शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

Ayodhya Priest Satyendra Das : फक्त संतांनाच दिली जाते जलसमाधी; पण का? जाणून घ्या धर्मशास्त्राचा निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 12:33 IST

Ayodhya Priest Satyendra Das : आचार्य सत्येंद्र दास यांना जलसमाधी  दिल्याने अनेकांना प्रश्न पडला आहे की त्यांचा दहन विधी का केला नाही? वाचा सविस्तर माहिती!

श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांचे बुधवारी वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले आणि त्यांना प्रथेप्रमाणे १३ फेब्रुवारी रोजी गुरुवारी सायंकाळी शरयू नदीच्या तुळशीदास घाटावर जलसमाधी देण्यात आली. यापूर्वी त्यांचे पार्थिव रथावर बसवून शहरभर फिरवण्यात आले. या विधींचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने लोकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. जलसमाधी म्हणजे काय? ती कोणाला दिली जाते? का आणि कुठे दिली जाते यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊया आणि मनातील शंका दूर करूया. 

संतांना जलसमाधी देण्याची परंपरा भारतीय संस्कृती आणि सनातन धर्मात प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. ही एक विशेष प्रकारची समाधी आहे, ज्यामध्ये संतांचा मृत देह पाण्यात विसर्जित केले जातो. मात्र हिंदू धर्मात दहन विधीला मान्यता असूनही संतांसाठी हा वेगळा नियम का? तर यामागे आहेत धार्मिक, आध्यात्मिक आणि शास्त्रीय कारणे!

मोक्षप्राप्ती : संतमंडळी आपल्याप्रमाणे संसारात, भौतिक सुखात रमणारी नसतात. ते करत असलेली उपासना, तपश्चर्या आणि व्रत ईश्वरप्राप्तीसाठी व मोक्षप्राप्तीसाठी करतात. वासना निर्माण न झाल्याने त्यांच्या देहाला विकार आणि विषय चिकटत नाहीत. त्यामुळे त्यांच्या देहाला दहन करण्याची आवश्यकता उरत नाही तर जलसमाधी देऊन आपले निर्जीव शरीर मृत्युपश्चातही इतर जीवांच्या उदर निर्वाहासाठी कामी यावा, या भावनेने त्यांना जलसमाधी दिली जाते, जेणेकरून त्यांना मोक्षप्राप्ती होते. 

पंच तत्त्वात विलीन होणे : धार्मिक श्रद्धेनुसार मानवी शरीर पृथ्वी, जल, अग्नि, वायू आणि आकाश या पाच घटकांनी बनलेले आहे. म्हणून हिंदू धर्मातील अंत्य विधी झाल्यानंतर ती व्यक्ती पंचतत्त्वात विलीन झाली असे म्हणतात. संत हे सांसारिक सुखापलीकडे असतात म्हणून जलसमाधी देऊन त्यांनी आपले अवतार कार्य संपवले असे म्हणतात. 

संतांचे तपस्वी जीवन : संतमंडळी सांसारिक आसक्तीपासून दूर राहतात. ते कधी कुणाच्या निदर्शनासही येत नाही. विशेषतः कुंभमेळ्यात त्यांचे दर्शन होते. एवढेच नाही तर पहिल्या शाही स्नानाचा मान त्यांना दिला जातो आणि त्यांच्या स्पर्शाने पवित्र झालेले पाणी स्नानासाठी योग्य मानले जाते. 

संतांचा देह जणू पूजनीय मूर्ती : संतांचे शरीर तपश्चर्या, ध्यान आणि दैवी शक्तीने परिपूर्ण असते, ते तेजाने तळपत असते. त्यामुळे त्याच्या पार्थिवावर अग्नीने अंत्यसंस्कार करण्याऐवजी त्यांच्या देहाला पाण्यात विसर्जित करून आत्म्याला शांतता मिळावी अशी प्रार्थना केली जाते. 

जलसमाधीची ठिकाणे : धार्मिक मान्यतेनुसार, गंगा, नर्मदा, सरस्वती, गोदावरी या पवित्र नद्यांमध्ये जलसमाधी केली जाते, जेणेकरून संतांची दैवी ऊर्जा संपूर्ण विश्वात पसरू शकेल. कोणत्याही स्थानिक नद्यांवर हा विधी केला जाऊ शकत नाही. वरील नद्यांचे विस्तृत पात्र त्यासाठी योग्य मानले जाते. 

जलसमाधी देण्यामागे भौगोलिक कारण : पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून संतांचे अंतिम संस्कार अग्नीऐवजी पाण्यातच केले जातात, अशी अनेक मठ आणि आखाड्यांची परंपरा आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी संतांना समाधी देण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही  त्यामुळेही जलसमाधी दिली जाते.

जलसमाधीचा अधिकार कोणाला? : साधारणपणे, संन्यास घेतलेले साधू, नागा साधू, आखाड्यातील प्रमुख संत किंवा आयुष्यभर तपश्चर्या केलेल्या संन्याशांना जलसमाधी दिली जाते.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरDeathमृत्यूPuja Vidhiपूजा विधी