शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
3
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
4
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
6
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
7
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
8
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
9
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
10
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
12
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
13
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
14
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
15
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
16
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
17
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
18
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
19
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
20
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन

देवाची पूजा करताना शास्त्रात दिलेल्या 'या' नियमांचे तुम्ही उल्लंघन तर करत नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 18:15 IST

देवपूजेत आपले मन लागावे यासाठी छोट्या छोट्या नियमांचे जरुर पालन करा.

आपण सगळेच जण रोज देवपूजा करतो. कधी अगदी फुरसतीत तर कधी अगदी पटापटा उरकून घेतो आणि इतर कामाला लागतो. परंतु अशाच घाईगडबडीत आपल्याकडून शास्त्रात दिलेल्या देवपूजेच्या नियमांचे उल्लंघन तर होत नाही ना याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. ते सोपे नियम कोणते हे जाणून घेऊ. 

उपासनेला पूजेची जोड देताना सर्व देवीदेवतांच्या बाबतीत पुढील नियमांचे पालन होणे अनिवार्य ठरते. 

>>पूजेची खोली नेहमी स्वच्छ ठेवा कारण तिथून आपल्याला सकारात्मकता मिळते. देवघर गलिच्छ ठेवल्याने साग्रसंगीत पूजा करूनही मनाला प्रसन्नता मिळत नाही, मनःशांती गवसत नाही. 

>>पूजा करताना नेहमी आसनावर बसा. थोडा वेळ का होईना ध्यान करा. आपल्यासाठी स्वतंत्र जपमाळ ठेवा. रोज नित्यनेमाने १०८ वेळा न चुकता कोणत्याही उपास्य देवतेचा नामजप करा. 

>>पूजेची वेळ निश्चित ठेवा आणि दररोज एकाच वेळी पूजा करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे उपासनेची शक्ती वाढते. हे सातत्य टिकवणे अतिशय महत्त्वाचे आहे. याबाबतीत आपल्याला आपल्या आजी आजोबांचा आदर्श ठेवता येईल. 

>>पूजा करताना पांढरे आणि धुतलेले वस्त्र परिधान करा. त्यामुळे नकारात्मक ऊर्जेपासून तुमचा बचाव होईल आणि पूजेचे पावित्र्य जपले जाईल. त्यालाच आपण सोवळ्यात पूजा करणे असे म्हणतो. तसे केल्याने इतर विषय, विकार, वासना मनाला जडत नाहीत आणि पूजेत मन एकाग्र होते. 

>>नेहमी दोन्ही हात जोडून आणि डोकं जमिनीवर टेकवून देवाला नमस्कार करा. तसे केल्याने आपल्यातला अहंकार नष्ट होतो आणि आपण नम्र होतो. 

>>दिव्याने दिवा लावू नका. चुकून अपघात होऊन दिवा मालवण्याची शक्यता असते. तसे होणे अशुभ मानले जाते. ते विघ्न टाळण्यासाठी काडीचा किंवा मेणबत्तीचा वापर करून दुसरा दिवा लावावा. 

>>तसेच तुपाच्या दिव्यावर तेलाचा दिवा किंवा तेलाच्या दिव्यावर तुपाचा दिवा लावू नका. तूप आणि तेल दोन्ही घटक वेगळे असल्याने ते एकत्रित लावणे योग्य नाही असे शास्त्र सांगते. 

>>नेहमी लक्षात ठेवा की भगवान विष्णूच्या पूजेत शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि शनिदेवाच्या पूजेमध्ये राईच्या तेलाचा दिवा लावा.

>>शंकराला कुंकू लावू नका, गणपतीला तुळस वाहू नका, दत्त गुरूंना तांबडे फुल वाहू नका. ज्या देवतेला जे पुष्प प्रिय आहे तेच अर्पण करा. 

>>रोज एखादे स्तोत्र अवश्य म्हणा किंवा पूजा करत असताना ऐका. तुमच्या बरोबर घरच्या इतर लोकांकडूनही नकळत ईश सेवा घडेल, वाणी शुद्ध होईल आणि घरातल्या लहान मुलांवर चांगले संस्कार होतील.