शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

कोणी तुमच्या अक्षराला कोंबडीचे पाय म्हटले तर रागावू नका, स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 4:35 PM

हस्ताक्षराशी निगडित काही मजेशीर गोष्टी!

मोबाईल आणि कॉम्प्युटर आल्यापासून आपलाच काय पण विद्यार्थ्यांचाही लेखनाचा सराव सुटला आहे. कोव्हीड काळात तर जरा जास्तच! मध्यंतरी बातमी होती, की सगळा अभ्यास संगणकीय पद्धतीने झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यात अडचणी येत आहेत. याचाच अर्थ लेखनाशी आपण किती दुरावलो आहोत ते पहा! बालपणी किती निगुतीने हस्ताक्षर रेखाटण्याचा आपण प्रयत्न केला असेल, परंतु आता कोणी काही लिहायला सांगितले, तर कागदावर जणू काही किडा मुंग्यांची पावले उमटतील. तर काही जणांचे अक्षर एवढे वाईट येते की त्यांना स्वतःलाही वाचता येत नाही. परंतु, अजूनही काही जणांचे अक्षर अगदी मोत्याच्या दाण्यासारखे रेखीव असते. लिखाणाचा सराव असो व नसो, परंतु आपल्या हस्ताक्षरावरून स्वभाव कळतो असे म्हणतात. याचे स्वतंत्र शास्त्र आहे आणि त्याचा सखोल अभ्यास करणारे अभ्यासकही आहेत. अशाच काही गोष्टींवरून आपण आपला आणि इतरांचा स्वभाव हस्ताक्षराशी मेळ खातोय का, ते पाहूया...!

छोटे अक्षर स्वार्थी, निग्रही व्यक्तिमत्त्वाचे लक्षण मानले जाते. याउलट मोठे अक्षर नेतृत्वाचे गुण दर्शवते. 

स्वभावाबरोबर हस्ताक्षर बदलते आणि हस्ताक्षराबरोबर स्वभाव बदलतो. 

स्वच्छ, टापटीप हस्ताक्षर असणारी व्यक्ती तिच्या राहणीमानाबाबतही टापटीप असते. 

ज्यांचे हस्ताक्षर ओळीच्या वर डोकावत राहते, ते लोक म्हत्त्वाकांक्षी असतात. ते आपले ध्येय जिद्दीने मिळवतात. 

ज्यांचे अक्षर वळणदार असते, ते लोक प्रत्येक बाबतीत गोपनीयता ठेवतात आणि कधीही कोणतीही खेळी खेळू शकतात. 

ज्यांचे अक्षर सुरुवातील मोठे आणि पुढे पुढे मुंगीच्या पावलांसारखे लहान लहान होत जाते, असे लोक अतिशय लबाड असतात.

ज्यांचे अक्षर सुरुवातील रेखीव आणि नंतर कोंबडीच्या पायासारखे असते, ते लोक आरंभशूर असतात. कामाची सुरुवात उत्साहाने करतात पण लगेचच त्यांचा उत्साह मावळत जातो. 

ओळीला जोडून काढलेले अक्षर हे वक्तशीरपणा, एकनिष्ठता आणि वचनाला पक्के असण्याची खूण आहे. असे लोक अतिशय प्रामाणिक असतात. 

ज्यांचे अक्षर सुरुवातीपासून शेवट्पर्यंत एकसारखे असते, असे लोक सरळ स्वभावाचे तसेच ईमानदार, उदार असतात.