शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

Astrology: रामललाच्या वाट्याला का आले एवढे भोग? जन्मकुंडलीचा दोष की आणखी काही? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 17:14 IST

Astrology Tips: सातवा विष्णू अवतार असूनही रामललाला मनुष्य अवतारात अनेक भोग भोगावे लागले, त्यांची पत्रिका मंगळाची होती म्हणून की आणि काही ते जाणून घ्या. 

अयोध्याराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सगळेच उत्सुक आहेत, रामाचा जयजयकार करत आहेत, त्याच्या येण्याने दिवाळी साजरी करत आहेत. पण याच रामाला त्याच्या हयातीत जे भोग भोगावे लागले ते सामान्य माणसाच्या आयुष्यापेक्षा कमी नव्हते. त्यामागील ज्योतिष शास्त्रीय विचार जाणून घेऊया. 

प्रारब्ध कुणालाही चुकले नाहीत. अगदी श्रीराम आणि श्रीकृष्णालाही! मनुष्य देहात जन्म घेतला की जशा वासना, विकार जडतात तसे प्रारब्धही जडतात. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या बाबतीत म्हटले तर त्यांनी अवतार घेतला, मग त्यांना प्रारब्ध चिकटले कसे? तर त्यांनी ज्या घराण्यात जन्म घेतला त्यावरून तसेच त्यांच्या जन्मस्थितीच्या वेळी असलेल्या ग्रहदशेवरून! हे दोघेही जण सर्वांना रमवूनही आपण अलिप्त राहिले. त्यामुळेच की काय त्यांनी वेळेत आशा आकांक्षा मागे न ठेवता आपले अवतार कार्य संपवले. श्रीरामांनी तर त्यांच्या हयातीत वनवास भोगला आणि तो कमी म्हणून की काय, आजही त्यांच्या स्वच्छ चारित्र्यावर संशयाचे शिंतोडे उडवून लोक त्यांना वनवासच भोगायला लावत आहेत. अयोध्येतील राम मंदिर साकार व्हायलाही ५०० वर्षांचा काळ जावा लागला, म्हणजे त्यांच्या वाट्यालाही सुख हुलकावणी देत होते असे म्हणता येईल. याला कारणीभूत त्यांची जन्म कुंडलीही असू शकते असे भाकीत ज्योतिषी वर्तवतात. काय आहे त्यांच्या कुंडलीचे वैशिष्ट्य? चला जाणून घेऊया. 

श्रीरामाची जन्म कुंडली :

गोस्वामी तुलसीदासांच्या रामचरितमानसानुसार, भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र शुक्ल नवव्या तिथीला आणि पुनर्वसु नक्षत्र आणि कर्क राशीच्या चौथ्या चरणात झाला. गुरू आणि चंद्र लग्न स्थानी आहे. पाच ग्रह - शनि, मंगळ, गुरु, शुक्र आणि सूर्य हे आपापल्या उच्च राशींमध्ये स्थित आहेत. कर्क राशीत बृहस्पति श्रेष्ठ आहे. बृहस्पति चंद्रासोबत चढत्या स्थानावर स्थित आहे ज्यामुळे गजकेसरी योग तयार होतो जो भरपूर कीर्ती देतो. पण शनि चतुर्थ भावात तूळ राशीमध्ये स्थित असल्याने प्रगती होते पण अतिशय हळू, हे श्रीरामांनीही अनुभवले!

मंगळ सातव्या भावात मकर राशीमध्ये स्थित आहे. या कुंडलीत दोन सौम्य ग्रह - गुरु आणि चंद्र हे दोन अशुभ ग्रह - शनि आणि मंगळ त्यांच्या संबंधित उच्च राशींमध्ये स्थित आहेत. अशा स्थितीत  राजभंग योग तयार होतो. त्यामुळे श्रीरामांच्या राज्याभिषेकापासून ते हयातापर्यंतच्या सर्व कार्यात अडथळे येत राहिले. ज्या वेळी श्रीरामाचा राज्याभिषेक होणार होता, त्या वेळी मंगळ शनि महादशेतून जात होता.

श्रीरामांनाही मंगळ होता :

मंगळ सप्तम घरात आहे. राहु तिसऱ्या, सहाव्या किंवा अकराव्या भावात असेल तर त्याचे दुष्परिणाम कमी होतात. मात्र या ग्रहस्थितींच्या प्रभावामुळे श्रीरामांना वैवाहिक, मातृ, पितृ आणि भौतिक सुख मिळू शकले नाही. 

'या' ग्रह स्थितीमुळे श्रीरामांच्या वाट्यालाही आले भोग : 

शनि आणि मंगळ यांच्या स्थितीमुळे श्रीरामांना अनेक संघर्षांना तोंड द्यावे लागले. त्यांना मंगळ होता. मंगळ सप्तम (विवाह सौख्य) घरात आहे. राहु तिसऱ्या, सहाव्या किंवा अकराव्या भावात असेल तर त्याचे दुष्परिणाम होतात. या ग्रहस्थितींच्या प्रभावामुळे श्रीरामांना वैवाहिक, मातृ, पितृ आणि भौतिक सुख मिळू शकले नाही. तथापि, दहाव्या घरातील मेष राशीत असलेल्या सूर्याने श्रीरामाला इतके सक्षम शासक म्हणून प्रस्थापित केले की त्यांच्या चांगल्या राजवटीची रामराज्य आजही स्तुती केली जाते.

पौराणिक कथांनुसार रामराज्य अकरा हजार वर्षे टिकले. रामाचा जन्म अंदाजे १, २५, ५८,० ९८ वर्षांपूर्वी झाला. आधुनिक कालगणना पद्धतीनुसार श्रीरामाचा जन्म चैत्र नवमीला असतो. 

श्रीरामाच्या कुंडलीचे विश्लेषण केल्यावर हे स्पष्ट झाले की कोणत्या ग्रहांमुळे त्यांना भौतिक सुख प्राप्त झाले नाही. पण आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, त्याग आणि संघर्षाच्या वेदनादायक मार्गावर चालत श्रीरामांनी मर्यादा पुरुषोत्तमच्या रूपात स्वतःला सादर केले. सदैव सत्याच्या मार्गावर चालले, अनेक संकटे सोसली पण तरीही लोककल्याणाच्या ध्येयापासून डगमगले नाहीत किंवा देवाला तसेच दैवाला दोष देत थांबले नाहीत. याचे कारण गुरू आणि चंद्राचा संयोग आहे. ज्यामुळे ते सकारात्मकता घेऊन चालत राहिले. 

पाचव्या (ज्ञान) आणि नवव्या (भाग्य) घरांवर गुरूच्या दृष्टीचा प्रभाव असा होता की त्यांनी धर्माचे पालन करणे हे आपल्या जीवनाचे एकमेव ध्येय मानले. धर्माच्या मार्गापासून ते कधीच भरकटले नाहीत. म्हणूनच त्यांचे नाव इतक्या वर्षांनंतरही आदराने घेतले जात आहे आणि त्यांचा उत्सव साजरा केला जात आहे. 

म्हणून आपणही कुंडलीतील दोष न पाहता गुणांवर लक्ष द्यावे आणि स्वतःचे कर्तृत्त्व सिद्ध करावे, हेच रामकथेचे सार!

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याAstrologyफलज्योतिष