शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

Astrology: रामललाच्या वाट्याला का आले एवढे भोग? जन्मकुंडलीचा दोष की आणखी काही? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 17:14 IST

Astrology Tips: सातवा विष्णू अवतार असूनही रामललाला मनुष्य अवतारात अनेक भोग भोगावे लागले, त्यांची पत्रिका मंगळाची होती म्हणून की आणि काही ते जाणून घ्या. 

अयोध्याराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सगळेच उत्सुक आहेत, रामाचा जयजयकार करत आहेत, त्याच्या येण्याने दिवाळी साजरी करत आहेत. पण याच रामाला त्याच्या हयातीत जे भोग भोगावे लागले ते सामान्य माणसाच्या आयुष्यापेक्षा कमी नव्हते. त्यामागील ज्योतिष शास्त्रीय विचार जाणून घेऊया. 

प्रारब्ध कुणालाही चुकले नाहीत. अगदी श्रीराम आणि श्रीकृष्णालाही! मनुष्य देहात जन्म घेतला की जशा वासना, विकार जडतात तसे प्रारब्धही जडतात. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या बाबतीत म्हटले तर त्यांनी अवतार घेतला, मग त्यांना प्रारब्ध चिकटले कसे? तर त्यांनी ज्या घराण्यात जन्म घेतला त्यावरून तसेच त्यांच्या जन्मस्थितीच्या वेळी असलेल्या ग्रहदशेवरून! हे दोघेही जण सर्वांना रमवूनही आपण अलिप्त राहिले. त्यामुळेच की काय त्यांनी वेळेत आशा आकांक्षा मागे न ठेवता आपले अवतार कार्य संपवले. श्रीरामांनी तर त्यांच्या हयातीत वनवास भोगला आणि तो कमी म्हणून की काय, आजही त्यांच्या स्वच्छ चारित्र्यावर संशयाचे शिंतोडे उडवून लोक त्यांना वनवासच भोगायला लावत आहेत. अयोध्येतील राम मंदिर साकार व्हायलाही ५०० वर्षांचा काळ जावा लागला, म्हणजे त्यांच्या वाट्यालाही सुख हुलकावणी देत होते असे म्हणता येईल. याला कारणीभूत त्यांची जन्म कुंडलीही असू शकते असे भाकीत ज्योतिषी वर्तवतात. काय आहे त्यांच्या कुंडलीचे वैशिष्ट्य? चला जाणून घेऊया. 

श्रीरामाची जन्म कुंडली :

गोस्वामी तुलसीदासांच्या रामचरितमानसानुसार, भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र शुक्ल नवव्या तिथीला आणि पुनर्वसु नक्षत्र आणि कर्क राशीच्या चौथ्या चरणात झाला. गुरू आणि चंद्र लग्न स्थानी आहे. पाच ग्रह - शनि, मंगळ, गुरु, शुक्र आणि सूर्य हे आपापल्या उच्च राशींमध्ये स्थित आहेत. कर्क राशीत बृहस्पति श्रेष्ठ आहे. बृहस्पति चंद्रासोबत चढत्या स्थानावर स्थित आहे ज्यामुळे गजकेसरी योग तयार होतो जो भरपूर कीर्ती देतो. पण शनि चतुर्थ भावात तूळ राशीमध्ये स्थित असल्याने प्रगती होते पण अतिशय हळू, हे श्रीरामांनीही अनुभवले!

मंगळ सातव्या भावात मकर राशीमध्ये स्थित आहे. या कुंडलीत दोन सौम्य ग्रह - गुरु आणि चंद्र हे दोन अशुभ ग्रह - शनि आणि मंगळ त्यांच्या संबंधित उच्च राशींमध्ये स्थित आहेत. अशा स्थितीत  राजभंग योग तयार होतो. त्यामुळे श्रीरामांच्या राज्याभिषेकापासून ते हयातापर्यंतच्या सर्व कार्यात अडथळे येत राहिले. ज्या वेळी श्रीरामाचा राज्याभिषेक होणार होता, त्या वेळी मंगळ शनि महादशेतून जात होता.

श्रीरामांनाही मंगळ होता :

मंगळ सप्तम घरात आहे. राहु तिसऱ्या, सहाव्या किंवा अकराव्या भावात असेल तर त्याचे दुष्परिणाम कमी होतात. मात्र या ग्रहस्थितींच्या प्रभावामुळे श्रीरामांना वैवाहिक, मातृ, पितृ आणि भौतिक सुख मिळू शकले नाही. 

'या' ग्रह स्थितीमुळे श्रीरामांच्या वाट्यालाही आले भोग : 

शनि आणि मंगळ यांच्या स्थितीमुळे श्रीरामांना अनेक संघर्षांना तोंड द्यावे लागले. त्यांना मंगळ होता. मंगळ सप्तम (विवाह सौख्य) घरात आहे. राहु तिसऱ्या, सहाव्या किंवा अकराव्या भावात असेल तर त्याचे दुष्परिणाम होतात. या ग्रहस्थितींच्या प्रभावामुळे श्रीरामांना वैवाहिक, मातृ, पितृ आणि भौतिक सुख मिळू शकले नाही. तथापि, दहाव्या घरातील मेष राशीत असलेल्या सूर्याने श्रीरामाला इतके सक्षम शासक म्हणून प्रस्थापित केले की त्यांच्या चांगल्या राजवटीची रामराज्य आजही स्तुती केली जाते.

पौराणिक कथांनुसार रामराज्य अकरा हजार वर्षे टिकले. रामाचा जन्म अंदाजे १, २५, ५८,० ९८ वर्षांपूर्वी झाला. आधुनिक कालगणना पद्धतीनुसार श्रीरामाचा जन्म चैत्र नवमीला असतो. 

श्रीरामाच्या कुंडलीचे विश्लेषण केल्यावर हे स्पष्ट झाले की कोणत्या ग्रहांमुळे त्यांना भौतिक सुख प्राप्त झाले नाही. पण आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, त्याग आणि संघर्षाच्या वेदनादायक मार्गावर चालत श्रीरामांनी मर्यादा पुरुषोत्तमच्या रूपात स्वतःला सादर केले. सदैव सत्याच्या मार्गावर चालले, अनेक संकटे सोसली पण तरीही लोककल्याणाच्या ध्येयापासून डगमगले नाहीत किंवा देवाला तसेच दैवाला दोष देत थांबले नाहीत. याचे कारण गुरू आणि चंद्राचा संयोग आहे. ज्यामुळे ते सकारात्मकता घेऊन चालत राहिले. 

पाचव्या (ज्ञान) आणि नवव्या (भाग्य) घरांवर गुरूच्या दृष्टीचा प्रभाव असा होता की त्यांनी धर्माचे पालन करणे हे आपल्या जीवनाचे एकमेव ध्येय मानले. धर्माच्या मार्गापासून ते कधीच भरकटले नाहीत. म्हणूनच त्यांचे नाव इतक्या वर्षांनंतरही आदराने घेतले जात आहे आणि त्यांचा उत्सव साजरा केला जात आहे. 

म्हणून आपणही कुंडलीतील दोष न पाहता गुणांवर लक्ष द्यावे आणि स्वतःचे कर्तृत्त्व सिद्ध करावे, हेच रामकथेचे सार!

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याAstrologyफलज्योतिष