शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

Adukha Navami 2025: सांसारिक दु:ख दूर करणारे अदु:ख नवमी व्रत कधी असते; का लावतात अखंड दिवा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 17:57 IST

Adukha Navami 2025: आयुष्यातून दु:ख, दारिद्र्य, नैराश्य नष्ट व्हावे यासाठी केले जाते अदु:ख नवमी वरात, जाणून घ्या तारीख, व्रत विधी आणि लाभ.

भाद्रपद नवमीला केले जाते अदुःख नवमीचे व्रत(Adukha Navami Vrat 2025). यंदा १ सप्टेंबर रोजी हे व्रत केले जाईल. महिन्याच्या सुरुवातीलाच हे व्रत केले तर पुढे सगळेच दिवस आनंदात जाणार अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही. कारण, अदुःख या शब्दातूनच कळते, दुःख नाही ते अदुःख! आयुष्यात अशी स्थिती निर्माण व्हावी म्हणून हे व्रत केले जाते. या व्रताचे महत्त्व, पूजा विधी आणि उपचार जाणून घेऊया. 

Gauri Avahan 2025: गौरी आवाहन पासून विसर्जनापर्यंत सविस्तर माहिती; पूजा साहित्य आणि मुहूर्तही!

वास्तविक पाहता सुखदुःखाचा ससेमिरा चालूच राहतो. दुःखामागे सुखाचा आणि सुखामागे दुःखाचा पाठशिवणीचा खेळ सुरूच राहतो. मात्र कधी कधी दुःखाचा कडेलोट होतो आणि सारेकाही संपवून टाकावेसे वाटते. तो क्षण सावरता आला तर सुख दुःखाचा हिंदोळा कसा आणि कधी सावरायचा हे आपल्याला लक्षात येईल. त्यासाठी हवी उपासनेची जोड. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी व्रत वैकल्यांची आखणी केली आहे. अदुःख नवमी व्रत हे देखील त्यापैकीच एक!

गौराईचे स्वागत करताना आपण सोनपावलांनी तिला बोलावतो आणि जाताना आशीर्वाद देऊन जा असे मागणेही मागतो. म्हणून या दिवशी अदुःख नवमीचे व्रत देखील केले जाते. त्यासाठी विशेष तयारी करावी लागत नाही. घरी उपलब्ध असलेल्या सामानातच हे व्रत सहज पूर्ण होते. 

Gauri Pujan 2025: गौरीचा धागा व्यक्तिला आणि वास्तुला बांधण्याने होणारे लाभ माहीत आहेत का?

व्रत विधी :

गौराईला निरोप देताना आपण ज्याप्रामणे आरती म्हणून ओवाळतो आणि दही भाताचा नैवेद्य दाखवतो, त्याचप्रमाणे अदुःख नवमीच्या सायंकाळी देवापाशी दिवा लावताना देवघरातील अन्नपूर्णेसमोर किंवा देवीच्या तसबिरीसमोर तुपाचा दिवा लावावा. देवीला हळद, कुंकू वाहावे. दही भाताचा किंवा दही पोह्यांचा नैवेद्य दाखवावा आणि घरातील दुःख, दैन्य दूर कर असा आशीर्वाद देवीकडे मागावा. 

व्रताचणाचा मंत्र : 

देवापाशी रोज सायंकाळी आपण दिवा लावतोच, पण या व्रताचे वैशिष्ट्य म्हणजे तुपाचा दिवा लावून म्हणावयाचा मंत्र, जो पुढीलप्रमाणे आहे : -ऊं ह्रीं महालक्ष्म्यै नमः! हा मंत्र सलग १०८ वेळा म्हणावा आणि देवीला फुल वाहून आपली व्यथा दूर करण्यासाठी प्रार्थना करावी. 

Gauri Pujan 2025: तुमच्या घरी गौरी गणपती असतील तर नैवेद्याच्या वेळी पडदा लावता ना? कारण...

अखंड ज्योत : 

काही घरांत या दिवशी अखंड ज्योत लावण्याचीदेखील प्रथा आहे. त्यानुसार मोठी लांबलचक वात समईत घालून वेळोवेळी तेल टाकत अखंड दिवा रात्रभर लावला जातो. अखंड दिवा हे चैतन्याचे प्रतीक आहे. देवासमोर ज्योत जर कायम तेवत राहिली तर ती ऊर्जा आपल्यालाही मिळते आणि सुख-दुःखात तग धरून राहण्याची क्षमता वाढते. 

टॅग्स :Puja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सण