शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

Ganesh Utsav 2021: श्रीगणेश चतुर्थी: कधीपासून सुरू होणार गणेशोत्सव? पाहा, परंपरा आणि मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 13:28 IST

Ganesh Utsav 2021 Date: यंदा गणेशोत्सवाची सुरुवात कधी होणार आहे? श्रीगणेश चतुर्थी, पुराणातील त्याबाबतचे उल्लेख यांबाबत जाणून घेऊया...

मराठी वर्षात चातुर्मासाला विशेष महत्त्व आहे. चातुर्मासातील दुसरा महत्त्वाचा महिना म्हणजे भाद्रपद. जसे श्रावण महिना पूर्वी ‘नभस्’ या नावाने ओळखला जात असे, तसे भाद्रपद महिन्याचे वैदिक नाव नभस्य असे आहे. श्रावण पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रापाशी असतो. म्हणून या महिन्याला ‘श्रावण’ असे नाव मिळाले आहे. अगदी याचनुसार, या महिन्याच्या पौर्णिमेस चंद्र पूर्वा किंवा उत्तरा भाद्रपदा नक्षत्राजवळ असतो म्हणून या महिन्याला भाद्रपद हे नाव दिले आहे. भाद्रपद महिना म्हटला की, केवळ आणि केवळ आठवतो तो गणेशोत्सव. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कला अधिपती असलेल्या गणेशाचे पूजन या महिन्यात केले जाते. महाराष्ट्रासह बहुतांश घरात पार्थिव गणेशाची स्थापना केली जाते. घरगुती गणपतीप्रमाणेच मंडळांमध्येही मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा गणेशोत्सवाची सुरुवात कधी होणार आहे? श्रीगणेश चतुर्थी, पुराणातील त्याबाबतचे उल्लेख यांबाबत जाणून घेऊया... (ganesh chaturthi 2021 date)

श्रीगणेश चतुर्थी: शुक्रवार, १० सप्टेंबर २०२१

भाद्रपद चतुर्थी प्रारंभ: गुरुवार, ९ सप्टेंबर २०२१ रोजी रात्रौ १२ वाजून १८ मिनिटे.

भाद्रपद चतुर्थी समाप्ती: शुक्रवार, १० सप्टेंबर २०२१ रोजी रात्रौ ९ वाजून ५८ मिनिटे. 

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे रुढ असल्यामुळे पार्थिव गणेशाची स्थापना करण्याचा दिवस तसेच गणेशोत्सवाची सुरुवात शुक्रवार, १० सप्टेंबर २०२१ रोजी होईल, असे सांगितले जात आहे. आताच्या काळात परदेशातही अनेकविध ठिकाणी पार्थिव गणेश पूजन करून गणेशोत्सव साजरा केला जातो. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असून, राज्य सरकारने याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. (Ganesh Utsav 2021 Date)

इच्छाशक्ती प्रबळ करायची आहे? रोज एक तास मौन पाळा; जाणून घ्या अधिक फायदे!

गणेश पूजनाची प्राचीन परंपरा

आपल्याकडे पार्थिव गणेश पूजनाची परंपरा सुमारे ५ हजार वर्षांपासून म्हणजेच महाभारत काळापासून चालत आल्याची मान्यता असल्याचे सांगितले जाते. महर्षी व्यासांनी सांगितलेले महाभारत गणपतीने लिहून काढले. त्यानंतर पार्थिव गणेश पूजनाची परंपरा रुढ झाली. कालांतराने ती प्रचलित झाली, असे सांगितले जाते. (Ganesh Utsav tradition)

तुम्हांला स्वप्नात महादेव शिवशंकरांचे दर्शन झाले? पाहा, यामागील नेमका अर्थ व मान्यता

श्रीगणेश चतुर्थीचे व्रत

वास्तविक पाहता मुख्य गणेश चतुर्थीचे व्रत श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत पार्थिव गणेशपूजा करावी, असे व्रत आहे. हे व्रत संपूर्ण महिनाभर करणे शक्य नसल्यास किमान भाद्रपद चतुर्थीला पार्थिव पूजा करावी, असे शास्त्र सांगते. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी गणपतीचे वाहन असलेल्या मूषकाला खिरीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. (shree ganesh chaturthi vrat 2021)

देव-दानवांनी केलेले समुद्रमंथन भारतात नेमके कुठे झाले? पाहा, मान्यता आणि काही अद्भूत तथ्ये

श्रीगणेश चतुर्थी मान्यता

प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध चतुर्थी सिद्धिविनायकी चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. तर भाद्रपद महिन्यात येणारी शुद्ध चतुर्थी महासिद्धिविनायकी चतुर्थी मानली जाते. ही चतुर्थी रविवारी किंवा मंगळवारी आल्यास तिचे महात्म्य अधिक असते. याच तिथीला वरद चतुर्थी किंवा शिवा असेही म्हटले जाते. या दिवशी पार्थिव गणेशाची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. भाद्रपद चतुर्थीला गणपतीची स्थापना करून अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जाते. गणेश चुतर्थी दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध मानले गेले आहे. या दिवशी चंद्रदर्शन केल्यास चोरीचा आळ येतो. श्रीकृष्णावर या दिवशी घडलेल्या चंद्रदर्शनाने स्यमंतक मणी चोरल्याचा आळ आला होता, अशी मान्यता आहे. (ganeshotsav significance)

रुद्राक्षाचे ‘हे’ लाभ तुम्हाला माहितीयेत का? पाहा, धारण करण्याचा योग्य विधी व महात्म्य

श्रीगणेश जन्माचा उत्सव

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशोत्सव साजरा केला जातो. एका मान्यतेनुसार, श्रीगणेशाच्या अवतारांपैकी गुणेश याचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला. महादेव शिवशंकरांनी कैलास पर्वतावर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला याच दिवशी जन्मोत्सव साजरा केला. श्रीगणेशाने सिंदूर दैत्यावर विजय मिळवला, तो दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी हाच होता. त्याप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा करण्यात आला. ती पूर्वपरंपरा आजही पाळली जात आहे. चतुर्थी तिथी श्रीगणेशाची अत्यंत प्रिय तिथी आहे. चतुर्थी म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती यांपलीकडील तुरीया अवस्था होय. तेच जीविताचे परमाध्य, असे मानले जाते. थोरले माधवराव पेशवे यांनी गणेश चतुर्थीचा उत्सव सार्वजनिकरित्या शनिवार वाड्यात सुरू केला. यानंतर लोकमान्य टिळकांनी हा सार्वजनिक उत्सव समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला भव्य स्वरुप दिले, असे सांगितले जाते.  

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGaneshotsavगणेशोत्सव