शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

आनंद तरंग: श्रीराम आम्हाला देतो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 3:32 AM

शरीरच त्या ईश्वराने निर्माण केल्यामुळे त्याच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची व्यवस्था ईश्वराने केलेली असते. चिमण्या, पाखरंही आपल्या चोचीतून पिलाला घास भरवतात.

मोहनबुवा रामदासीआम्ही काय कुणाचे खातो। श्रीराम आम्हाला देतो।जो अन्न देतो उदरासी। शरीर विकावे लागे त्यासी।मां जेणे घातले जन्मासी। त्यासी कैसे विसरावे।।मातेच्या उदरातून हा जीव म्हणून जेव्हा बाहेर आला, त्या क्षणापासून ईश्वराने त्याच्या जीवनाची चिंता वाहिलेली असते. खरंतर जीव जन्माला घालण्यापूर्वी भगवंताने त्या जिवाच्या सर्व व्यवस्था व अवस्था निश्चित करून अधोरेखित केलेल्या असतात. या जीवसृष्टीवर भगवंताची एकमेव सत्ता आहे. त्या भगवंताच्या ऋणात राहणं हेच साधकाचं प्रथम कर्तव्य असतं. अन्नाचा कण ज्याने निर्माण केला, त्या ईश्वराने केवळ माणूसच नव्हे, तर सृष्टीतील सर्व जीव, जंतू, पशू, पक्षी आणि प्राण्यांच्याही उदरनिर्वाहाची काळजी घेतलेली असते. दुर्दैवाने या पशू, पक्षी, प्राण्यांना बुद्धी नाही असे म्हणतात; परंतु हेच पशुपक्षी बुद्धीचे वरदान माणसांपेक्षा कमी असूनही निसर्गाचे नियम पाळतात. मात्र, माणूस असूनही तो निसर्गाचे नियम नीट पाळत नाही. म्हणून तर निसर्गाचे संतुलन ढळलेले आपल्याला पाहायला मिळते. शरीरच त्या ईश्वराने निर्माण केल्यामुळे त्याच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची व्यवस्था ईश्वराने केलेली असते. चिमण्या, पाखरंही आपल्या चोचीतून पिलाला घास भरवतात. त्यामागे ईश्वर नावाची शक्ती मातेच्याच रूपात असते. तीच प्रत्येक जिवाला आई म्हणून घास भरवते. म्हणूनच ‘आम्ही काय कुणाचे खातो, तो राम आम्हाला देतो’ या विचारांचा प्रभाव मनावर असावा आणि आपल्या गरजा मर्यादित ठेवाव्या. गरजांचा डोंगर वाढला की, दु:ख पदरी पडत असतं. म्हणून प्रत्येक घास घेताना हा घास त्या रामाने माझ्यासाठी निर्माण केला आहे हा भाव असावा. त्यासाठी प्रयत्न, जिद्द ही हवीच! नाहीतर ‘असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी’ या निष्क्रिय भावनेचा जाणीवपूर्वक त्याग करावा व हे सर्व रामाचे आहे, त्याने निर्माण केलेलं आहे, तो मला कधीच उपाशी ठेवणार नाही ही श्रद्धा व हा भाव असावा.