शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Astro tips: तापट डोक्याच्या लोकांना हिऱ्याची अंगठी घाला असे ज्योतिष तज्ज्ञ का सुचवतात? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 13:34 IST

Astro Tips: हिऱ्याची चमक लक्षवेधक असते, शिवाय ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीनेही तो वापरण्याचे अनेक लाभ आहेत, पैकी एक म्हणजे रागावर नियंत्रण!

सोने, चांदी खरेदी पर्यंत आपली मजल जाते, मात्र आयुष्यात कधीतरी हिरा खरेदी करावा असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हिरा महाग असूनही तो अतिशय गुणकारी असल्याने ज्योतिषी त्याचे लाभ शरीराला मिळावेत म्हणून हिऱ्याची अंगठी परिधान करा असे सुचवतात. एवढे काय महत्त्व आहे हिऱ्याचे? त्याचे गुणधर्म कोणते ते छोट्याशा उदाहरणातून जाणून घेऊ. 

एक राजा असतो. थंडीच्या दिवसात उबदार वाटावे म्हणून राजदरबार पटांगणात भरतो. एक व्यक्ती येते आणि म्हणते माझ्या कडे दोन एकसारखे हिरे आहेत. अनेक राज्यात जाऊन आलो पण कोणालाही यातला  खरा हिरा ओळखता आला नाही. यात खरा कोणता आणि खोटा कोणता हे ओळखण्याची संधी तुमच्याही राज्यातल्या लोकांना देऊ इच्छितो. राजासमोर दोन्ही हिरे पेश करण्यात आले. राजाही अचंबित झाला. तो माणूस म्हणाला, राजन यातला खरा हिरा तुमच्यापैकी कोणालाही ओळखता आला तर हा तुमच्या राजखजिन्यात ठेवून घ्या आणि जर नाही ओळखला तर माझ्या कलाकाराचे बक्षीस म्हणून त्या हिऱ्याच्या दुप्पट किमंत मला द्या!' राजा त्याची अट मान्य करतो आणि सर्वांना आवाहन करतो. 

राजदरबारात सगळे पारख करू लागतात . कोणालाच ओळखू येत नाही. तेव्हा एक अंध व्यक्ती म्हणते मी ओळखून दाखवतो. लोक कुजबुजतात. डोळस लोकांना जे बघून कळले नाही ते अंध व्यक्तीला कसे दिसणार यावर चर्चा करतात. अंध व्यक्ती काही क्षणात खरा हिरा ओळखते आणि खोटा कोणता ते सांगते.  हिरा बनवणारी व्यक्ती देखील आश्चर्यचकित होऊन विचारते. त्यावर ती अंध व्यक्ती म्हणते,  की आपण उन्हात बसलो होतो. उन्हात काच गरम झाली. हिरा मात्र थंड राहिला. त्यामुळे खरा कोणता आणि खोटा कोणता हे मी लगेच ओळखले. 

या गोष्टीतून सांगायचे म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टीवरून आपल्या लोकांवर रागावत असतो आणि अनेक चांगल्या व्यक्ती, चांगले मित्र आपल्या आयुष्यातून दूर होतात. कधी कधी क्षणिक तर कधी कायमच्या दुरावतात.

ज्याने विपरीत परिस्थिती मध्ये ही आपला स्वभाव बदलला नाही, टिकवून ठेवला . शांत राहिला ..बाह्य परिस्थितीचा आपल्यावर परिणाम होऊ दिला नाही. तो हिरा .. तो सर्वांना हवाहवासा वाटणारा. आणि जो छोट्या छोट्या गोष्टीवरून तडकतो, तो खोटा हिरा अर्थात काच!

यावरून हिऱ्याचा शांत गुणधर्म आपल्या लक्षात येतो, तोच गुण आपल्यातही यावा किंवा त्याचा प्रभाव आपल्यावर राहावा म्हणून ज्योतिषी तापट लोकांना हिऱ्याची अंगठी परिधान करा असे सांगतात. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष