शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

लोकांना दाखवण्यासाठी आनंदी राहू नका, स्वतःसाठी आनंदी राहायला शिका!- गौर गोपाल दास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 16:14 IST

भावनांचा निचरा होणे अतिशय गरजेचे असते, अन्यथा चुकीच्या ठिकाणी भावनांचा बांध फुटू शकतो.

प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहायला शिका, असे सांगितले जाते. परंतु दर वेळी सकारात्मकता ओढून ताणून आणता येत नाही. जेव्हा आयुष्यात काही अवघड प्रसंग येतात, जसे की घटस्फोट होणे, जवळच्या व्यक्तीचे निधन होणे, प्रेम भंग होणे, फसवणूक होणे अशा प्रसंगाला आपण सकारात्मक वळण कसे देणार? त्यातूनही सकारात्मकता शोधणे हे मानवी स्वभावाच्या विरुद्ध वर्तन ठरेल. हे वर्तन फार काळ टिकणार नाही. त्याला आपण अवसान आणणे असे म्हणतो.  मनाला मोकळे व्हावेसे वाटते, रडावेसे वाटते, कोणालातरी आपले दुःख सांगावेसे वाटते. या गोष्टी खूप नैसर्गिक आहेत. या नकारात्मक अजिबात नाहीत. भावनांचा निचरा होणे अतिशय गरजेचे असते, अन्यथा चुकीच्या ठिकाणी भावनांचा बांध फुटू शकतो.

जीवनातील नकारात्मक घटना पचवण्याची ताकद म्हणजे सकारात्मकता. ती लोकांना दाखवण्याची गरज नसते. ती आतून मनाला उभारी देते. नकारात्मक प्रसंगातून बाहेर पडण्याची ताकद देते. अशा सकारात्मकतेची आपल्याला गरज आहे. 

दुर्दैवाने लोक सकारात्मकतेचा चुकीचा अर्थ काढतात. विशेषतः समाज माध्यमांवर सगळेच जण आमचे आयुष्य किती गुण्यागोविंदाने सुरू आहे असे दाखवतात. ते पाहून इतरांच्या मनात असूया निर्माण होते आणि नकारात्मकतेत भर पडते. परंतु, आपल्या आयुष्याची नकारात्मक बाजू कोणी जाहीरपणे मांडत नाही. त्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्यात सगळे काही छान सुरु आहे, या संभ्रमात आपण जगत राहतो आणि आपल्या नियतीला दोष देत राहतो. परंतु, बरे वाईट प्रसंग प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात. कोणी त्यावर मात करून पुढे जातात तर कोणी तिथेच अडकून राहतात. 

सकारात्मकता आपल्या विचारांचा आणि जगण्याचा भाग झाली पाहिजे. परंतु, सकारात्मकतेचे मनाला ओझे वाटता कामा नये. ओढून ताणून आणलेला आनंद, उसने अवसान फार काळ टिकत नाही. खोटे मुखवटे गळून पडतात. म्हणून स्वतःशी प्रामाणिक राहा. स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. विश्वासू व्यक्तीशी सुख दुःखाची देवाण घेवाण करा. अशी व्यक्ती आयुष्यात नसेल, तर मनातल्या गोष्टी कागदावर उतरवून मन मोकळे करा. मन मोकळे झाले तरच सकारात्मकतेचा शिरकाव होईल आणि तुम्ही जगासाठी नाही तर स्वतःसाठी आनंदी राहायला शिकाल!