शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

Ashadhi Ekadashi 2024: पंढरपुरात विठ्ठल रखुमाईचे मंदिर वेगवेगळे का? जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 11:16 IST

Ashadhi Ekadashi 2024: विठ्ठलाच्या आरतीमध्ये आपण राही रखमाबाईचा उल्लेख करतो, त्यातली राही कोण? रुख्मिणीचे मंदिर वेगळे असण्यामागे ती कारणीभूत आहे का? वाचा!

विठ्ठल म्हटल्यावर रखुमाईचे नाव ओघाने येते, तरी संत नामदेवांनी रचलेल्या 'युगे अठ्ठावीस' या आरतीत 'राही रखुमाबाई राणिया सकळा' असा उल्लेख येतो. पांडुरंगाच्या आणखी राण्या आपल्या ऐकिवात नाही, मग हा उल्लेख आला कुठून? त्याबद्दल जाणून घेऊ. 

पांडुरंग, विठ्ठल हे विष्णूंचे रूप आणि महाभारतात श्रीकृष्ण अवतार झाल्यावर थकलेल्या भगवंतांनी चंद्रभागेच्या तीरी येऊन विश्रांती घ्यावी, भक्तांची भेट घ्यावी या विचाराने विठ्ठल रूप घेतले, तर तिथे त्याला भक्ताच्या भेटीसाठी तिष्ठत उभे राहावे लागले. कारण त्याचा भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता. ती झाल्याशिवाय तो भगवंताची भेट घेणार नव्हता. उठून देवाला आसन द्यावे, एवढाही त्याच्याजवळ वेळ नव्हता, म्हणून त्याने जवळच पडलेली वीट पुढे सरकवली आणि तेच आसन म्हणून त्यावर थोडं टेकून घे असे सांगितले. त्याचीच वाट बघत पांडुरंग अठ्ठावीस युगे लोटली तरी तिथेच तिष्ठत उभा आहे. अशा वेळी तो परत आला नाही म्हणून 'गेला माधव कुणीकडे' हे पाहण्यासाठी त्याच्या गोपिका पंढरपुरापर्यंत आल्या. 

राही कोण? 

राही म्हणजे कृष्ण अवतारातली कृष्ण सखी राधा! तिलाच भगवंताने प्रेमाने राही हे नाव दिले आणि तिचा अपभ्रंश करत आपण तिला राई करून टाकले. मात्र ही राधा रुख्मिणीच्या पाठोपाठ पंढरपुरात आली आणि अन्य गोपिका सुद्धा तिथे पोहोचल्या. भक्त-भगवंतामधील अतूट प्रेम पाहून त्या भारावून गेल्या. त्याच या राणिया सकळा म्हणजेच कृष्णाच्या समस्त गोपिका!

तरी विठ्ठल रुख्मिणीचे मंदिर वेगवेगळे का?

विष्णू लक्ष्मी हे जोडपे वेगवेगळ्या अवतारात वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटते. त्यांचाही संसार आहे, फक्त तो विश्वाचा संसार आहे. त्यामुळे त्यांच्यातही वाद विवाद होत राहतात. अशातच श्रीकृष्ण रूपात राधाशी असलेली जवळीक रुख्मिणीला खटकते, म्हणून ती विठ्ठल रूपातल्या कृष्णाला शोधत पंढरपुरापर्यंत आली पण राही अर्थात राधाही तिथे आलेली पाहून दूरवर उभी राहून आपल्या भगवंताला न्याहाळत आहे. म्हणून भक्तांनी त्यांच्यातील मतभेदाचा आदर ठेवून एकाच ठिकाणी दोहोंचे मंदिर उभारले पण ते स्वतंत्र ठेवले. 

हा रुसवाही लोभस वाटावा इतका गोड आहे. आपल्या पतीवर अन्य कोणी प्रेम केलेले कोणत्याही पत्नीला आवडणार नाही, यात रुख्मिणी मातेचा तर दोष नाहीच, पण राजस सुकुमार असणाऱ्या भोळ्या विठ्ठलाचाही दोष नाही; कारण देही असोनि विदेही अर्थात अलिप्त राहणारे हे ईश्वर तत्व आहे. त्याच्या मायेत आपण सगळे गुंतून गेलेलो आहोत... जय हरी विठ्ठल!

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी