शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Astrology: रामललाच्या वाट्याला का आले एवढे भोग? जन्मकुंडलीचा दोष की आणखी काही? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 17:14 IST

Astrology Tips: सातवा विष्णू अवतार असूनही रामललाला मनुष्य अवतारात अनेक भोग भोगावे लागले, त्यांची पत्रिका मंगळाची होती म्हणून की आणि काही ते जाणून घ्या. 

अयोध्याराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सगळेच उत्सुक आहेत, रामाचा जयजयकार करत आहेत, त्याच्या येण्याने दिवाळी साजरी करत आहेत. पण याच रामाला त्याच्या हयातीत जे भोग भोगावे लागले ते सामान्य माणसाच्या आयुष्यापेक्षा कमी नव्हते. त्यामागील ज्योतिष शास्त्रीय विचार जाणून घेऊया. 

प्रारब्ध कुणालाही चुकले नाहीत. अगदी श्रीराम आणि श्रीकृष्णालाही! मनुष्य देहात जन्म घेतला की जशा वासना, विकार जडतात तसे प्रारब्धही जडतात. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या बाबतीत म्हटले तर त्यांनी अवतार घेतला, मग त्यांना प्रारब्ध चिकटले कसे? तर त्यांनी ज्या घराण्यात जन्म घेतला त्यावरून तसेच त्यांच्या जन्मस्थितीच्या वेळी असलेल्या ग्रहदशेवरून! हे दोघेही जण सर्वांना रमवूनही आपण अलिप्त राहिले. त्यामुळेच की काय त्यांनी वेळेत आशा आकांक्षा मागे न ठेवता आपले अवतार कार्य संपवले. श्रीरामांनी तर त्यांच्या हयातीत वनवास भोगला आणि तो कमी म्हणून की काय, आजही त्यांच्या स्वच्छ चारित्र्यावर संशयाचे शिंतोडे उडवून लोक त्यांना वनवासच भोगायला लावत आहेत. अयोध्येतील राम मंदिर साकार व्हायलाही ५०० वर्षांचा काळ जावा लागला, म्हणजे त्यांच्या वाट्यालाही सुख हुलकावणी देत होते असे म्हणता येईल. याला कारणीभूत त्यांची जन्म कुंडलीही असू शकते असे भाकीत ज्योतिषी वर्तवतात. काय आहे त्यांच्या कुंडलीचे वैशिष्ट्य? चला जाणून घेऊया. 

श्रीरामाची जन्म कुंडली :

गोस्वामी तुलसीदासांच्या रामचरितमानसानुसार, भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र शुक्ल नवव्या तिथीला आणि पुनर्वसु नक्षत्र आणि कर्क राशीच्या चौथ्या चरणात झाला. गुरू आणि चंद्र लग्न स्थानी आहे. पाच ग्रह - शनि, मंगळ, गुरु, शुक्र आणि सूर्य हे आपापल्या उच्च राशींमध्ये स्थित आहेत. कर्क राशीत बृहस्पति श्रेष्ठ आहे. बृहस्पति चंद्रासोबत चढत्या स्थानावर स्थित आहे ज्यामुळे गजकेसरी योग तयार होतो जो भरपूर कीर्ती देतो. पण शनि चतुर्थ भावात तूळ राशीमध्ये स्थित असल्याने प्रगती होते पण अतिशय हळू, हे श्रीरामांनीही अनुभवले!

मंगळ सातव्या भावात मकर राशीमध्ये स्थित आहे. या कुंडलीत दोन सौम्य ग्रह - गुरु आणि चंद्र हे दोन अशुभ ग्रह - शनि आणि मंगळ त्यांच्या संबंधित उच्च राशींमध्ये स्थित आहेत. अशा स्थितीत  राजभंग योग तयार होतो. त्यामुळे श्रीरामांच्या राज्याभिषेकापासून ते हयातापर्यंतच्या सर्व कार्यात अडथळे येत राहिले. ज्या वेळी श्रीरामाचा राज्याभिषेक होणार होता, त्या वेळी मंगळ शनि महादशेतून जात होता.

श्रीरामांनाही मंगळ होता :

मंगळ सप्तम घरात आहे. राहु तिसऱ्या, सहाव्या किंवा अकराव्या भावात असेल तर त्याचे दुष्परिणाम कमी होतात. मात्र या ग्रहस्थितींच्या प्रभावामुळे श्रीरामांना वैवाहिक, मातृ, पितृ आणि भौतिक सुख मिळू शकले नाही. 

'या' ग्रह स्थितीमुळे श्रीरामांच्या वाट्यालाही आले भोग : 

शनि आणि मंगळ यांच्या स्थितीमुळे श्रीरामांना अनेक संघर्षांना तोंड द्यावे लागले. त्यांना मंगळ होता. मंगळ सप्तम (विवाह सौख्य) घरात आहे. राहु तिसऱ्या, सहाव्या किंवा अकराव्या भावात असेल तर त्याचे दुष्परिणाम होतात. या ग्रहस्थितींच्या प्रभावामुळे श्रीरामांना वैवाहिक, मातृ, पितृ आणि भौतिक सुख मिळू शकले नाही. तथापि, दहाव्या घरातील मेष राशीत असलेल्या सूर्याने श्रीरामाला इतके सक्षम शासक म्हणून प्रस्थापित केले की त्यांच्या चांगल्या राजवटीची रामराज्य आजही स्तुती केली जाते.

पौराणिक कथांनुसार रामराज्य अकरा हजार वर्षे टिकले. रामाचा जन्म अंदाजे १, २५, ५८,० ९८ वर्षांपूर्वी झाला. आधुनिक कालगणना पद्धतीनुसार श्रीरामाचा जन्म चैत्र नवमीला असतो. 

श्रीरामाच्या कुंडलीचे विश्लेषण केल्यावर हे स्पष्ट झाले की कोणत्या ग्रहांमुळे त्यांना भौतिक सुख प्राप्त झाले नाही. पण आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, त्याग आणि संघर्षाच्या वेदनादायक मार्गावर चालत श्रीरामांनी मर्यादा पुरुषोत्तमच्या रूपात स्वतःला सादर केले. सदैव सत्याच्या मार्गावर चालले, अनेक संकटे सोसली पण तरीही लोककल्याणाच्या ध्येयापासून डगमगले नाहीत किंवा देवाला तसेच दैवाला दोष देत थांबले नाहीत. याचे कारण गुरू आणि चंद्राचा संयोग आहे. ज्यामुळे ते सकारात्मकता घेऊन चालत राहिले. 

पाचव्या (ज्ञान) आणि नवव्या (भाग्य) घरांवर गुरूच्या दृष्टीचा प्रभाव असा होता की त्यांनी धर्माचे पालन करणे हे आपल्या जीवनाचे एकमेव ध्येय मानले. धर्माच्या मार्गापासून ते कधीच भरकटले नाहीत. म्हणूनच त्यांचे नाव इतक्या वर्षांनंतरही आदराने घेतले जात आहे आणि त्यांचा उत्सव साजरा केला जात आहे. 

म्हणून आपणही कुंडलीतील दोष न पाहता गुणांवर लक्ष द्यावे आणि स्वतःचे कर्तृत्त्व सिद्ध करावे, हेच रामकथेचे सार!

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याAstrologyफलज्योतिष