतात अशा प्रकारच्या भगवंताच्या जिवंत पादुका इतर कुठेही नाहीत.

आपण गाणगापूरला जे मंदिर पाहतो ते इस्लाम राजवटीत बांधलेले आहे. या मंदिराला पूर्वी मठ असे म्हटले जायचे. श्रीगुरुंची तिथे वास्तव्य होते. त्या काळात स्वामी असताना त्यामानाने मठ लहान होता. आज जेथे पादुका ठेवलेल्या आहेत तेथेच पूर्वी श्रीस्वामी बसत असत. इस्लाम राजवटीत हे मंदिर बांधल्यामुळे मंदिराला झरोका ठेवला आहे. झरोका ठेवण्यामागे गाभाNयात पावित्र्य राहावे अशी भावना आहे. गाभाऱ्यात फक्त तीन माणसे बसू शकतात अथवा ६ माणसे उभी राहू शकतात. 

हे संन्यासी रूप भगवंताचेच आहे. या रूपाची सेवा केल्यास त्याची प्रचिती लवकर येते पूर्वीच्या काळी रझाकार हा मठ पाडण्यासाठी आले होते. त्या काळी मठाचे समोर एक मशीद होती. रात्रीची वेळ त्यांनी निवडली. परंतु जेव्हा ते मठ पाडायला आले तेव्हा त्यांना मठाच्या जागी मशीद दिसली व मशिदीच्या जागी मठ दिसला. त्यामुळे त्यांनी त्या रात्रीच्या काळोखात मठ समजून त्यांचीच मशीद पाडली. सकाळ झाल्यावर त्यांना हा प्रकार समजला. ईश्वरी शक्ती जागृत असल्याचा हा एक पुरावा सांगितला जातो. तेव्हापासून मुसलमान समाजही श्रीगुरुंच्या सेवेसाठी तिथे दर्शनाला येतो. 

गाणगापूरचे वैशिष्ट्य असे, की तिथे तुम्ही जी सेवा कराल त्याच्या शतपटीने तुम्हाला फळ मिळते. हे ठीकाण संन्याशाचे असल्याने येथे दर्शनाला आलेले भक्त दुपारचे भोजन गावात पाच घरात माधुकरी मागूनच करतात. आता तशी तिथे प्रथाच पडली आहे. दर्शनाला आलेले भक्तही तिथे भिक्षा घालून अन्नदानाचे पुण्य मिळवतात. गाणगापूरात दत्तभक्तांना दत्तमहात्म्याची प्रचिती येते असा आजवरचा अनुभव आहे. त्याकरिता गुरुभक्ती आणि गुरुनिष्ठा दृढ हवी!

 

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमा