शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

तुम्हाला कोणते आजार होऊ शकतात आणि त्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी हे जन्मतारखेवरून जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 13:11 IST

आपली प्रकृती कोणत्या स्वरूपाची आहे, हे जाणून घेत त्यानुसार उपाय केले तर दुर्धर आजार टाळता येतात!

जन्मतारखेवरून मूलांक कळतो आणि मूलांकाच्या आधारे भविष्य. अंकशास्त्रानुसार एक ते नऊ मूलांकांमध्ये जे वैविध्यपूर्ण लोक अखिल विश्वात सामावले आहेत, त्यांचा परिचय करून घेऊ. मार्गदर्शन करत आहेत, गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे. 

१,१०,१९,२८ या तारखेला जन्म घेणारे लोक, त्यांचा शासक ग्रह सूर्य आहे. यांना वातप्रकृतीचा त्रास होतो. पित्ताचा उपद्रव होतो. उष्ण प्रकृती असते. स्वभाव अतिशय सरळ असतो. त्यांनी माणिक वापरायला हरकत नाही. 

२, ११, २० हे लोक अतिशय संवेदनशील असतात. त्यांना दु:खं पाहवत नाही आणि सहनही होत नाही. त्यांचा स्वामी चंद्र आहे. चंद्राचे रत्न मोती आहे. उजव्या हाताच्या करंगळीत चांदीच्या अंगठीत घालावा. त्यामुळे स्मृतीभ्रंश, विसरभोळेपणा होत नाही.

३, १२, २१, ३० या तारखांचा शासक ग्रह गुरु आहे. त्यांचे रत्न पुष्कराज आहे. पुष्कराज सोन्याच्या अंगठीतून घालावा. गुरुचे पाठबळ लाभल्यावर सर्व क्षेत्रात त्यांची आघाडी दिसून येते. 

४, १३, २२, ३१ या तारखांचे लोक टोकाचे आस्तिक नाहीतर टोकाचे नास्तिक असतात. पाठ दुखणे, छाती दुखणे, वाताचे विकार त्यांना होतात. या लोकांनी चिंतनावर अधिक भर दिला पाहिजे. 

५,१४,२३ जन्मतारिख असणारे लोक अतिशय हुशार असतात. परंतु, हे लोक पटकन नाराज होतात. त्यांना अपमान सहन करता येत नाही. सतत सर्दीने बेजार असतात. त्यांचा स्वामी आहे बुध आणि बुधाचे रत्न आहे पाचू. अशा लोकांनी पाचू धारण करण्याआधी तो नीट पारखून घ्यावा. या जन्मतारखेच्या विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखा निवडावी. तसेच त्यांना कायदेविषयातही गती प्राप्त होईल. 

६,१५,२४ जन्मतारिख असणारे लोक राजेशाही असतात. उच्च राहणीमान त्यांना आवडते, मात्र कामाच्या बाबतीत अतिशय आळशी असतात. छोटेसे काम करायलाही पुष्कळ विलंब लावतात. एखाद दिवशी काम करतील, तर दुसऱ्या दिवशी अजिबात काम नाही, एवढा सुस्तपणा त्यांच्यात असतो. या स्वभावात भर म्हणजे, चटपटीत आणि गोड पदार्थांचे सेवन त्यांना आणखी आळशी बनवते. परंतु या तारखेचा स्वामी शुक्र आहे. शुक्र हा सौंदर्याचा उपासक आहे. त्यामुळे आळशी असूनही या लोकांमध्ये नीटनेटकेपणा आणि शानशौकीची आवड दिसून येते. शुक्राचे रत्न हिरा आहे. तो परिधान केला असता, या लोकांचे भाग्य हिऱ्यासारखे उजळते. 

७,१६,२५ या जन्मतारखेच्या व्यक्ती पुनर्जन्म म्हणून जन्माला आलेल्या आहेत. चविष्ट पदार्थ आवडतात. वयाच्या ३५ नंतर पोटाचे त्रास. त्यांना अनेक स्वप्न पडतात, त्यापैकी अनेक स्वप्न खरी होतात. लागणे, भाजणे, चिरणे या गोष्टी वारंवार घडतात.

८,१७,२६ जन्मतारिख असणाऱ्या लोकांचा स्वामी शनि आहे आणि शनिचे रत्न निलम आहे. या लोकांच्या वाट्याला बालपणापासून दुखापती फार. गुडघेदुखी, पायदुखी, डोकेदुखीचे सतत त्रास होतात. हे हाडाचे इंजिनिअर असतात. तंत्र, यंत्र, उपकरण, स्थापत्य, अभियंता होतात.

९,१८,२७ जन्मतारिख असणारे लोक मंगळाच्या प्रभावाखाली असतात. मंगळाचे रत्न पोवळे आहे. त्यांना उष्णतेचा प्रचंड त्रास होतो. त्यांनी पोवळ्याचा वापर केला पाहिजे. कोणत्याही मंगळवारी पोवळे धारण करावे. पोवळे देवीचे रत्न आहे. सर्व भगिनींनी त्याचा वापर करावा, अवश्य लाभ होता़े युद्ध, पराक्रम, भांडण यांचा शासक ग्रह मंगळ आहे. त्यामुळे हे लोक नेहमी नेतृत्वात पुढे असतात. त्यांच्या ठायी पराक्रम असतो, परंतु त्यांनी भावनांवर, रागावर आवर घालण्यासाठी पोवळ्याचा वापर करावा. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषHealthआरोग्य