शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

ChanakyaNiti: 'या' तीन प्रकारच्या लोकांकडून मदत घ्याल तर आयुष्यभर कर्जबाजारी राहाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 11:18 IST

ChanakyaNiti: संकट काही काळापुरते असते मात्र उपकार आयुष्यभराचे असतात, म्हणून मदत घेताना दूरदृष्टी ठेवा आणि पुढील तीन प्रकारच्या लोकांपासून सावध राहा!

आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये मनुष्याला आयुष्याची जडण घडण होण्यास पूरक ठरतील असे आदर्शवादी आणि वास्तविक विचार मांडले आहेत. त्यांचे विचार आपल्याला विचार करायला लावून त्यानुसार कृती करायला भाग पाडतात. या लेखातही त्यांनी महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकला आहे.

'सुख के सब साथी, दुख मे न कोई' हे एक वाक्य आयुष्याचं मर्म सांगणारे आहे. आपल्या सुखाच्या अर्थात उत्कर्षाच्या काळात लोकांना बोलवावे लागत नाही तर ते आपणहून येतात. याउलट दुःखाच्या, संकटाच्या वेळी लोकांकडे मदत मागायला जाल, तर ते पाठ फिरवून घेतात. यासाठीच आपली ज्येष्ठ मंडळी आपल्याला नेहमी सांगत असत की मदत विचारपूर्वक मागायला हवी.

संकटकाळी जो आपल्या मदतीला येतो तो खरा मित्र, अशी मैत्रीची व्याख्या केली जाते. परंतु काही जण आपल्या परिस्थितीचा फायदा घेऊन आवळा देऊन कोहळा काढतात. अर्थात मदत थोडीशी करतात पण त्याचा चौपट मोबदला या ना त्या स्वरूपात वसूल करतात. यासाठी आचार्य चाणक्य तीन प्रकारच्या लोकांकडून प्रकर्षाने मदत टाळा असा सल्ला देतात.

स्वार्थी लोक:चाणक्य नीती सांगते स्वार्थी लोकांनी फुकट मदत केली तरी घेऊ नका. ते तुमचे भले कधीच करणार नाहीत. उलट तुम्ही जास्तीत जास्त संकटात कसे अडकाल यासाठी ते प्रयत्न करतील. अशा लोकांनी मदत करण्याचा आव आणला तरी त्याला भुलू नका. त्यांचा स्वार्थी स्वभाव ओळखून सावध पवित्रा घ्या आणि त्यांच्याकडून मदत स्वीकारू नका.

मत्सर करणारे लोक :जे लोक तुमच्या प्रगतीवर जळतात. तुमचा मत्सर करतात. तुम्हाला कमी लेखतात, अशा लोकांनी केलेल्या खोट्या स्तुतीला भुलू नका. तुमच्या दुःखाचे त्यांच्यासमोर प्रदर्शन करू नका. कारण असे लोक तुम्हाला बाहेरून सहानुभूती दाखवतील, पण तुमच्या दुःखाने त्यांनाच जास्त आनंद होईल हे लक्षात ठेवा. म्हणून आपले दुःख, आपल्या समस्या लोकांना सांगत फिरू नका!

तापट व्यक्ती :ज्या व्यक्तीचे स्वतःच्या रागावर नियंत्रण राहत नाही अशा व्यक्तीकडून कधीही मदत मागू नका. कारण अशी व्यक्ती आनंदाच्या भरात मदत करत असली तरी कधी तिचा मूड बदलेल आणि कधी ती रागाच्या भरात तुमच्याकडून केलेल्या उपकाराची वसुली करेल याचा नेम नाही. अशा व्यक्तींशी फार सलगी नको आणि दुष्मनीपण नको. त्यांचे उपकार तर नकोच नको!