शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

तुम्हालाही झटपट श्रीमंत व्हायचे आहे? मग ही गोष्ट वाचाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 08:00 IST

यशस्वी व्हायचे असेल, सर्व प्रथम आपली ठराविक चाकोरी मोडायला हवी. चौकटीच्या बाहेरचे विश्व पहायला हवे. तसे केले, तरच तुम्हीदेखील एक ना एक दिवस नक्की यशस्वी व्हाल!

एकदा एक साधू महाराज या गावातून त्या गावात प्रबोधन करत चालले असता एका गावात मुक्कामी थांबले. त्यांनी मुद्दाम एक गरीबाच्या झोपडीचा आश्रय मागितला. त्या झोपडीत नवरा बायको दोघेच होते आणि झोपडीबाहेर एक गाय दावणीला बांधली होती. 

साधू महाराजांना एका रात्रीसाठी आश्रय मिळावा, म्हणून नवरा बायकोने जमेल तसे आदरातिथ्य केले. प्यायला दूध आणि जेवायला भाजी भाकरी दिली. साधू महाराजांनी त्यांची विचारपूस केली. त्यांचा व्यवसाय विचारला.

नवरा म्हणाला, `आमचे सगळे काही ठिक चालले आहे महाराज. झोपडीबाहेर बांधलेली गाय, तिला आम्ही कामधेनूच म्हणतो. तिच्या कृपेने दोन वेळच्या जेवणाची सोय होत आहे. तिचे अमृततुल्य दूध विकून आमची गुजराण होत आहे.'

तो हे सांगत असताना बायको मात्र धस्फ़ुसत होती. साधू महाराजांनी तिलाही बोलायला सांगितले. ती म्हणाली, `धनी म्हणतात ते खोटे नाही. गायीमुळे आमची रोजी रोटी सुरू आहे. पण किती दिवस हे गरीबीत दिवस काढायचे. मला वाटते, श्रीमंत असावे, उंची कपडे घालावे, दोन वेळच्या जेवणासाठी मिळकतीवर अवलंबून न राहता, अन्नाची कमतरता भासू नये. या उत्पन्नातून आपलेच काय, तर इतरांचेही पोट भरावे. पण दूरवर आशेचा किरण दिसत नाही. काय करावे महाराज?'

त्यावर साधू महाराज म्हणाले, `सर्वप्रथम गाय विकून टाका. तिच्यामुळे तुमची प्रगती थांबली आहे.'असे म्हणत साधू बाबा एक रात्रीची विश्रांती घेऊन निघून गेले. नवरा बायको त्यांच्या बोलण्याचा विचार करू लागले. त्यांना वाटले ही गाय अशुभ आहे, तिच्यामुळेच आपली प्रगती थांबली आहे, असे बहुदा साधू महाराजांना सुचवायचे असावे.

आर्थिक परिस्थिती सुधारावी, म्हणून त्यांनी साधू महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जड अंत:करणाने गायीला योग्य हाती सोपवले. परंतु उत्पन्नाचे एकमेव साधन बंद झाल्यामुळे त्यांची परिस्थिती आणखी बिघडली. 

साधारण वर्षभराने साधू महाराज तिथे आले आणि त्यांनी त्याच घरात जाऊन आश्रय मागितला. मात्र आता झोपडीवजा घर दुमजली बंगल्यासारखे विस्तारले होते. अंगणात चार गायी, चार बकऱ्या , २ म्हशी, कोंबड्या एवढे पशुधन वाढले होते. दार उघडताच सर्व सुविधांनी युक्त असलेले आलिशान घर दिसले. त्या माणसाने साधूंना ओळखले. व त्यांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन केले, म्हणून फळ मिळाले, असे सांगितले.

साधू महाराजा खुश झाले. एका गायीवर दोघांचा चरितार्थ अवलूंन असल्याने, प्रगतीला वाव नव्हता. ती विकल्यानंतर उपजिवीकेचे साधन गमावल्याची खंत वाटू लागली. व त्याने आणखी मेहनत करून, दुसऱ्याच्या घरी चाकरी करून, पैसे साठवून वर्षभरात स्वत:ची एवढी प्रगती केली, जी त्याने एवढ्या वर्षात कधीच केली नव्हते. 

याचाच अर्थ ते दाम्पत्य गायीवर अवलंबून होते. तो आधार सुटल्यामुळे त्यांनी त्यांची प्रगती केली. आपल्यालाही आपली प्रगती करायची असेल, श्रीमंत-यशस्वी व्हायचे असेल, सर्व प्रथम आपली ठराविक चाकोरी मोडायला हवी. चौकटीच्या बाहेरचे विश्व पहायला हवे. तसे केले, तरच तुम्हीदेखील एक ना एक दिवस नक्की यशस्वी व्हाल!