शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Adukha Navami 2025: सांसारिक दु:ख दूर करणारे अदु:ख नवमी व्रत कधी असते; का लावतात अखंड दिवा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 17:57 IST

Adukha Navami 2025: आयुष्यातून दु:ख, दारिद्र्य, नैराश्य नष्ट व्हावे यासाठी केले जाते अदु:ख नवमी वरात, जाणून घ्या तारीख, व्रत विधी आणि लाभ.

भाद्रपद नवमीला केले जाते अदुःख नवमीचे व्रत(Adukha Navami Vrat 2025). यंदा १ सप्टेंबर रोजी हे व्रत केले जाईल. महिन्याच्या सुरुवातीलाच हे व्रत केले तर पुढे सगळेच दिवस आनंदात जाणार अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही. कारण, अदुःख या शब्दातूनच कळते, दुःख नाही ते अदुःख! आयुष्यात अशी स्थिती निर्माण व्हावी म्हणून हे व्रत केले जाते. या व्रताचे महत्त्व, पूजा विधी आणि उपचार जाणून घेऊया. 

Gauri Avahan 2025: गौरी आवाहन पासून विसर्जनापर्यंत सविस्तर माहिती; पूजा साहित्य आणि मुहूर्तही!

वास्तविक पाहता सुखदुःखाचा ससेमिरा चालूच राहतो. दुःखामागे सुखाचा आणि सुखामागे दुःखाचा पाठशिवणीचा खेळ सुरूच राहतो. मात्र कधी कधी दुःखाचा कडेलोट होतो आणि सारेकाही संपवून टाकावेसे वाटते. तो क्षण सावरता आला तर सुख दुःखाचा हिंदोळा कसा आणि कधी सावरायचा हे आपल्याला लक्षात येईल. त्यासाठी हवी उपासनेची जोड. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी व्रत वैकल्यांची आखणी केली आहे. अदुःख नवमी व्रत हे देखील त्यापैकीच एक!

गौराईचे स्वागत करताना आपण सोनपावलांनी तिला बोलावतो आणि जाताना आशीर्वाद देऊन जा असे मागणेही मागतो. म्हणून या दिवशी अदुःख नवमीचे व्रत देखील केले जाते. त्यासाठी विशेष तयारी करावी लागत नाही. घरी उपलब्ध असलेल्या सामानातच हे व्रत सहज पूर्ण होते. 

Gauri Pujan 2025: गौरीचा धागा व्यक्तिला आणि वास्तुला बांधण्याने होणारे लाभ माहीत आहेत का?

व्रत विधी :

गौराईला निरोप देताना आपण ज्याप्रामणे आरती म्हणून ओवाळतो आणि दही भाताचा नैवेद्य दाखवतो, त्याचप्रमाणे अदुःख नवमीच्या सायंकाळी देवापाशी दिवा लावताना देवघरातील अन्नपूर्णेसमोर किंवा देवीच्या तसबिरीसमोर तुपाचा दिवा लावावा. देवीला हळद, कुंकू वाहावे. दही भाताचा किंवा दही पोह्यांचा नैवेद्य दाखवावा आणि घरातील दुःख, दैन्य दूर कर असा आशीर्वाद देवीकडे मागावा. 

व्रताचणाचा मंत्र : 

देवापाशी रोज सायंकाळी आपण दिवा लावतोच, पण या व्रताचे वैशिष्ट्य म्हणजे तुपाचा दिवा लावून म्हणावयाचा मंत्र, जो पुढीलप्रमाणे आहे : -ऊं ह्रीं महालक्ष्म्यै नमः! हा मंत्र सलग १०८ वेळा म्हणावा आणि देवीला फुल वाहून आपली व्यथा दूर करण्यासाठी प्रार्थना करावी. 

Gauri Pujan 2025: तुमच्या घरी गौरी गणपती असतील तर नैवेद्याच्या वेळी पडदा लावता ना? कारण...

अखंड ज्योत : 

काही घरांत या दिवशी अखंड ज्योत लावण्याचीदेखील प्रथा आहे. त्यानुसार मोठी लांबलचक वात समईत घालून वेळोवेळी तेल टाकत अखंड दिवा रात्रभर लावला जातो. अखंड दिवा हे चैतन्याचे प्रतीक आहे. देवासमोर ज्योत जर कायम तेवत राहिली तर ती ऊर्जा आपल्यालाही मिळते आणि सुख-दुःखात तग धरून राहण्याची क्षमता वाढते. 

टॅग्स :Puja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सण