शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

देवाची पूजा करताना शास्त्रात दिलेल्या 'या' नियमांचे तुम्ही उल्लंघन तर करत नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 18:15 IST

देवपूजेत आपले मन लागावे यासाठी छोट्या छोट्या नियमांचे जरुर पालन करा.

आपण सगळेच जण रोज देवपूजा करतो. कधी अगदी फुरसतीत तर कधी अगदी पटापटा उरकून घेतो आणि इतर कामाला लागतो. परंतु अशाच घाईगडबडीत आपल्याकडून शास्त्रात दिलेल्या देवपूजेच्या नियमांचे उल्लंघन तर होत नाही ना याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. ते सोपे नियम कोणते हे जाणून घेऊ. 

उपासनेला पूजेची जोड देताना सर्व देवीदेवतांच्या बाबतीत पुढील नियमांचे पालन होणे अनिवार्य ठरते. 

>>पूजेची खोली नेहमी स्वच्छ ठेवा कारण तिथून आपल्याला सकारात्मकता मिळते. देवघर गलिच्छ ठेवल्याने साग्रसंगीत पूजा करूनही मनाला प्रसन्नता मिळत नाही, मनःशांती गवसत नाही. 

>>पूजा करताना नेहमी आसनावर बसा. थोडा वेळ का होईना ध्यान करा. आपल्यासाठी स्वतंत्र जपमाळ ठेवा. रोज नित्यनेमाने १०८ वेळा न चुकता कोणत्याही उपास्य देवतेचा नामजप करा. 

>>पूजेची वेळ निश्चित ठेवा आणि दररोज एकाच वेळी पूजा करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे उपासनेची शक्ती वाढते. हे सातत्य टिकवणे अतिशय महत्त्वाचे आहे. याबाबतीत आपल्याला आपल्या आजी आजोबांचा आदर्श ठेवता येईल. 

>>पूजा करताना पांढरे आणि धुतलेले वस्त्र परिधान करा. त्यामुळे नकारात्मक ऊर्जेपासून तुमचा बचाव होईल आणि पूजेचे पावित्र्य जपले जाईल. त्यालाच आपण सोवळ्यात पूजा करणे असे म्हणतो. तसे केल्याने इतर विषय, विकार, वासना मनाला जडत नाहीत आणि पूजेत मन एकाग्र होते. 

>>नेहमी दोन्ही हात जोडून आणि डोकं जमिनीवर टेकवून देवाला नमस्कार करा. तसे केल्याने आपल्यातला अहंकार नष्ट होतो आणि आपण नम्र होतो. 

>>दिव्याने दिवा लावू नका. चुकून अपघात होऊन दिवा मालवण्याची शक्यता असते. तसे होणे अशुभ मानले जाते. ते विघ्न टाळण्यासाठी काडीचा किंवा मेणबत्तीचा वापर करून दुसरा दिवा लावावा. 

>>तसेच तुपाच्या दिव्यावर तेलाचा दिवा किंवा तेलाच्या दिव्यावर तुपाचा दिवा लावू नका. तूप आणि तेल दोन्ही घटक वेगळे असल्याने ते एकत्रित लावणे योग्य नाही असे शास्त्र सांगते. 

>>नेहमी लक्षात ठेवा की भगवान विष्णूच्या पूजेत शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि शनिदेवाच्या पूजेमध्ये राईच्या तेलाचा दिवा लावा.

>>शंकराला कुंकू लावू नका, गणपतीला तुळस वाहू नका, दत्त गुरूंना तांबडे फुल वाहू नका. ज्या देवतेला जे पुष्प प्रिय आहे तेच अर्पण करा. 

>>रोज एखादे स्तोत्र अवश्य म्हणा किंवा पूजा करत असताना ऐका. तुमच्या बरोबर घरच्या इतर लोकांकडूनही नकळत ईश सेवा घडेल, वाणी शुद्ध होईल आणि घरातल्या लहान मुलांवर चांगले संस्कार होतील.