शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

Ayodhya Ram Mandir: रामलला प्रतिष्ठापनेच्या मुहुर्तात 'हे' चार सेकंद असतील सर्वाधिक महत्त्वाचे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 15:55 IST

Ayodhya Ram Mandir: २२ जानेवारीला अयोध्येत रामललाची प्रतिष्ठापना होणार आहे, त्यात कालावधीतले चार सेकंद कोणत्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ते जाणून घेऊ. 

गेली शेकडो वर्षे ज्या क्षणाची वाट संपूर्ण देश पाहत होता, तो क्षण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम जलदगतीने सुरू आहे. राम मंदिर परिसरात पंचायन देवतांची मंदिरेही असणार आहेत. राम मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांच्या सोयी, सुविधेसाठी अनेक गोष्टी केल्या जात आहेत. संपूर्ण देश राम मंदिर लोकार्पणाची वाट पाहत आहे. तारीख ठरली, वार ठरला, मुहूर्तही ठरला, अशातच या मुहुर्तातही भाग्यकारक मुहूर्त ४ सेकंदांमध्ये सामावलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊ. 

श्रीरामलल्लाची प्राणप्रतिष्ठा नवीन राम मंदिरात केली जाणार आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२ वाजून ३० मिनिटे या मुहुर्तावर रामलल्ला विराजमान होणार आहे. राम दर्शनाची भाविकांना आस लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह हजारो मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा होणार आहे. या सोहळ्याचा मुहूर्त खास असल्याचे सांगितले जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे काही अद्भूत शुभ संयोग जुळून येत आहेत.

प्राणप्रतिष्ठा कशासाठी?

देवांची मूर्ती विविध प्रकारचे धातू, माती इ. माध्यमांचा वापर करून बनवली जाते. मूर्तिकार जीव ओतून मूर्ती घडवतो आणि ती जिवंत वाटते. पुरोहित आपल्या मंत्रसामर्थ्याने जिवंत वाटणाऱ्या मूर्तीत प्राण प्रतिष्ठा करतात आणि ती जिवंत देवता बनवतात. त्यानंतर त्या मूर्तीला देवत्त्व येते आणि तो केवळ धातू न राहता शक्तीपीठ बनते. रामललाच्या मूर्तीबद्दलही तेच होणार आहे. वर्षानुवर्षे या क्षणाची सगळेच वाट पाहत होते, असे कार्य सिद्धीस जावे म्हणून ते सुमुहूर्तावर केले जाते. २२ जानेवारी हा देखील असाच शुभमुहूर्त आहे. 

शुभ मुहूर्त : 

पौष मास लग्न, मुंज कार्यासाठी शुभ काळ मानला जात नसला तरी देवकार्यासाठी तो अत्यंत शुभ मानला जातो. १२ जानेवारी रोजी पौष मास सुरू होत आहे आणि प्राणप्रतिष्ठा विधीसाठी २२ तारीख नियोजित करण्यात आली आहे. हाती घेतलेले कार्य योग्य रीतीने कार्य पार पडावे यासाठी ग्रहांचे पाठबळ देखील बघावे लागते. ते सर्व पाहूनच ज्योतिष तज्ज्ञांनी २२ जानेवारी २०२४ ही तारीख आणि दुपारी १२. ३० चा मुहूर्त सुनिश्चित केला आहे. या दिवशी शुभ मानले गेलेले मृगशीर्ष नक्षत्र आहे. सोमवार शुभ आहे. सोमवारी मृगशीर्ष नक्षत्राचा संयोग शुभ मानला गेला आहे. कोणत्याही शुभ कार्यासाठी लग्न स्थानाला सर्वाधिक महत्त्व असते. रामलल्ला जेव्हा विराजमान होतील, तेव्हा पूर्व क्षितिजावर मेष राशीचा उदय होईल. कोणतेही काम जे दीर्घकाळ सुरळीतपणे चालू राहणे अपेक्षित आहे, त्यासाठी स्थिर राशीचे लग्न सर्वोत्तम मानले जाते. मात्र, मेष लग्न हे चर आहे.

'हे' चार सेंकंद महत्त्वाचे :

जेव्हा कुंडलीमध्ये अत्यंत सूक्ष्म गणिते करावी लागतात, तेव्हा ज्योतिषशास्त्र आपल्याला वर्ग कुंडलीतील षष्ठांश कुंडली पाहण्याचा सल्ला देते. वर नमूद केलेल्या प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तानुसार षष्ठियांश कुंडली पाहिल्यास १२:२९ मिनिटे ०८ सेकंद ते १२:३० मिनिटे २० सेकंदापर्यंत षष्ठांश राशी कर्क असेल, जो परिवर्तनशील असेल, जो स्थिरतेसाठी योग्य मानले जाते.

१२. ३० मिनिटे २१ सेकंदात षष्ठांश सिंह राशि होईल. कुंडलीचे पाचवे घर या कुंडलीचा आरोही बनेल, नवव्या घरात उच्चस्थानी राशीची उपस्थिती बृहस्पति सोबत असेल आणि सर्व धर्म त्रिकोण बृहस्पति ग्रहाने पाहतील. याचा अर्थ १२.३०.२१ ते १२.३०.२५ यातील २१ ते २५ ही चार सेकंद रामललाची दिगंत कीर्ती वाढवणारी ठरतील, त्यादृष्टीने या सेकंदाचे महत्त्व सर्वाधिक आहे. 

सदर मान्यता आणि ज्योतिषीय दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३