शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
5
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
6
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
7
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
8
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
9
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
10
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
11
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
12
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
13
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
14
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
15
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
16
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
17
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
18
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
19
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
20
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी

लग्न जुळवताना मुला मुलीच्या कुंडलीत नेमके कोणते  ३६ गुण जुळवले जातात जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 13:50 IST

हिंदू विवाह पद्धतीत पत्रिका पाहिल्याशिवाय लग्नाची गाडी पुढे सरकत नाही. अशा वेळी कुंडलीत नेमके कोणते दोष गुण पाहिले जातात याची विवाहेच्छुकांनी माहिती करून घ्यावी!

हिंदू धर्मशास्त्रात ज्योतिष विद्येला महत्त्व असल्यामुळे शुभ मुहूर्त, जन्म कुंडली, लग्न कुंडली, ग्रहपीडा, उष्कर्ष, भविष्य, आजार आणि मरणोत्तर विधी या सर्व गोष्टींसाठी पंचांगाचा आधार घेतला जातो. याच आधारे आयुष्यातला मोठा निर्णय अर्थात लग्नाचा, त्यावेळेसदेखील कुंडली बघून लग्न जुळवले जाते. आजही अनेक घरांमधून कुंडली पाहून विवाह ठरवण्याला प्राधान्य दिले जाते. तर काही जण नकार कळवण्यासाठी कुंडलीचा आसरा घेतात. ज्याचा त्याचा दृष्टिकोन आणि ज्याचा त्याचा विश्वास! परंतु इथे आपल्याला जाणून घ्यायचे आहे, ते म्हणजे कुंडली जुळवताना ३६ चा आकडा आला कुठून? 

जिथे प्रेमविवाह होतात, तिथे ज्योतिषी कुंडली न पाहण्याचा सल्ला देतात. कारण दोघांनी एकमेकांना दोष गुणांसह स्वीकारूनच लग्नाचा निर्णय घेतलेला असतो. कुंडलीदेखील गुण दोष दर्शवते. पूर्वी व्यक्तीचा स्वभाव, दोष इ माहिती जाणून घेण्यासाठी पत्रिकेचा वापर होत असे. आताची पिढी सोशल मीडिया अकाउंट वरून एकमेकांची सखोल कुंडली शोधून काढते! विनोदाचा भाग सोडा, परंतु लग्न छान टिकावे, परस्पर संबंध जुळावेत, स्वभावाचे, मनाचे मिलन व्हावे या हेतूने कुंडली बघण्याला आजही लोकांची पसंती असल्याचे दिसून येते. 

पत्रिका जुळण्यासाठी किती गुण आवश्यक?वधू वराचे वैवाहिक जीवन सुखी समृद्ध असावे म्हणून ३६ पैकी निदान १८ गुण मिळवणे आवश्यक असते. यालाच आपण काठावर पास होणे असेही म्हणू शकतो. काही जणांचे ३६ गुणदेखील जुळतात आणि त्यांचे विवाह संपन्न होतात. १८ पेक्षा कमी गुण जुळणाऱ्या पत्रिकांचे मिलन होऊ शकत नाही असे नाही. परंतु जेवढे गुण जुळत नाहीत ते जुळवून घेण्याची तयारी दोहोंनी दर्शवली तर तोही विवाह यशस्वी होऊ शकतो. तशीही अनेक उदाहरणे आपल्याला आसपास दिसतील. पत्रिका जुळलेले असो नाहीतर न जुळलेले असो, लग्न झाल्यावर प्रेम, वाद, मौन, टोमणेबाजी, शेरेबाजी ओघाने आलीच. फक्त त्याकडे तुम्ही किती खिलाडू वृत्तीने नाते हाताळता यावर संसाराचे आयुर्मान दिसते. म्हणून पत्रिका मिलनाचा आग्रह!

पत्रिका मिलनात नेमके कोणते ३६ गुण तपासले जातात?लग्नाच्या वेळी कुंडली जुळताना अष्टकूट गुण दिसतात. यामध्ये नाडीचे ८ गुण, भकूतचे ७ गुण, गण मैत्रीचे ७ गुण, ग्रह मैत्रीचे ५ गुण, योनी मैत्रीचे ४ गुण, नक्षत्राचे 3 गुण, वास्यचे २ गुण आणि वर्णाचे १ गुण जुळले का हे पाहिले जाते. अशा प्रकारे एकूण ३६ गुण आहेत.लग्नानंतर वधू-वर एकमेकांशी मैत्रीपूर्ण असावेत, संतती असावी, सुख, संपत्तीत वृद्धी व्हावी, दीर्घायुष्य लाभावे, यासाठी ही मुख्य चाचणी असते. 

टॅग्स :marriageलग्नAstrologyफलज्योतिष