शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही ताटातले अन्न फेकता? मृत्यूनंतर नरकात जाण्याची तयारी ठेवा; वाचा गरुड पुराण काय सांगते... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 12:50 IST

जेवढं आवश्यक आहे तेवढेच अन्न वाढून घ्या, अतिरिक्त झालेले उष्ट अन्न फेकण्याची चूक करत असाल तर या महापापाची शिक्षाही जाणून घ्या!

मृत्यूपश्चात आत्म्याला गती कशी आणि कोणत्या दिशेने मिळेल या संबंधी गरुड पुराणात वर्णन केले आहे. हे वर्णन यासाठी कारण मनुष्याने ते वाचून आपल्या हयातीत अर्थात जिवंत असताना नीतिमूल्याला सोडून आचरण करून नये यासाठी ही आचारसंहिता! असाच एक नियम अन्न सेवनाबाबतीत दिला आहे. 

'अन्न हे पूर्णब्रह्म' असे आपण म्हणतो, पण खरोखरच अन्नाची किंमत ठेवतो का? विशेषतः सण समारंभात लोक हौशीने ताटात सगळं काही वाढून घेतात आणि पोट भरलं म्हणून किंवा आवडलं नाही म्हणून निर्लज्जपणे फेकून देतात. जेवढी भूक तेवढेच वाढून घेता यावे यासाठी बुफेची व्यवस्था असते. मात्र तिथे सगळ्याच पदार्थांची चव घेता यावी म्हणून लोक ताटभर जेवण घेतात आणि सगळ्या गोष्टी खाल्ल्या जात नाहीत म्हणून फेकून देतात. अन्नाची नासाडी करणाऱ्यांबद्दल गरुड पुराणात कठोर शिक्षा दिल्या आहेत. ही शिक्षा देहाला नाही तर आत्म्याला भोगावी लागते आणि नरकातही जागा मिळत नाही असे म्हटले आहे. अन्नाला एवढे महत्त्व का दिले आहे? जाणून घ्या. 

जर तुम्हाला एका खोलीत कोंडून ठेवले आणि पंधरा दिवस अन्न दिले नाही. तुमच्याकडून नाईलाजाने उपास झाला. तुम्ही देवाचा धावा केला आणि देव प्रगट झाला, तर तुम्ही देवाकडे सगळ्यात आधी काय मागाल? तर अन्न!

अशी उपासमार झाल्यावर अन्नाची खरी किंमत कळते. अन्न हे केवळ भोजन किंवा जिभेची रसनापूर्ती करणारे माध्यम नाही, तर ताटात वाढलेले अन्न हे जीवन समृद्ध करणारे घटक आहे. त्यामुळे अन्नाला सन्मानपूर्वक ग्रहण केले पाहिजे. अन्न शरीरात गेल्यावर रक्त आणि मांस बनते तेव्हा त्याची किंमत वाढते. ते तुमच्यासमोर येते तेव्हा त्याला आपल्या शरीराचा एक भाग समजा. श्रद्धापूर्वक त्याचे सेवन करा. ते वाया जाणार नाही याची काळजी घ्या. 

आजही गरिबीमुळे अनेकांची अन्नान्न दशा होते. अशा लोकांना दोन वेळचे जेवण मिळणेही दुर्लभ असते. अशा वेळी आपण आपल्या जिभेचे चोचले पुरवताना सामाजिक भान जपले पाहिजे. जेवढे हवे तेवढेच अन्न वाढून घेतले पाहिजे. जी व्यक्ती अन्न टाकते तिला टोकले पाहिजे. लग्न समारंभ तसेच हॉटेलमध्ये जेवण टाकणाऱ्यांना आर्थिक शिक्षा दिली पाहिजे, त्याशिवाय अन्नाची, पाण्याची नासाडी थांबणार नाही. 

जे सहज मिळते त्याची किंमत नसते, मग ते अन्न असो नाहीतर स्वातंत्र्य; यासाठी आचारसंहिता हवीच!

टॅग्स :foodअन्न