शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

सर्वसामान्यांचा कैवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 23:28 IST

- स्नेहलता देशमुख पांडुरंगशास्त्री आठवले म्हणजे भगवद्गीतेतील विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणारे तसेच स्वाध्याय परिवारात दादाजी म्हणून ओळखले जाणारे व्यक्तिमत्त्व. अध्यात्म ...

- स्नेहलता देशमुख

पांडुरंगशास्त्री आठवले म्हणजे भगवद्गीतेतील विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणारे तसेच स्वाध्याय परिवारात दादाजी म्हणून ओळखले जाणारे व्यक्तिमत्त्व. अध्यात्म प्रत्येक क्षणाला जगणारे पांडुरंगशास्त्री म्हणजे विधायक कामांची पर्वणीच, असे त्यांचे कुसुमाग्रजांनी केलेले वर्णन सार्थ आहे. त्यांनी तत्त्वज्ञानाविषयी तोंडपाटीलकी न करता वृत्तीतून दाखवून दिले. मच्छिमारांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडविले.

अनेक गावे व्यसनमुक्त करण्यात ते यशस्वी झाले. त्यांची प्रेरणाच अशी की, कितीतरी गावांचं रूपांतर स्वाध्याय परिवारात झालं. एवढंच नव्हे तर भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञान यांचा विशेष अभ्यास करण्यासाठी त्यांनी तत्त्वज्ञान विद्यापीठाची स्थापना केली. भक्ती व संस्कृती यांचा मिलाफ घडवला आणि शेतीशाळा स्थापन केल्या. त्यात तंत्रज्ञानाचाही वापर केला. या शाळेत प्रवेशास अट होती, मालकीची थोडीफार जमीन हवी. भगवद्गीतेतील विचार सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दादांनी परिश्रमाची पराकाष्ठा केली. त्यांनी संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवले; शिवाय संपूर्ण शेक्सपिअरही वाचला.

विविध परिषदांमध्ये आपले विचार प्रभावीपणे ते मांडत. या असामान्य बुद्धिमत्ता लाभलेल्या दादांना अमेरिकेतून बोलावण्यात आले. वर्षाला एक लाख रुपये शिवाय सर्व सुखसोयी देऊ केल्या; पण दादांनी त्यांना कळविले की, मला माझ्या दु:खी, पीडित लोकांबरोबरच काम करायचे आहे. म्हणून आपला प्रस्ताव स्वीकारू शकत नाही. तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांनी त्यांची समजूत घालण्याची जबाबदारी घेतली. परंतु, दादांचे मन तत्त्वज्ञान विद्यापीठात गुंतले होते.

दादांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या हस्ते विद्यापीठाचे उद्घाटन केले आणि ते डॉ. राधाकृष्णन यांना म्हणाले, कुणापुढेही पैशाची याचना न करता मी हे कार्य चालू ठेवणार आहे. कारण मी समाजाला साधन मानतो मी परमेश्वराला सर्वस्व मानतो. माझे कार्य निष्ठेने होणार असेल तर मला यश नक्कीच मिळेल. केवढा आत्मविश्वास होता कारण त्यांची प्रभूवर निष्ठा होती.