शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

तुम्ही ताटातले अन्न फेकता? मृत्यूनंतर नरकात जाण्याची तयारी ठेवा; वाचा गरुड पुराण काय सांगते... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 12:50 IST

जेवढं आवश्यक आहे तेवढेच अन्न वाढून घ्या, अतिरिक्त झालेले उष्ट अन्न फेकण्याची चूक करत असाल तर या महापापाची शिक्षाही जाणून घ्या!

मृत्यूपश्चात आत्म्याला गती कशी आणि कोणत्या दिशेने मिळेल या संबंधी गरुड पुराणात वर्णन केले आहे. हे वर्णन यासाठी कारण मनुष्याने ते वाचून आपल्या हयातीत अर्थात जिवंत असताना नीतिमूल्याला सोडून आचरण करून नये यासाठी ही आचारसंहिता! असाच एक नियम अन्न सेवनाबाबतीत दिला आहे. 

'अन्न हे पूर्णब्रह्म' असे आपण म्हणतो, पण खरोखरच अन्नाची किंमत ठेवतो का? विशेषतः सण समारंभात लोक हौशीने ताटात सगळं काही वाढून घेतात आणि पोट भरलं म्हणून किंवा आवडलं नाही म्हणून निर्लज्जपणे फेकून देतात. जेवढी भूक तेवढेच वाढून घेता यावे यासाठी बुफेची व्यवस्था असते. मात्र तिथे सगळ्याच पदार्थांची चव घेता यावी म्हणून लोक ताटभर जेवण घेतात आणि सगळ्या गोष्टी खाल्ल्या जात नाहीत म्हणून फेकून देतात. अन्नाची नासाडी करणाऱ्यांबद्दल गरुड पुराणात कठोर शिक्षा दिल्या आहेत. ही शिक्षा देहाला नाही तर आत्म्याला भोगावी लागते आणि नरकातही जागा मिळत नाही असे म्हटले आहे. अन्नाला एवढे महत्त्व का दिले आहे? जाणून घ्या. 

जर तुम्हाला एका खोलीत कोंडून ठेवले आणि पंधरा दिवस अन्न दिले नाही. तुमच्याकडून नाईलाजाने उपास झाला. तुम्ही देवाचा धावा केला आणि देव प्रगट झाला, तर तुम्ही देवाकडे सगळ्यात आधी काय मागाल? तर अन्न!

अशी उपासमार झाल्यावर अन्नाची खरी किंमत कळते. अन्न हे केवळ भोजन किंवा जिभेची रसनापूर्ती करणारे माध्यम नाही, तर ताटात वाढलेले अन्न हे जीवन समृद्ध करणारे घटक आहे. त्यामुळे अन्नाला सन्मानपूर्वक ग्रहण केले पाहिजे. अन्न शरीरात गेल्यावर रक्त आणि मांस बनते तेव्हा त्याची किंमत वाढते. ते तुमच्यासमोर येते तेव्हा त्याला आपल्या शरीराचा एक भाग समजा. श्रद्धापूर्वक त्याचे सेवन करा. ते वाया जाणार नाही याची काळजी घ्या. 

आजही गरिबीमुळे अनेकांची अन्नान्न दशा होते. अशा लोकांना दोन वेळचे जेवण मिळणेही दुर्लभ असते. अशा वेळी आपण आपल्या जिभेचे चोचले पुरवताना सामाजिक भान जपले पाहिजे. जेवढे हवे तेवढेच अन्न वाढून घेतले पाहिजे. जी व्यक्ती अन्न टाकते तिला टोकले पाहिजे. लग्न समारंभ तसेच हॉटेलमध्ये जेवण टाकणाऱ्यांना आर्थिक शिक्षा दिली पाहिजे, त्याशिवाय अन्नाची, पाण्याची नासाडी थांबणार नाही. 

जे सहज मिळते त्याची किंमत नसते, मग ते अन्न असो नाहीतर स्वातंत्र्य; यासाठी आचारसंहिता हवीच!

टॅग्स :foodअन्न