शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

गौर गोपाल दास विचारतात, 'तुम्हीसुद्धा हार्ट अटॅकच्या उंबरठ्यावर तर नाही? तपासून बघा!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 07:00 IST

आरोग्य, खाण्यापिण्याच्या सवयी, दिनचर्या या सगळ्याबाबतीत काटेकोर राहूनही लोक आजारांनी का ग्रासले जात आहेत? गौर गोपाल दास यांनी केला खुलासा!

सद्यस्थितीत सगळेच जण आरोग्याबद्दल जागरूक आहेत ही आनंदाची बाब आहे, पण शारीरिक आरोग्याइतकेचमानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे, त्याकडे आपले पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. हार्ट अटॅक असो नाहीतर मधुमेह, रक्तदाब, नैराश्य किंवा आणि काही, त्यामागचे मुख्य कारण आहे ते म्हणून असंतुलित मानसिक आरोग्य! 

अध्यात्मिक व्याख्याते गौर गोपाल दास सांगतात, आपण स्वयंपाकघरात मिक्सरचा वापर करतो. त्यात बटन दाबताच पूर्ण शक्तीनिशी मशीन चालते आणि आपले काम करते. बटन बंद केल्यावर मिक्सर तापलेले असते. बटण बंद केल्यावर ते काही काळाने पूर्ववत होते. आपले शरीरसुद्धा अशाच ऊर्जेने काम करत असते. विश्रांती घेऊन आपण शरीराचे यंत्र पूर्ववत आणतो. मात्र शरीराचे हेड कॉर्टर अर्थात आपला मेंदू, तो झोपेतही काम करतो. सकाळी उठल्यावर शेकडो विचार येऊन चिकटतात, आपण त्रासून जातो. याला कारण म्हणजे आपले मन शांत नाही आणि मेंदू स्थिर नाही. 

यासाठी अतिरिक्त विचारांचे बटन बंद करायला हवे. काल काय होऊन गेले आणि उद्या काय घडणार या विचारात आपण 'आज' गमावत आहोत, हे आपल्याला लक्षात येत नाही आणि त्यामुळे प्रत्येक क्षणाचा आनंदही घेता येत नाही. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत, त्या करून बाकी गोष्टी देवावर सोपवून देणे शिकायला हवे. म्हणूनच भगवद्गीतेत नवव्या अध्यायात बाविसावा श्लोक आहे, 

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ।। 

जो भक्त अनन्यभावे मला शरण येतो, त्याचा भार मी वाहतो. म्हणूनच रोज रात्री झोपताना हा श्लोक म्हणून देवावर भार सोपवून निश्चिन्त होऊन झोपी जावं आणि सकाळी उठल्यावर इतर विषयांचा विचार न करता, आजची सकाळ मला बघता आली याबद्दल आधी देवाचे आभार मानावेत. त्याने आपल्याला सगळं काही देऊन पाठवले आहे, याची जाणीव म्हणून तळहाताचे दर्शन घेत पुढील श्लोक म्हणावा - 

कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुलेतु गोविंद प्रभाते करदर्शनं ।।

अशी निश्चिन्त मनाने सकाळ आणि रात्र झाली तर मन आपोआप शांत राहील. ध्यानधारणेची जोड दिली तर दिवसभर मन शांत राहील आणि ज्याचे मन शांत असेल तो प्रत्येक परिस्थिती नेटाने हाताळू शकेल. म्हणून मन स्थिर करा, शांत ठेवा आणि आजारांना दूर सारा! हाच निरोगी आरोग्याचा मूलमंत्र लक्षात ठेवा! 

टॅग्स :Healthआरोग्यMental Health Tipsमानसिक आरोग्य