शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

Tulsi Plant Tips: तुळशीच्या बाजूला चुकूनही ठेवू नका ‘या’ गोष्टी; लक्ष्मी देवी होईल नाराज, बसेल मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 15:20 IST

बहरलेली तुळस घराच्या भरभराटीचे लक्षण मानले जाते. नेमके काय करू नये? जाणून घ्या...

आपल्या संस्कृती आणि परंपरांमध्ये तुळशीचे रोप लावणे अत्यंत शुभ मानले जाते. तुळशीच्या रोपाला धार्मिक, वैज्ञानिक आणि शास्त्रीयदृष्ट्या अनन्य साधारण महत्त्व असल्याचे सांगितले जाते. घरात तुळशीचे रोप ठेवणे ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात खूप फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. या सर्व कारणांमुळे बहुतेक घरांमध्ये तुळशीचे रोप असते. भगवान विष्णूच्या पूजेमध्ये तुळशीची पाने अर्पण केली जातात. भगवान विष्णूंची पूजा तुळशीशिवाय पूर्ण होत नाही. त्यात लक्ष्मी देवी वास करते असे मानले जाते.

तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते.  दररोज तुळशीला पाणी अर्पण करणे आणि सकाळ संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावल्याने जीवनात सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते. बहरलेली तुळस आपल्या दारात, अंगणात, खिडकीत, गॅलरीत असणे हे भरभराटीचे लक्षण मानले जाते. मात्र, घरातील तुळशीच्या बाजूला काही गोष्टी चुकूनही ठेवू नये, असे सांगितले जाते. अन्यथा लक्ष्मी देवीची नाराजी ओढावली जाऊ शकते. लक्ष्मी देवी घरातून निघून जाऊ शकते, असे म्हटले जाते. याचे मोठे नुकसान सोसावे लागू शकते, असेही सांगितले जाते. नेमके काय करू नये? जाणून घेऊया...

तुळशीचे रोप चुकीच्या दिशेने ठेवल्याने फायदा होत नाही

तुळशीचे रोप नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावे. तुळशीचे रोप चुकीच्या दिशेने ठेवल्याने फायदा होत नाही. घरात तुळशीचे रोप लावणे पुरेसे नाही, तर त्याची रोज पूजा आणि सेवाही करावी. यासाठी रोज सकाळी आंघोळ करून तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी दिवा लावावा, असे सांगितले जाते. तसेच घरातील स्त्रीने तुळशीला जल अर्पण करताना केस कधीही मोकळे ठेवू नयेत. सुवासिनींनी नेहमी तुळशीला केस बांधून जल अर्पण करावे. शक्य असल्यास दुधात जलार्पण करावे.

अनेक समस्याही येऊ शकतात

तुळशीच्या आजूबाजूला केर, अस्वच्छ भांडी, पादत्राणे किंवा कचरा चुकूनही ठेवू नका. तसेच तुळशीच्या झाडावर घाण पाणी कधीही पडणार नाही, याचीही व्यवस्था करावी. अन्यथा तुम्हाला धनहानी सहन करावी लागू शकते. याशिवाय अनेक समस्याही येऊ शकतात, असे सांगितले जाते. तुळशीभोवती काटेरी झाडे लावू नका. अन्यथा घरात नकारात्मकता वाढू शकते. जेथे तुळशीचे रोप लावले असेल, त्या कुंडीत दुसरे कोणतेही रोप लावू नये. तसेच तुळशीचे रोप टेरेसवर ठेवू नका. ते घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत ठेवावे. दिवेलागणीला तुळशीला सांजवात केल्यानंतर विझलेला दिवा काढायला विसरू नका, असा सल्ला दिला जातो. सदर माहिती गृहीतके आणि सामान्य मान्यतांवर आधारित असून, तज्ज्ञांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकते, असे सांगितले जाते.  

टॅग्स :Astrologyफलज्योतिषVastu shastraवास्तुशास्त्र