शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Astro Tips: जुलै अखेरपर्यंत रागावर नियंत्रण ठेवा; मंगळ केतू युती नाती बिघडवेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 14:12 IST

Astro Tips: जुलै अखेरपर्यंत ग्रहस्थिती नकारात्मक परिणाम देणारी आहे, त्यामुळे रागावर संयम ठेवा, नाती जपा, माणसांना जोडून ठेवा, अन्यथा होत्याचे नव्हते होण्यास वेळ लागणार नाही! 

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

एक जोडपे ४-५ दिवसांसाठी एका रिसोर्ट मध्ये राहायला गेले. एकमेकांच्या सोबत छानसे वेकेशन घालवणार म्हणून खूप मजेत होते. तिथे गेल्यावर त्या मुलाच्या लक्षात आले की आपल्याला दिलेली रूम सी फेसिंग नाही म्हणजेच आपल्या खोलीतून समुद्र दिसतच नाही. त्याला राग आला आणि तरातरा तो तेथील व्यवस्थापकाला म्हणाला, आमची खोली सीफेसिंग नाही. ह्यावर ते म्हणाले की इथे बुकिंग करताना तुम्ही जर आम्हाला सी फेसिंग रूम हवी आहे असे सांगितले असते तर आम्ही नक्कीच अशी रूम दिली असती, पण तुम्ही तसे काहीही सांगितले नव्हते. आताही देऊ शकणार नाही, कारण सर्व रूम बुक झाल्या आहेत. हे ऐकल्यावर त्याच्या रागाचा पारा अधिकच चढला आणि त्याने त्या हॉटेल त्या मालकाला बोलावले आणि त्यालाही हाच प्रश्न विचारला. त्यानेही तेच उत्तर दिले त्यावर तो मुलगा खूप जास्त चिडला आणि रूम मधे जाऊन त्याने घडलेला सर्व प्रसंग त्याच्या पत्नीला सांगितला.

पत्नी समजूतदार होती . तिने त्याला सांगितले सगळ्यात महत्वाचे काय आहे? तर आपण एकमेकांच्या सोबत एकत्र वेळ घालवणे . आपल्या खोलीतून समुद्र दिसणे हे महत्वाचे अजिबात नाही. आपल्याला वाटले तर रोज आपण समुद्रावर एक मस्त फेरी मारून येत जाऊ. त्यावर मुलगा अधिकच भडकला. झाले! त्या दोघांच्यात तू तू मैमै सुरु झाली आणि पुढील ५-६ दिवस ना ते एकत्र जेवले, ना ते एकत्र फिरले. त्यांच्यातील संवाद जणू संपला आणि ज्या मेमरीज मिळवण्यासाठी ते आले होते, जे आनंदाचे क्षण ते जगायला आले होते, ते न उपभोगतात ते निघून गेले. वेकेशन संपली पण त्यातून आनंद मिळाला नाही उलट डोक्याला ताप झाला. खरेतर चूक त्या मुलाचीच होती . समुद्र रूम मधून दिसावा अशी सूचना करून त्याने बुकिंग केले असते तर पुढील सर्वच टळले असते. 

नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!

कुठली गोष्ट किती ताणून धरायची हे महत्वाचे असते. राग राग राग, कसला राग इतका? आणि दुसऱ्याला वाट्टेल तसे बोलण्याचा अधिकार दिला कुणी तुम्हाला? स्वतःचाही आनंद घालवायचा आणि इतरांचाही . घरातील एकवेळ ऐकून घेतील पण बाहेरचे कुणी का ऐकून घ्यायचे ? 

सांगायचे तात्पर्य असे की आपण आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे. आयुष्यात आपण सगळ्यांना आवडत नाही आणि सगळे आपल्यालाही आवडत नाहीत, पण तरीही अशा लोकांसोबत उठबस करावी लागते तेव्हा चार हात दूर राहणे पसंत केले तर सोपे होते. अनेकदा घरात , कामाच्या ठिकाणी अनेक व्याप असतात , असंख्य गोष्टीनी आपले आयुष्य आज घेरलेले आहे त्यात आर्थिक चिंता आणि आयुष्यात निर्माण झालेली अनिश्चीतता , संघर्ष करायला लावते. या सर्वातून आपले आयुष्य जात असताना राग येणार. पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक आपली स्वतःची तब्येत तर बिघडवण्यास आणि कुटुंबातील आनंदाला सुरुंग लावण्यास कारणीभूत ठरतो. 

समाजजीवन जगताना ज्यांना क्रोध येतो किंवा ज्यांना समोरच्या शाब्दिक चकमकी करून दुसर्याला दुखावून सगळेच वातावरण गढूळ करण्याची सवय आहे त्यांनी समाजातील कुठल्याही कामात पडू नये . कारण त्यामुळे माणसे दुखावतात आणि ती कायमचीच...

आषाढारंभ:आषाढापासून ४ महिने आध्यात्मिक वातावरण आणि सण, उत्सव, व्रत, वैकल्याची रेलचेल!

सर्वात महत्वाचे आपण आणि आपले कुटुंब! त्यामुळे आपले आरोग्य जपा, आपल्या माणसाना आपण हवे आहोत. माणसाना दुखावून आपल्याला मिळणार तरी काय ? माणसं जपणे ही एक कला आहे आणि ती आज प्रत्येकाने आवडो अथवा न आवडो शिकलीच पाहिजे तरच आपले आणि इतरांचेही आयुष्य सुसह्य होईल. माणसं जपणे म्हणजे माणसातील परमेश वर जपणे . असतात तेव्हा माणसांचे महत्व नसते पण नसली की आपण केलेल्या चुका आठवतात आणि पश्चात्ताप करण्याशिवाय गत्यंतर उरत नाही. जुलै अखेरपर्यंत मंगळ केतू युती आहे . १३ जुलै ला शनी महाराज सुद्धा वक्री होणार आहेत आणि ते ह्या दोन ग्रहांच्या षडाष्टकात असणार आहेत तेव्हा आयुष्याचे , मैत्रीचे , हितसंबंध ह्यातील सूर बेसुरे होणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची आहे सर्वानीच!

संपर्क : 8104639230

टॅग्स :Astrologyफलज्योतिषrelationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप