शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

रोज नामस्मरण करताय? मग 'हे' नियमी अवश्य पाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 18:21 IST

नामस्मरण हे निष्काम भावनेने म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता होणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील नियमांचे पालन करावे.

दगडावर एकाचवेळी खूप पाणी टाकले तर दगड ओला होईल आणि काही वेळानंतर पूर्वीसारखा कोरडा होईल. पण त्यावर सतत एकाच बिंदूवर थेंबाथेंबाने पाणी पडत राहिल्यास त्या दगडाला छिद्र होऊन तो भंग पावतो. त्याचप्रमाणे नामस्मरणाच्या थेंबाने जीवनातील दु:खाचा दगड फुटून जातो. 

संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात, भगवंत प्राप्तीच्या सर्व प्रकारांपेक्षा सोपा प्रकार आहे, तो म्हणजे नामस्मरणाचा! `नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची' या अभंगात तर ते म्हणतात, नामस्मरणाने सकल पापांचा नाश होतो, सकल दु:खाचा विसर पडतो. ते घेण्यासाठी फार कष्ट लागत नाही. वनात जावे लागत नाही. व्यावहारिक कामे करता करताही मुखाने अखंड नामस्मरण करता येते. नामस्मरण कोणाचे करावे असा ठराविक नियमही नाही. आवडी अनंत आळवावा, म्हणजे ज्या देवतेची उपासना करता, त्याचे मनोभावे नाम घ्या. नामस्मरण हे निष्काम भावनेने म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता होणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील नियमांचे पालन करावे.

  • स्वार्थबुद्धीचा त्याग करावा.
  • यम नियमांचे पालन करावे.
  • परान्न घेऊ नये.
  • परनिंदा करून नये.
  • दयाबुद्धी ठेवावी. 
  • कौटुंबिक जीवनातील जबाबदाऱ्या काळजीपूर्वक पार पाडाव्यात.
  • कितीही त्रास झाला तरी शांत राहावे.
  • मांसभक्षण, मदिरापान, व्यसन इ. निषिद्ध कर्म करू नयेत. 
  • जप सद्गुरू करून घेत आहेत, ही भावना ठेवावी.
  • शिव आणि नारायण यांच्यात भेद करू नये. सर्व देवांमध्ये परमतत्त्व पाहावे.
  • मासिक पाळीच्या काळात जपाची माळ न घेता केवळ मुखाने नामस्मरण करावे. 
  • रोज शिवकवच, पंचमुखी हनुमान कवचाचे किंवा कोणत्याही एका स्तोत्राचे नित्यनेमाने पठण करावे.
  • परस्त्रीला मातेसमान मानावे.
  • दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा ठेवू नये.
  • संशय, विकल्प आले, तरी नामस्मरण सोडू नये.