शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Anger Management : राग येण्याचाही राग येऊ लागलाय? तर संदीप माहेश्वरी यांनी सांगितलेला उपाय करून बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 15:42 IST

Anger control tips: रागवायचे नाही हे ठरवूनही रागाचा क्षण सावरता येत नसेल आणि नंतर पश्चात्ताप होत असेल तर हा लेख खास तुमच्यासाठी!

आजच्या काळात आपण संयम गमावून बसलेलो आहोत. प्रत्येक गोष्ट क्षणार्धात मिळवण्याची सवय आपल्याला लागली आहे. कधी इंटरनेट बंद पडले, फोन लागला नाही, जेवणाची ऑर्डर वेळेत आली नाही, तरी लोक जमदग्नीचे रूप धारण करतात. एकूणच रागावर संयम राहिलेला नाही. सतत काहीतरी गमावण्याची भीती मनाला पोखरत राहते. या भीतीतून स्वत:ला सावरायचे कसे आणि क्षणार्धात डोकं शांत कसे ठेवायचे, याबद्दल सांगताहेत तरुणांचे लाडके व्याख्याते संदीप महेश्वरी!

आपल्या डोक्यात एकाच वेळी अनेक विचार सुरू असतात. आपल्या मेंदूला कल्पना आणि वास्तव यातला फरक स्पष्ट करता येत नाही. कल्पनेतून, अतिविचारातून निर्माण झालेल्या गैरसमजांना आपला मेंदू वास्तव समजू लागते आणि ते चिंताग्रस्त राहते. कल्पना आणि वास्तव यातला भेद अन्य कोणी नाही, तर आपणच आपला दूर करायला शिकलो, तर क्षणात डोकं शांत ठेवायला शिकू शकता. कसे ते पहा-

आपण सगळेच जण झोपेत स्वप्न पाहतो. स्वप्नात रंगून जातो. काही स्वप्नं आनंद देणारी तर काही भयभीत करणारी असतात. कधी कधी तर आपण आपला किंवा आपल्या आप्तजनांचा मृत्यू पाहतो. पटकन जाग येते. सर्वांगाला घाम फुटलेला असतो. पण क्षणात लक्षात येते आणि हायसे वाटते, की ते स्वप्नं होते. वास्तव नाही. वास्तवात आपण किंवा स्वप्नात मृत पाहिलेली व्यक्ती जीवंत आहे. या विचाराने आपण आनंदून जातो.

हीच कृती आपल्याला जागेपणी करायची आहे. एखाद्या गोष्टीची भीती जेव्हा मनात तयार होते. तेव्हा एक क्षण थांबून आपल्याला विचार करायला हवा, की ही केवळ आपली कल्पना आहे की वास्तव? एखाद्या कामात, नात्यात, आर्थिक व्यवहारात, स्पर्धेत आपण अपयशी ठरलो, याचा अर्थ आपण आयुष्यातून उध्वस्त होतो का? तर नाही! ही केवळ आपली कल्पना आहे. त्यात किती वेळ अडकून राहायचे? जेवढा वेळ आपण स्वप्न विसरायला लावतो, तेवढाच! अपयश, आळस झटकून पुन्हा कामाला लागलो, तर कोणीही आपल्याला यशस्वी होण्यापासून अडवू शकत नाही. 

हीच बाब राग नियंत्रणाची! एखाद्यावर रागवताना क्षणभर थांबून विचार करा आणि मग व्यक्त करा. खरोखरच नुकसान होण्याइतकी काही गोष्ट घडली आहे का? ती दुरुस्त होऊ शकणार नाही का? तेवढ्यासाठी रागवण्याची खरंच गरज आहे का? हा विचार केलात तरी क्षणात मन, डोकं शांत होऊन सहज पुढच्या कामाला सुरूवात करू शकाल. अन्यथा विचारात अडकून राहाल.

जेव्हा आपण कल्पना आणि वास्तव यात फरक ओळखायला शिकू तेव्हा आपल्याला आपल्याच वाईटात वाईट विचारांची गंमत वाटू लागेल आणि सदासर्वकाळ मन, विचार, डोकं शांत राहील आणि तुम्ही आनंदी राहाल.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीMental Health Tipsमानसिक आरोग्य