शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

दोन वेळा जेवायचे की दर दोन तासांनी? बघा आयुर्वेद काय सांगते!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 25, 2021 2:43 PM

आयुर्वेदाचे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ रोगावर इलाज करत नाही, तर रोगाचे समूळ उच्चाटन करते किंवा रोग होऊच नये म्हणून तजवीज करते. त्यामुळे आहाराबाबत एकतर वैद्यकीय सल्ला घ्यावा किंवा आयुर्वेदाने दिलेल्या नियमांचे पालन करावे

अलीकडच्या काळात आपण सगळेच आरोग्याप्रती सजग झालो आहोत. एवढेच काय, तर आपण काय खातो, किती खातो, कसे खातो यावर लक्ष ठेवणारे मोबाईल अ‍ॅप आपल्यावर नियंत्रण ठेवतात, दर अर्ध्या तासाने पाणी पिण्याची सूचना देतात. जेवणात किती कर्बोदके, प्रथिने असली पाहिजेत, याबाबत मार्गदर्शन करतात. एकूणच आपला आहार मोजून मापून होऊ पाहत आहे. हे कमी म्हणून की काय, आपल्यावर सतत डाएट फूडच्या व्हिडिओचा समाज माध्यमांतून मारा होत असतो. अशाने आहारशास्त्राबाबत आपण सावध होत आहोत की गोंधळत आहोत, अशी अवस्था निर्माण होते. याबाबत प्राचीन शास्त्र म्हणून ओळखले जाणारे आयुर्वेद काय म्हणते, ते सुभाषितातून समजावून घेऊ. 

भोजनं हीनमात्रं तु न बलोपचयौजसेसर्वेषां वातरोगाणां हेतुतां च प्रपद्यतेअतिमात्रं पुन: सर्वानाशु दोषान प्रकोपयेत् 

वाग्भट संहितेत हे सुभाषित दिले आहे. उचित प्रमाणाहून कमी अन्न खाल्ले असता बल, पुष्टी व तेज उत्पन्न होत नाही व असे वागणे वातव्याधीस कारणीभूत होते. अति प्रमाणात घेतलेल्या आहाराने तर सर्वच दोषांचा प्रकोप होतो.

श्रीमद्भगवद्गीतेत भगवंतांनी म्हटले आहे, `अन्नाद् भवन्ति भूतानि' म्हणजे अन्नापासूनच सर्व प्राणिमात्र उत्पन्न होतात व अन्नावरच त्यांचे जीवन अवलंबून असते. त्यामुळे योग्य अन्नाचे योग्य प्रमाणात सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे. अतिरिक्त प्रमाणात उपास करून स्वत:ची उपासमार करणे वा डाएटिंगच्या नावाखाली शरीराला क्लेश देणे हे आयुर्वेदाला संमत नाही. त्याने त्रासच होतो. पण त्याचबरोबर अति प्रमाणात घेतलेला आहारही अनेक प्रकारच्या रोगांना आमंत्रण करणारा ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या प्रकृतीनुसार या दोन्हीतला सुवर्णमध्य शोधणे आवश्यक असते.

अन्नेन पूरयेदर्धं तोयेन तु तुतीयकम्उदरस्य तुरीयांशं संरक्षेद्वायुचारणे

पोटाचे चार भाग कल्पून त्यातील दोन भाग अन्नाने भरावेत. एक भाग पाण्याने भरावा व उरलेला चौथा भाग वायूंच्या संरक्षणासाठी मोकळा सोडावा. मात्र अल्पाहार किंवा उपोषण म्हणजे मिताहार नाही, हे लक्षात ठेवावे. 

आयुर्वेदाचे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ रोगावर इलाज करत नाही, तर रोगाचे समूळ उच्चाटन करते किंवा रोग होऊच नये म्हणून तजवीज करते. त्यामुळे आहाराबाबत एकतर वैद्यकीय सल्ला घ्यावा किंवा आयुर्वेदाने दिलेल्या नियमांचे पालन करावे आणि ऐकीव माहितीनुसार शरीरावर कोणतेही प्रयोग करू नये, हे इष्ट!