शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
2
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
3
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
4
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
5
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
6
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
7
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
8
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
9
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
10
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
11
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
12
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
13
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
14
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
15
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
16
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
17
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
18
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
19
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
20
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...

Astrology: पुनर्विवाह केला तरी तो यशस्वी होण्याचा योग पत्रिकेत असावा लागतो, अन्यथा... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 18:20 IST

Astrology: विवाह व्हावा, टिकावा आणि फुलावा यासाठी ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिकोनातून मुख्य घटक कोणते हे सांगणारी लेखमाला : भाग ८

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

पूर्वीचा काळ वेगळा होता. पतीचे निधन झाले, तर स्त्री दुसरा विवाह करण्याची रीत नव्हती. किबहुना त्यावेळी स्त्रीचा पुनर्विवाह ही संकल्पना अस्तित्वातच नव्हती. विधवा म्हणून जीवन कंठत राहावे लागत असे. पण स्त्री गेली तर तिचे कार्य झाल्यावर लगेच पती मात्र विवाहबद्ध होत असे.  

आज २१ व्या शतकात विलंबाने विवाह ही जशी समस्या आहे, तशीच घटस्फोट ही सुद्धा एक ज्वलंत समस्या आहे. घटस्फोट झाल्यानंतर पुढील जीवन एकट्याने व्यतीत करायचे का? हा प्रश्न पडतो आणि त्यावेळी पुनर्विवाहाचा विचार पुढे येतो. स्त्री आता घराबाहेर पडत आहे आणि स्वतःचे करिअर करत आहे. स्वतःच्या पायावर उभी आहे. आजच्या काळात घटस्फोटाची कारणे म्हणजे वैचारिक मतभेद, विवाहबाह्य संबंध ही प्रामुख्याने समोर येतात. अनेकदा जोडीदाराचा आजारपणामुळे किंवा अपघाती मृत्यू होतो, त्यामुळे पुनर्विवाह करावा लागतो. मुले लहान, घरी वयस्कर आई वडील हेही कारण असते. 

Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!

पुनर्विवाहासाठी विचारणा आल्यास त्याला ह्यापुढे उत्तम वैवाहिक सुख मिळणार की नाही हे पाहावे लागते  प्रथम विवाहाचा विचार आपण सप्तम स्थानावरून करतो .द्वितीय विवाह हा भाग्यस्थानावरून पहिला जातो. अष्टमेश लग्नी किंवा सप्तमात असेल तर द्वितीय विवाहाचे योग पहिल्या पती/पत्नीच्या निधन झाल्यामुळे येतात. लग्नेश लग्नात किंवा षष्ठात असेल तर २ विवाह संभवतात. लग्नी मंगळ असेल आणि सप्तमेश ६, ८, १२ मध्ये असेल आणि पापग्रहांनी युक्त असेल तर पुनर्विवाह होऊ शकतो. मेष किंवा वृश्चिक लग्नात मंगळ असून सप्तम स्थानात बुध असेल आणि सप्तमेश शुक्र जर अष्टमात असेल तर एकापेक्षा अधिक विवाह होतात. 

सप्तमात बुध, मंगळ असतील किंवा बुध मंगळाच्या राशीत पापग्रह युक्त असेल. बुध हा एक घटना पुन्हा घडवतो. सप्तमेश बुध हा पापग्रहांनीयुक्त असून अशुभ नक्षत्रात असेल, सप्तम स्थानात उच्चीच्या किंवा निचीच्या ग्रहासोबत राहू किंवा केतू असतील तर, पुरुषाच्या पत्रिकेत १२ व्या स्थानी राहू असेल तर तो एकापेक्षा जास्त विवाह घडवतो . नवम स्थानात राहू केतू किंवा केतू गुरु असे ग्रह असतील तर किंवा पापग्रहांची उपस्थिती जास्त असेल तर पुनर्विवाह सहजासहजी होत नाही . शुक्र चांगला असेल ,नवमेश चांगल्या स्थितीत असेल दुसरा विवाह यशस्वी होतो.

Astrology: मंगळाची पत्रिका असेल तर मंगळी जोडीदारच शोधायचा का? शास्त्र सांगते... 

पुनर्विवाह आजच्या काळात आवश्यक आहे. आर्थिक दृष्टीने तसेच मानसिक दृष्टीने सुद्धा. एकटेपणा जिव्हारी लागणारा असतो आणि त्यातून वैफल्य निर्माण होते आणि एकटेपणाच्या भावनेतून आत्मविश्वासाची कमी आणि मानसिक दौर्बल्य सुद्धा निर्माण होते. अनेकवेळा दोघानाही अपत्य असते त्यामुळे त्यांचाही विचार एकत्र येताना करावा लागतो . मुलांचा विचार सर्वप्रथम नाहीतर सगळेच दु:खी होतील. वैचारिक मतभेदामुळे पहिला विवाह मोडला असेल, तर दुसरा करताना तो निभावण्यासाठी पहिल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही ह्याचीही काळजी घेणे आवश्यक असते. आपल्या स्वभावात अमुलाग्र बदलही करावा लागतो . दुसऱ्या विवाहात प्रेम नसते असेही नाही , सहवासातून प्रेम निर्माण होते पण अनेकदा तडजोड अधिक असते . ती करण्याशिवाय गत्यंतरही नसते हेही तितकेच खरे. विवाह टिकवण्याची जबाबदारी दोघांचीही असते मग विवाह पहिला असो अथवा दुसरा!

संपर्क : 8104639230

Astrology: विवाह यशस्वी होण्यासाठी कुंडलीमिलन करताना कालानुरूप बदल झाले पाहिजेत; अन्यथा... 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषmarriageलग्नrelationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप