शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

गौर गोपाल दास विचारतात, 'तुम्हीसुद्धा हार्ट अटॅकच्या उंबरठ्यावर तर नाही? तपासून बघा!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 07:00 IST

आरोग्य, खाण्यापिण्याच्या सवयी, दिनचर्या या सगळ्याबाबतीत काटेकोर राहूनही लोक आजारांनी का ग्रासले जात आहेत? गौर गोपाल दास यांनी केला खुलासा!

सद्यस्थितीत सगळेच जण आरोग्याबद्दल जागरूक आहेत ही आनंदाची बाब आहे, पण शारीरिक आरोग्याइतकेचमानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे, त्याकडे आपले पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. हार्ट अटॅक असो नाहीतर मधुमेह, रक्तदाब, नैराश्य किंवा आणि काही, त्यामागचे मुख्य कारण आहे ते म्हणून असंतुलित मानसिक आरोग्य! 

अध्यात्मिक व्याख्याते गौर गोपाल दास सांगतात, आपण स्वयंपाकघरात मिक्सरचा वापर करतो. त्यात बटन दाबताच पूर्ण शक्तीनिशी मशीन चालते आणि आपले काम करते. बटन बंद केल्यावर मिक्सर तापलेले असते. बटण बंद केल्यावर ते काही काळाने पूर्ववत होते. आपले शरीरसुद्धा अशाच ऊर्जेने काम करत असते. विश्रांती घेऊन आपण शरीराचे यंत्र पूर्ववत आणतो. मात्र शरीराचे हेड कॉर्टर अर्थात आपला मेंदू, तो झोपेतही काम करतो. सकाळी उठल्यावर शेकडो विचार येऊन चिकटतात, आपण त्रासून जातो. याला कारण म्हणजे आपले मन शांत नाही आणि मेंदू स्थिर नाही. 

यासाठी अतिरिक्त विचारांचे बटन बंद करायला हवे. काल काय होऊन गेले आणि उद्या काय घडणार या विचारात आपण 'आज' गमावत आहोत, हे आपल्याला लक्षात येत नाही आणि त्यामुळे प्रत्येक क्षणाचा आनंदही घेता येत नाही. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत, त्या करून बाकी गोष्टी देवावर सोपवून देणे शिकायला हवे. म्हणूनच भगवद्गीतेत नवव्या अध्यायात बाविसावा श्लोक आहे, 

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ।। 

जो भक्त अनन्यभावे मला शरण येतो, त्याचा भार मी वाहतो. म्हणूनच रोज रात्री झोपताना हा श्लोक म्हणून देवावर भार सोपवून निश्चिन्त होऊन झोपी जावं आणि सकाळी उठल्यावर इतर विषयांचा विचार न करता, आजची सकाळ मला बघता आली याबद्दल आधी देवाचे आभार मानावेत. त्याने आपल्याला सगळं काही देऊन पाठवले आहे, याची जाणीव म्हणून तळहाताचे दर्शन घेत पुढील श्लोक म्हणावा - 

कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुलेतु गोविंद प्रभाते करदर्शनं ।।

अशी निश्चिन्त मनाने सकाळ आणि रात्र झाली तर मन आपोआप शांत राहील. ध्यानधारणेची जोड दिली तर दिवसभर मन शांत राहील आणि ज्याचे मन शांत असेल तो प्रत्येक परिस्थिती नेटाने हाताळू शकेल. म्हणून मन स्थिर करा, शांत ठेवा आणि आजारांना दूर सारा! हाच निरोगी आरोग्याचा मूलमंत्र लक्षात ठेवा! 

टॅग्स :Healthआरोग्यMental Health Tipsमानसिक आरोग्य