शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

...म्हणतात ना, 'ज्याचं जळतं, त्याला कळतं'; वाचा ही मार्मिक व मजेदार गोष्ट!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: February 10, 2021 4:22 PM

समोरच्याला नावं ठेवण्याआधी एकदा, स्वत:ला त्याचा जागी नक्कीच ठेवून पहा.

दुसऱ्याचे सांत्वन करताना आपण म्हणतो, 'मी समजू शकतो', वास्तविक पाहता, कोणीही कोणाचे दु:खं समजून घेऊ शकत नाही. आपबिती आल्याशिवाय दु:खाची झळ कळत नाही. म्हणून कोणाचे दु:खं समजून घेता आले, तरी हरकत नाही, पण समोरच्याला नावं ठेवण्याआधी एकदा, स्वत:ला त्याचा जागी नक्कीच ठेवून पहा. वाचा ही मार्मिक आणि मजेदार गोष्ट.

एका शेठजींकडे पाळीव कुत्रा होता. तो त्यांना अतिशय प्रिय होता. ते त्याला जीवापाड जपत असत. ते जिथे जात, तिथे त्यालाही नेत असत. कुत्र्यालादेखील शेठजींचा लळा होता. जणू काही दोघांचा गेल्या जन्मीचा ऋणानुबंध असावा, असे परस्परांशी नाते होते. 

एकदा शेठजींना व्यवहारासाठी परगावी जावे लागणार होते. नौकाप्रवासाशिवाय पर्याय नव्हता. याआधी त्यांनी आपल्या कुत्र्याला इतक्या दूर नेले नव्हते. त्याला घरी सोडून जाण्यासाठी त्यांचा जीव होईना. त्याला सोबत न्यावे की नाही अशा द्विधा मनस्थितीत असताना शेठजी प्रवासाचे सामान घेऊन जायला निघाले, तो कुत्रा त्यांच्याआधी जायला हजर! शेवटी त्यांनी कुत्र्याला सोबत घेतले. 

नावड्याने त्याला प्रवेश नाकारला. शेठजींनी बरीच मनधरणी केल्यावर कुत्र्यालाही नावेत घेण्यात आले. त्या नावेने आणखीही काही प्रवासी प्रवास करत होते. नावाडी नाव वल्हवत दुसऱ्या तीराच्या दिशेने नेत होता. प्रवास सुरू होता. पाण्यावर हलणाऱ्या नावामुळे कुत्रा त्या प्रवासात घाबरला होता. तो भीतीने इथून तिथे धावपळ करत होता. त्याची अस्वस्थता पाहून अन्य प्रवासी घाबरले. अंग चोरून बसू लागले. त्या सगळ्यांच्या हालचालींमुळे नावही डोलू लागली. नदीच्या मध्यावर नाव पोहोचली होती. थोडा जरी तोल गेला, तरी नावेचा अपघात निश्चित होता. कुत्र्याला कसे आवरावे शेठजींना कळेना. त्यांचीही तारांबळ उडाली. 

त्या नावेत एक आजोबा होते. ते शेठजींना म्हणाले, यावर मी तोडगा काढू का? शेठजींनी नाईलाजाने मान डोलवली. आजोबांनी एक दोन तरुणांना हाताशी घेऊन कुत्र्याला पकडले आणि शेठजींच्या डोळ्यादेखत पाण्यात फेकले. शेठजी ओरडू लागले. सगळ्याच प्रवाशांना आजोबांच्या अशा वागण्याचा धक्का बसला. आजोबांनी शेठजींसह सगळ्यांना शांत केले. तेवढ्यात कुत्रा पोहत, जीव वाचवत नावेच्या काठाला पकडून कुडकुडत होता. आजोबांनी त्याला वर ओढले आणि नावेत घेतले. कुत्रा गपचूप एका कोपऱ्यात जाऊन बसला. पण शेठजींचा राग अजूनही शांत झाला नव्हता.

यावर आजोबा शेठजींना म्हणाले, 'हे बघा, तुम्हाला माझा राग येणे स्वाभाविक आहे. पण हे मी आपल्या सर्वांच्या हितासाठी केले. तुमचा कुत्रा अजूनही इथून तिथे भीतीने पळत राहिला असता, तर त्याच्या भीतीने अन्य प्रवाशांपैकी कोणाचा तोल गेला असता. परिणामी एकामुळे पूर्ण नाव कलंडली असती. मात्र, आपल्याला वाटत असलेली भीती कुत्र्याला कळणार नव्हती. म्हणून मी त्याला परिस्थितीची जाणीव करून दिली. पाण्यात पडल्यावर, नाकातोंडात पाणी गेल्यावर जीव मुठीत धरून कसे बसावे लागते, याची त्यालाही कल्पना आली. म्हणून तो गुमान कोपऱ्यात जाऊन बसला आहे.

आजोबांच्या या तोडग्यावर शेठजींना हसू की रडू असे झाले. काही का असेना, पण कुत्र्याचा इतरांना होणारा उपद्रव थांबला आणि पूर्ण प्रवासात शेठजींना आपल्या लाडक्या कुत्र्याची साथ मिळाली. 

तात्पर्य हेच, की समोरच्याला बोलण्याआधी शंभर वेळा विचार करा. कुठली व्यक्ती कोणत्या परिस्थितीचा सामना करत असेल, याची आपल्याला कल्पनाही नसते. आपण बाह्य परिस्थिती पाहून निष्कर्ष लावून मोकळे होतो. म्हणूनच म्हणतात, ज्याचं जळतं, त्यालाच कळतं!