शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

Chanakyaniti: अपयशावर यशाने मात करण्यासाठी जाणून घ्या चाणक्यनीतीचे महत्त्वाचे नियम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 07:00 IST

Chanakyaniti: यश-अपयशाचा पाठशिवणीचा खेळ आयुष्यभर सुरूच राहतो, अशावेळी तटस्थपणे परिस्थिति कशी हाताळायला हवी ते जाणून घ्या.

आचार्य चाणक्य हे भारतातील सर्वोत्तम विद्वानांपैकी एक होते. चाणक्य यांनी लिहिलेली चाणक्य नीति ही सर्वात लोकप्रिय धोरणांपैकी एक मानली जाते. मनुष्यासाठी आदर्श जीवनाचा वस्तुपाठ आचार्यांनी घालून दिला आहे. छोट्यात छोट्या गोष्टींवर विचार करून नीतिमत्तेच्या गोष्टी सांगितल्या आहेत. यशापयशाचा विचार करता आचार्यांनी त्यावरही तोडगे दिले आहेत. अशा परिस्थितीत आपण चाणक्य नीतीच्या अशा काही उपयुक्त गोष्टी वाचूया ज्याद्वारे व्यक्ती जीवनात प्रगती करू शकते.

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यांचा अवलंब करून कोणतीही व्यक्ती आपल्या जीवनात यश मिळवू शकते. त्यातील काही निवडक विषय पाहता अशा परिस्थितीत चाणक्यजींनी सांगितलेल्या काही गोष्टी जीवनात अवलंबून तुम्ही तुमच्या अपयशाचे यशात रूपांतर करू शकता.

आचार्य चाणक्य म्हणतात की यशस्वी होण्याचे पहिले सूत्र कठोर परिश्रम आहे. जर एखादी व्यक्ती आपल्या कामाप्रती प्रामाणिक असेल आणि कठोर परिश्रम करत असेल तर त्याच्यावर देवी लक्ष्मी आणि धनाची देवता भगवान कुबेर यांची कृपा राहते. त्यामुळे आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण मेहनतीने पार पाडणे गरजेचे आहे आणि प्रयत्नांना उपासनेचे पाठबळ देणे आवश्यक आहे. 

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, कोणत्याही व्यक्तीची कृती त्याच्या चांगल्या किंवा वाईट काळाचे कारण बनते. म्हणून माणसाने नेहमी सत्कर्म करत राहावे. तसेच, एखाद्या व्यक्तीने त्याच्या पदाचा आणि पैशाचा कधीही गर्व करू नये.

आचार्य चाणक्य यांनी आपल्या निती शास्त्रामध्ये सांगितले आहे की ज्या लोकांचे वागणे आणि बोलणे चांगले असते त्यांना जीवनात नक्कीच यश मिळते. या दोन्ही गोष्टी माणसाच्या यशाच्या मार्गात मोठी भूमिका बजावू शकतात. माणसाने आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे, तरच तो जीवनात यश मिळवू शकतो.

एखाद्या व्यक्तीला सुरुवातीच्या काळात यश मिळते हे फारच कमी आहे. ध्येय मोठे असताना सुरुवातीला अनेक अपयशांना सामोरे जावे लागते. या विषयाबाबत चाणक्य म्हणतात की, अपयशाची भीती ही आपल्या कल्पनेपेक्षा अधिक नसते. जर तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करायचे असेल तर तुम्ही कठोर पावले उचलण्यास घाबरू नका.