शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

'खाण्यासाठी जगू नये, तर जगण्यासाठी खावे', हे शिकवणारा बालपणीचा श्लोक!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: November 21, 2020 11:30 AM

'हातातोंडाशी आलेला घास जाणे', असा आपल्याकडे एक वाकप्रचार आहे. म्हणजे चांगली संधी हुकणे, असा त्याचा अर्थ. परंतु, या वाकप्रचाराचा शब्दश: अर्थ घेतला, तरी वदनी कवळ घेताना हरीचे नाम का घ्यावे, याची जाणीव होईल. 

ज्योत्स्ना गाडगीळ 

आज सकाळी एक तरुण झपझप पावले टाकत रस्त्याने जाताना दिसला. तो नोकरीवर जाण्याच्या लगबगीत असावा.  मात्र, एवढ्या घाईतही त्याची एक छोटीशी कृती दखलपात्र ठरली. ती अशी, की चालता चालता, त्या तरुणाने जमीनिवर पडलेला भाकरीचा तुकडा उचलून एका झाडाच्या कट्यावर ठेवला आणि तो पुढे निघून गेला. तो तुकडा कोणाच्या पायदळी तुडवला जाऊ नये आणि एखाद्या भुकेल्या प्राण्याच्या तोंडी लागावा, ही उदात्त भावना त्या छोट्याशा कृतीमध्ये दडलेली होती. कोणी आपली दखल घेतली असेल, हे त्याच्या गावीही नसावे, कारण तो पुन्हा आधीच्या वेगाने नजरेआड झाला. मात्र, जाता जाता आपल्या कृतीचा ठसा मनावर उमटवून गेला. 

हेही वाचा : फुटे तरूवर उष्णकाळमासी, 'जीवन' तयासी कोण घाली? (भाग १)

या कृतीनंतर त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे निरखून पाहिले, तर त्याचा चुरघळलेला शर्ट, मळलेली  जिन्स, खांद्यावर जुनाट सॅक दिसली.  बेताची परिस्थिती असलेला तो तरुण, स्वकष्टाच्या अन्नाचे मोल जाणत होता, हे लक्षात आले. याच जाणीवेतून त्याच्याही नकळत ही कृती घडली असावी. ती पाहता 'अन्न हे पूर्णब्रह्म' या श्लोकाची आठवण झाली. जेवणाआधी श्रीहरीस्मरण का करावे, हा बालवयात झालेला संस्कार आठवला. 

वदनी कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे,सहज हवन होते, नाम घेता फुकाचे,जीवन करी जिवित्त्वा, अन्न  हे पूर्णब्रह्म,उदर भरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म।

'हातातोंडाशी आलेला घास जाणे', असा आपल्याकडे एक वाकप्रचार आहे. म्हणजे चांगली संधी हुकणे, असा त्याचा अर्थ. परंतु, या वाकप्रचाराचा शब्दश: अर्थ घेतला, तरी वदनी कवळ घेताना हरीचे नाम का घ्यावे, याची जाणीव होईल. 

अन्न आहे, परंतु शिजवलेले नाही. शिजवलेले अन्न आहे, परंतु खाण्यासाठी हात नाहीत, अन्न आहे, हात आहेत, परंतु तब्येत ठीक नाही. तब्येत उत्तम आहे, परंतु अन्नच समोर नाही. अशा परिस्थितीत पोटात घास जाणार तरी कसा? मात्र, या गोष्टीची जाणीव कठीण प्रसंगात होते. जेव्हा दोन वेळच्या जेवणासाठी कोणाची लाचारी पत्करावी लागते. तेव्हाच, रोज न मागता ताटात वाढलेल्या भोजनाचे आणि विनासायास मुखात गेलेल्या अन्नाचे, अन्नपूर्णेचे आणि अन्नदात्याचे महत्त्व कळते. 

तोंडापर्यंत नेलेला घास तोंडात जाईलच असे नाही. गेलाच, तर तो पचेल, रूचेल असे नाही, पचलाच, तरी तो अंगी लागेलच असे नाही. म्हणून पूर्वजांनी सूचना केली आहे, वदनी कवळ घेत असतानाच श्रीहरीचे नाव घ्या, म्हणजे अन्नाचा घास तोंडात जाण्यापासून तो अंगी लागण्यापर्यंतची जबाबदारी श्रीहरी सांभाळेल. फुकाचे म्हणजे फुकट, विनामूल्य असलेल्या नामस्मरणाने, शरीररूपी यज्ञकुंडात अन्नरूपी टाकलेल्या समीधांचे यथायोग्य हवन होते. 

हेही वाचा : बाळा दुग्ध कोण करीतो उत्पत्ती, वाढवे श्रीपती सवे दोन्ही! भाग २

ज्याने चोच दिली, त्याने चारा दिला, त्या परमात्म्याचे स्मरण करायचे, कारण, त्याने केवळ आपली सोय लावून दिलेली नाही, तर सृष्टीतील प्रत्येक जीवात्मा त्याने तृप्त केला आहे. आपला अन्नदाता शेतकरी, आपला कष्टकरी कुटुंबप्रमुख आणि आपली आवड निवड जपणारी अन्नपूर्णा यांचेही त्यानिमित्ताने स्मरण आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो क्षण आहे. त्याचवेळेस, सीमेवर आणि सीमेअंतर्गत रक्षण करणाऱ्या रक्षकांचेदेखील मनोमन आभार मानायचे. कारण, ते डोळ्यात तेल ओतून शत्रूपासून आपले संरक्षण करत आहेत, म्हणून आपण आपल्या घरात सुखेनैव भोजनाचा आस्वाद घेत आहोत. हे सगळे आपले पालक आहेत. श्रीहरीची रूपे आहेत. ते नसते, तर आपली उपासमार झाली असती. 

ब्रह्मज्ञान म्हणतात, ते हेच! ब्रह्म आपल्यात सामावले आहे. आपल्या आत वसलेल्या भगवंताला हा नैवेद्य अर्पण करून 'अन्न हे पूर्णब्रह्म' याची जाणीव करून द्यायची. जेणेकरून अन्नाची किंमत कळेल आणि त्याची नासाडी होणार नाही. जेवढे गरजेचे, तेवढेच पानात वाढून घेतले जाईल. अन्न आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करते. अतिरिक्त अन्न ग्रहण केल्यामुळे आळस चढतो, म्हणून ते ग्रहण करत असताना स्वत:लाच बजवायचे,

उदर भरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म!

'खाण्यासाठी जगू नये, तर जगण्यासाठी खावे.' पोट भरणे, हा जेवणाचा हेतू नाही, तर शरीर कार्यन्वित ठेवण्यासाठी लागणारी ऊर्जा अन्नातून कमावणे, हा त्यामागचा हेतू आहे. 

एवढ्या सगळ्या गोष्टी चार ओळीत सामावलेल्या आहेत. त्या तरुणाने बहुदा, हे महत्त्व जाणले असावे, अंगिकारले असावे. त्याने त्याचे काम केले, आता आपली पाळी आहे. 

हेही वाचा :तेणे तुझी काय नाही केली चिंता, राही त्या अनंता आठवोनि! (भाग ३)