शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

सर्वसामान्यांचा कैवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 23:28 IST

- स्नेहलता देशमुख पांडुरंगशास्त्री आठवले म्हणजे भगवद्गीतेतील विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणारे तसेच स्वाध्याय परिवारात दादाजी म्हणून ओळखले जाणारे व्यक्तिमत्त्व. अध्यात्म ...

- स्नेहलता देशमुख

पांडुरंगशास्त्री आठवले म्हणजे भगवद्गीतेतील विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणारे तसेच स्वाध्याय परिवारात दादाजी म्हणून ओळखले जाणारे व्यक्तिमत्त्व. अध्यात्म प्रत्येक क्षणाला जगणारे पांडुरंगशास्त्री म्हणजे विधायक कामांची पर्वणीच, असे त्यांचे कुसुमाग्रजांनी केलेले वर्णन सार्थ आहे. त्यांनी तत्त्वज्ञानाविषयी तोंडपाटीलकी न करता वृत्तीतून दाखवून दिले. मच्छिमारांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडविले.

अनेक गावे व्यसनमुक्त करण्यात ते यशस्वी झाले. त्यांची प्रेरणाच अशी की, कितीतरी गावांचं रूपांतर स्वाध्याय परिवारात झालं. एवढंच नव्हे तर भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञान यांचा विशेष अभ्यास करण्यासाठी त्यांनी तत्त्वज्ञान विद्यापीठाची स्थापना केली. भक्ती व संस्कृती यांचा मिलाफ घडवला आणि शेतीशाळा स्थापन केल्या. त्यात तंत्रज्ञानाचाही वापर केला. या शाळेत प्रवेशास अट होती, मालकीची थोडीफार जमीन हवी. भगवद्गीतेतील विचार सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दादांनी परिश्रमाची पराकाष्ठा केली. त्यांनी संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवले; शिवाय संपूर्ण शेक्सपिअरही वाचला.

विविध परिषदांमध्ये आपले विचार प्रभावीपणे ते मांडत. या असामान्य बुद्धिमत्ता लाभलेल्या दादांना अमेरिकेतून बोलावण्यात आले. वर्षाला एक लाख रुपये शिवाय सर्व सुखसोयी देऊ केल्या; पण दादांनी त्यांना कळविले की, मला माझ्या दु:खी, पीडित लोकांबरोबरच काम करायचे आहे. म्हणून आपला प्रस्ताव स्वीकारू शकत नाही. तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांनी त्यांची समजूत घालण्याची जबाबदारी घेतली. परंतु, दादांचे मन तत्त्वज्ञान विद्यापीठात गुंतले होते.

दादांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या हस्ते विद्यापीठाचे उद्घाटन केले आणि ते डॉ. राधाकृष्णन यांना म्हणाले, कुणापुढेही पैशाची याचना न करता मी हे कार्य चालू ठेवणार आहे. कारण मी समाजाला साधन मानतो मी परमेश्वराला सर्वस्व मानतो. माझे कार्य निष्ठेने होणार असेल तर मला यश नक्कीच मिळेल. केवढा आत्मविश्वास होता कारण त्यांची प्रभूवर निष्ठा होती.