शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Ayodhya Priest Satyendra Das : फक्त संतांनाच दिली जाते जलसमाधी; पण का? जाणून घ्या धर्मशास्त्राचा निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 12:33 IST

Ayodhya Priest Satyendra Das : आचार्य सत्येंद्र दास यांना जलसमाधी  दिल्याने अनेकांना प्रश्न पडला आहे की त्यांचा दहन विधी का केला नाही? वाचा सविस्तर माहिती!

श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांचे बुधवारी वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले आणि त्यांना प्रथेप्रमाणे १३ फेब्रुवारी रोजी गुरुवारी सायंकाळी शरयू नदीच्या तुळशीदास घाटावर जलसमाधी देण्यात आली. यापूर्वी त्यांचे पार्थिव रथावर बसवून शहरभर फिरवण्यात आले. या विधींचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने लोकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. जलसमाधी म्हणजे काय? ती कोणाला दिली जाते? का आणि कुठे दिली जाते यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊया आणि मनातील शंका दूर करूया. 

संतांना जलसमाधी देण्याची परंपरा भारतीय संस्कृती आणि सनातन धर्मात प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. ही एक विशेष प्रकारची समाधी आहे, ज्यामध्ये संतांचा मृत देह पाण्यात विसर्जित केले जातो. मात्र हिंदू धर्मात दहन विधीला मान्यता असूनही संतांसाठी हा वेगळा नियम का? तर यामागे आहेत धार्मिक, आध्यात्मिक आणि शास्त्रीय कारणे!

मोक्षप्राप्ती : संतमंडळी आपल्याप्रमाणे संसारात, भौतिक सुखात रमणारी नसतात. ते करत असलेली उपासना, तपश्चर्या आणि व्रत ईश्वरप्राप्तीसाठी व मोक्षप्राप्तीसाठी करतात. वासना निर्माण न झाल्याने त्यांच्या देहाला विकार आणि विषय चिकटत नाहीत. त्यामुळे त्यांच्या देहाला दहन करण्याची आवश्यकता उरत नाही तर जलसमाधी देऊन आपले निर्जीव शरीर मृत्युपश्चातही इतर जीवांच्या उदर निर्वाहासाठी कामी यावा, या भावनेने त्यांना जलसमाधी दिली जाते, जेणेकरून त्यांना मोक्षप्राप्ती होते. 

पंच तत्त्वात विलीन होणे : धार्मिक श्रद्धेनुसार मानवी शरीर पृथ्वी, जल, अग्नि, वायू आणि आकाश या पाच घटकांनी बनलेले आहे. म्हणून हिंदू धर्मातील अंत्य विधी झाल्यानंतर ती व्यक्ती पंचतत्त्वात विलीन झाली असे म्हणतात. संत हे सांसारिक सुखापलीकडे असतात म्हणून जलसमाधी देऊन त्यांनी आपले अवतार कार्य संपवले असे म्हणतात. 

संतांचे तपस्वी जीवन : संतमंडळी सांसारिक आसक्तीपासून दूर राहतात. ते कधी कुणाच्या निदर्शनासही येत नाही. विशेषतः कुंभमेळ्यात त्यांचे दर्शन होते. एवढेच नाही तर पहिल्या शाही स्नानाचा मान त्यांना दिला जातो आणि त्यांच्या स्पर्शाने पवित्र झालेले पाणी स्नानासाठी योग्य मानले जाते. 

संतांचा देह जणू पूजनीय मूर्ती : संतांचे शरीर तपश्चर्या, ध्यान आणि दैवी शक्तीने परिपूर्ण असते, ते तेजाने तळपत असते. त्यामुळे त्याच्या पार्थिवावर अग्नीने अंत्यसंस्कार करण्याऐवजी त्यांच्या देहाला पाण्यात विसर्जित करून आत्म्याला शांतता मिळावी अशी प्रार्थना केली जाते. 

जलसमाधीची ठिकाणे : धार्मिक मान्यतेनुसार, गंगा, नर्मदा, सरस्वती, गोदावरी या पवित्र नद्यांमध्ये जलसमाधी केली जाते, जेणेकरून संतांची दैवी ऊर्जा संपूर्ण विश्वात पसरू शकेल. कोणत्याही स्थानिक नद्यांवर हा विधी केला जाऊ शकत नाही. वरील नद्यांचे विस्तृत पात्र त्यासाठी योग्य मानले जाते. 

जलसमाधी देण्यामागे भौगोलिक कारण : पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून संतांचे अंतिम संस्कार अग्नीऐवजी पाण्यातच केले जातात, अशी अनेक मठ आणि आखाड्यांची परंपरा आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी संतांना समाधी देण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही  त्यामुळेही जलसमाधी दिली जाते.

जलसमाधीचा अधिकार कोणाला? : साधारणपणे, संन्यास घेतलेले साधू, नागा साधू, आखाड्यातील प्रमुख संत किंवा आयुष्यभर तपश्चर्या केलेल्या संन्याशांना जलसमाधी दिली जाते.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरDeathमृत्यूPuja Vidhiपूजा विधी