शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

प्रभू श्रीरामचंद्रांनीदेखील लंकेवर आक्रमणापूर्वी केले होते 'विजया' एकादशीचे व्रत!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: March 08, 2021 10:00 AM

इथे काही जण प्रश्न उपस्थित करतील, की व्रत करून का लढाई जिंकता येते? नक्कीच नाही. परंतु आपल्या प्रयत्नांना उपासनेचे बळ असावे लागते. व्रत-वैकल्यातून ते बळ आपल्याला मिळते. 

माघ कृष्ण एकादशीला 'विजया' एकादशी म्हणून संबोधले जाते. या एकादशीचे व्रत केल्याने जय प्राप्त होतो. प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा नाश करण्यासाठी लंकेवर केलेल्या स्वारीमध्ये जय प्राप्त व्हावा म्हणून बक दाल्भ्य ऋषींच्या सांगण्यानुसार समुद्राच्याकाठी हे व्रत वानरसेनेसह केले होते. परिणामी या व्रताच्या पुण्यप्रभावामुळे रावणासह असंख्य राक्षसांचा वध होऊन प्रभू श्रीरामचंद्रांचा विजय झाला होता. यंदा मंगळवारी अर्थात ९ मार्च रोजी विजया एकादशी आहे.

एकादशी ही भगवान विष्णूंची प्रिय तिथी आहे. त्यांची कृपादृष्टी व्हावी, आपल्या हातून उपासना घडावी, व्रतामध्ये सातत्य राहावे, यासाठी अनेक जण श्रद्धेने महिन्यातून दोनदा येणाऱ्या एकादशीचा उपास करतात. हा उपास इतर उपासासारखा एक वेळ किंवा एकभुक्त नसून दोन्ही वेळेस फलाहार करून किंवा काहीही न खाता करायचा असतो. आपल्या शारीरिक गरजा न थांबणाऱ्या आहेत. त्यावर नियंत्रण मिळवणे, मनावर ताबा मिळवणे आणि मन सन्मार्गी लावणे, हा एकादशी व्रताचा मुख्य हेतू असतो. जेव्हा आपण देहाची आसक्ती कमी करू, तेव्हाच आपल्या हातून हरीनाम घडू शकेल. यासाठी एकादशी व्रताची आखणी केली आहे. 

विजया एकादशीबाबत म्हणायचे, तर प्रभू रामचंद्रांनी हे व्रत केल्यामुळे तिचे महत्त्व अधिकच वाढले आहे. इथे काही जण प्रश्न उपस्थित करतील, की व्रत करून का लढाई जिंकता येते? नक्कीच नाही. परंतु आपल्या प्रयत्नांना उपासनेचे बळ असावे लागते. व्रत-वैकल्यातून ते बळ आपल्याला मिळते. 

सध्याच्या जीवघेण्या स्पर्धात्मक युगात प्रत्येकाला आपल्या कामात विजय हवा असतो. या विजया एकादशी व्रताने जसा रामाला रावणाशी केलेल्या युद्धात विजय मिळाला, तसा आपल्यालाही मिळेल अशा केवळ मानसिक बळानेही आपल्याला मोठा आधार वाटेल. मनोबलाच्या आधारेच तर आपण प्रतिकू लतेवर जय मिळवू शकतो. प्रयत्न करण्यासाठी ज्या मानसिक आधाराची गरज असते, तो ह्या व्रताने नक्कीच मिळू शकेल. मन:शांती, ताणतणावर कमी करण्यासाठी अशी व्रते फार उपयोगी ठरतात.