शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

आनंद तरंग: विषयाची पारख पारखी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 12:24 AM

भक्त, योगी व विषया हे कधीच आजारी पडत नसतात. त्यांच्यात कफ, वात आणि पित्ताचं संतुलन असतं. भक्ताला ईश्वर सांभाळतो, योग्याला योग सांभाळतो.

बा. भो. शास्त्रीविषय म्हणजे विषयांचं ज्ञान होय. भोग्य वस्तूचा उचित भोग घेणारा. कोणत्या ऋतूत कोणता पदार्थ आणि किती प्रमाणात सेवन करावा, सकाळी कोणता, दुपारी आणि सायंकाळी कोणता खावा, याची ज्याला जाणीव आहे असा. खरं तर निसर्गाने आधीच स्वयंपाक केला आहे. माणसाने त्यात हस्तक्षेप केला. केवळ काकडी खाताना जो आनंद मिळतो, तो मीठ व तिखट लावल्याने मिळत नाही. चव हे जिभेचे चोचले आहेत. देहाची गरज नाही. पशू-पक्षी नैसर्गिक आहार घेतात. ते आहारात ढवळाढवळ करीत नाहीत. हत्ती बलवान, सिंह पराक्रमी, गरुडाची भरारी आणि वानराचं काटक शरीर, कारण ते निसर्गाच्या जवळ आहेत. आंब्याच्या रसात निसर्गाने साखर प्रमाणात टाकलेली असतेच. आम्ही वरून जास्तीची टाकतो. आम्ही खूप पदार्थांत भेसळ केली. मूळ पदार्थांचा स्वभाव बदलला.

विषम स्वभावाचे पदार्थ एकत्र करून खात असतो. त्याचा देहावर विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. आज आपण भोग भोगत नसून, रोगच भोगत आहोत. भोगाची यादी वर दिलेलीच आहे. त्यात सर्व आहार सुखं आहेत. यथोचित भोग घेता आला नाही तर भोगातच रोग जन्माला येतात. उचित भोग घेणारे तीन सांगितले आहेत. भक्त, योगी व विषया हे कधीच आजारी पडत नसतात. त्यांच्यात कफ, वात आणि पित्ताचं संतुलन असतं. भक्ताला ईश्वर सांभाळतो, योग्याला योग सांभाळतो. जो विषयी आहे, त्याला त्याचा संतुलित आहारच सांभाळत असतो. या भोगाने भोगी तुष्ट होतो. पुष्ट होतो, श्रेय मिळते. आम्ही श्रेय सोडून प्रेयच्या मागे धावतो. प्रेयचा अतिरेक झाला आहे. जेवण अती, मोबाईलचा वापर अती. प्रवास अती, व्यसनं अती, जागरण अती, ते पोषक की घातक याचं ज्ञान नाही. श्रेयस्कर काय आहे, याचा विवेक नाही. रुचलं पाहिजे एवढंच सामान्यांना कळतं. विषयांचा ज्याला अभ्यास आहे, त्यालाच सूत्रात विषया म्हटलेलं आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक