शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
2
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
3
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
4
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
5
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
6
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
7
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
8
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
9
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
10
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
11
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
12
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
13
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
14
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
15
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
16
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
17
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
18
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!
19
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
20
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...

Astro tips: तापट डोक्याच्या लोकांना हिऱ्याची अंगठी घाला असे ज्योतिष तज्ज्ञ का सुचवतात? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 13:34 IST

Astro Tips: हिऱ्याची चमक लक्षवेधक असते, शिवाय ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीनेही तो वापरण्याचे अनेक लाभ आहेत, पैकी एक म्हणजे रागावर नियंत्रण!

सोने, चांदी खरेदी पर्यंत आपली मजल जाते, मात्र आयुष्यात कधीतरी हिरा खरेदी करावा असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हिरा महाग असूनही तो अतिशय गुणकारी असल्याने ज्योतिषी त्याचे लाभ शरीराला मिळावेत म्हणून हिऱ्याची अंगठी परिधान करा असे सुचवतात. एवढे काय महत्त्व आहे हिऱ्याचे? त्याचे गुणधर्म कोणते ते छोट्याशा उदाहरणातून जाणून घेऊ. 

एक राजा असतो. थंडीच्या दिवसात उबदार वाटावे म्हणून राजदरबार पटांगणात भरतो. एक व्यक्ती येते आणि म्हणते माझ्या कडे दोन एकसारखे हिरे आहेत. अनेक राज्यात जाऊन आलो पण कोणालाही यातला  खरा हिरा ओळखता आला नाही. यात खरा कोणता आणि खोटा कोणता हे ओळखण्याची संधी तुमच्याही राज्यातल्या लोकांना देऊ इच्छितो. राजासमोर दोन्ही हिरे पेश करण्यात आले. राजाही अचंबित झाला. तो माणूस म्हणाला, राजन यातला खरा हिरा तुमच्यापैकी कोणालाही ओळखता आला तर हा तुमच्या राजखजिन्यात ठेवून घ्या आणि जर नाही ओळखला तर माझ्या कलाकाराचे बक्षीस म्हणून त्या हिऱ्याच्या दुप्पट किमंत मला द्या!' राजा त्याची अट मान्य करतो आणि सर्वांना आवाहन करतो. 

राजदरबारात सगळे पारख करू लागतात . कोणालाच ओळखू येत नाही. तेव्हा एक अंध व्यक्ती म्हणते मी ओळखून दाखवतो. लोक कुजबुजतात. डोळस लोकांना जे बघून कळले नाही ते अंध व्यक्तीला कसे दिसणार यावर चर्चा करतात. अंध व्यक्ती काही क्षणात खरा हिरा ओळखते आणि खोटा कोणता ते सांगते.  हिरा बनवणारी व्यक्ती देखील आश्चर्यचकित होऊन विचारते. त्यावर ती अंध व्यक्ती म्हणते,  की आपण उन्हात बसलो होतो. उन्हात काच गरम झाली. हिरा मात्र थंड राहिला. त्यामुळे खरा कोणता आणि खोटा कोणता हे मी लगेच ओळखले. 

या गोष्टीतून सांगायचे म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टीवरून आपल्या लोकांवर रागावत असतो आणि अनेक चांगल्या व्यक्ती, चांगले मित्र आपल्या आयुष्यातून दूर होतात. कधी कधी क्षणिक तर कधी कायमच्या दुरावतात.

ज्याने विपरीत परिस्थिती मध्ये ही आपला स्वभाव बदलला नाही, टिकवून ठेवला . शांत राहिला ..बाह्य परिस्थितीचा आपल्यावर परिणाम होऊ दिला नाही. तो हिरा .. तो सर्वांना हवाहवासा वाटणारा. आणि जो छोट्या छोट्या गोष्टीवरून तडकतो, तो खोटा हिरा अर्थात काच!

यावरून हिऱ्याचा शांत गुणधर्म आपल्या लक्षात येतो, तोच गुण आपल्यातही यावा किंवा त्याचा प्रभाव आपल्यावर राहावा म्हणून ज्योतिषी तापट लोकांना हिऱ्याची अंगठी परिधान करा असे सांगतात. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष