शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

Chaturmas 2025: फक्त २ मिनिटात म्हणून होणारे 'हे' स्तोत्र चातुर्मासात देईल बक्कळ लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 12:33 IST

Chaturmas 2025 Stotra Benefits: चातुर्मासात विष्णुसहस्त्रनाम म्हटल्याने अनेक लाभ होतात, पण ज्यांच्याकडे अर्धा-पाऊण तासाचा वेळ नाही, त्यांनी रोज हे स्तोत्र म्हणण्याचा संकल्प कराच!

६ जुलै रोजी आषाढी एकादशी पासून चातुर्मासाची(Chaturmas 2025) सुरुवात झाली ती आता कार्तिकी एकादशीला(Kartiki Ekadashi 2025) म्हणजेच २ नोव्हेंबर रोजी समाप्त होईल. चातुर्मासात काही ना काही संकल्प करण्याचा प्रघात आहे. कारण संकल्पपूर्तीसाठी थोडा थोडका नाही तर चार महिन्यांचा कालावधी मिळतो. यात पुण्यसंचय व्हावा या हेतूने दान, धर्म, उपासना केली जाते.

हे ही वाचा : चातुर्मासात मिळवा 'या' स्तोत्राचे फायदे!

चातुर्मासात विष्णुसहस्त्रनाम रोज म्हटल्याने वा ऐकल्याने पुष्कळ लाभ होतो हा भाविकांचा आजवरचा अनुभव आहे. परंतु अनेकांना तेवढा वेळ काढणे शक्य होत नाही. कारण विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र म्हणायला पाऊण तास आणि ऐकायला अर्धा तास तरी लागतोच. अशा वेळी इच्छा असूनही उपासना करता येत नाही. त्यावर सुंदर पर्याय म्हणजे विष्णू षोडश नाम स्तोत्र! या स्तोत्राचा भावार्थ एकदा वाचलात तरी स्तोत्र महात्म्य लक्षात येईल! विष्णूसहस्त्र नामावलीत विष्णूंची १००० नावे आहेत, ती घेता आली नाहीत तर निदान पुढील स्तोत्रात दिलेली सोळा नावं आवर्जून रोज म्हणावीत! कारण, विष्णू षोडशनाम स्तोत्र विष्णू सहस्त्र नामाइतकेच प्रभावी आहे आणि संकटमुक्त करून सर्व सुखाची प्राप्ती करून देणारे आहे; सविस्तर वाचा!

औषधे चिंतये विष्णुम भोजने च जनार्धनम,शयने पद्मनाभं च विवाहे च प्रजापतिम,युद्धे चक्रधरम देवं प्रवासे च त्रिविक्रमं,नारायणं तनु त्यागे श्रीधरं प्रिय संगमे,दुःस्वप्ने स्मर गोविन्दम संकटे मधुसूधनम,कानने नारासिम्हम च पावके जलाशयिनाम,जलमध्ये वराहम च पर्वते रघु नन्दनं,गमने वामनं चैव सर्व कार्येशु माधवं।षोडशैतानी नमानी प्रातरुत्थाय यह पठेत,सर्वपापा विर्निमुक्तो विष्णुलोके महीयते।

अर्थ : शरीर आजारी असताना, औषध घेताना भगवान विष्णूचे ध्यान करावे, अन्न खाताना त्यांच्या जनार्दन रूपाचे ध्यान करावे, झोपताना त्यांच्या पद्मनाभ रूपाचे ध्यान करावे, विवाहाच्या वेळी त्यांच्या प्रजापती रूपाचे ध्यान करावे, युद्धाला जाताना, त्याच्या चक्रधारी स्वरूपाचे ध्यान करावे, प्रवास करताना त्यांच्या त्रिविक्रम स्वरूपाचे ध्यान करावे. मृत्यूसमयी त्यांच्या नारायण रूपाचे ध्यान करावे, संसारसुखाच्या वेळी त्यांच्या श्रीधर रूपाचे ध्यान करावे, दुःस्वप्नांच्या वेळी त्यांच्या गोविंद  रूपाचे ध्यान करावे आणि संकटसमयी त्यांच्या मधुसूदन रूपाचे ध्यान करावे. वादळाच्या वेळी त्याच्या नरसिंह रूपाचे ध्यान करावे, आगीच्या वेळी समुद्रात त्याच्या निद्रिस्त रूपाचे ध्यान करावे, पाण्यात अडकल्यावर त्याच्या वराह स्वरूपाचे ध्यान करावे, पर्वत आणि जंगलात, भटकताना त्याच्या रघुनंदन रूपाचे ध्यान करावे. जर तुम्ही त्यांच्या वामन स्वरूपाचे ध्यान केले तर सर्व कार्य करताना त्यांच्या माधव स्वरूपाचे ध्यान करावे.

जे भक्त या सोळा नामांचा उच्चार करतात, त्यांना सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि विष्णूच्या जगात स्थान मिळते. असा या स्तोत्र पठणाचा महिमा आहे. 

त्यामुळे यंदा चातुर्मासात दर दिवशी न चुकता हे छोटंसं स्तोत्र म्हणा आणि सर्वांगीण लाभ मिळवा. 

टॅग्स :chaturmasचातुर्मासPuja Vidhiपूजा विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणekadashiएकादशीAdhyatmikआध्यात्मिक